शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

राज्य सरकारचे जनतेच्या आरोग्याकडे दुर्लक्ष- दिलीप वळसे-पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2018 02:53 IST

वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला

टाकळी हाजी : राज्य सरकार जनतेच्या आरोग्याच्या प्रश्नाबाबत गंभीर नाही. वैद्यकीय अधिकारी, परिचारिका पदे भरण्याची आवश्यकता असून सरकारचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांनी केला.पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने कवठे येमाई (ता. शिरूर ) येथे मोफत आरोग्य तपासणी व शस्त्रक्रिया शिबीराचे आयोजन केले होते. शिबीराचे उद्घाटन आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते, झाले. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपट गावडे होते. यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील,कृषी सभापती सुजाता पवार, सभापती विश्वास कोहकडे, माजी सभापती सुभाष उमाप, जिल्हा परिषद सदस्या सुनिता गावडे, सविता बगाटे, स्वाती पाचुंदकर, राजेंद्र जगदाळे, कुसुम मांढरे, उपसभापती मोनिका हरगुडे, प्रकाश पवार, मानसिंग पाचुदकर, राजेंद्व गावडे, रंगनाथ थोरात, वर्षा शिवले, गटविकास अधिकारी संदीप जठार, उप अभियंता महेंद्र कोठारी, अरुणा घोडे, प्रदीप वळसे पाटील, सविता पºहाड, तालुका आरोग्य अधिकारी राजेंद्र शिंदे, डॉ चंद्रकांत ढगे, सरपंच दिपक रत्नपारखी, सुदाम ई चके, बाळासाहेब डांगे आदी उपस्थित होते.यावेळी वळसे पाटील म्हणाले की, ‘‘ग्रामिण भागातील महिलांच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असुन, वैदयकीय सेवा वेळेत मिळत नसल्याने अनेक रूग्ण दगावतात. ग्रामीण भागात दर्जेदार शिक्षणाबरोबरच आरोग्याला महत्व दिले पाहीजे.पुणे जिल्हा परिषदेने शाळा, महाविद्यालयामधील मुलींच्या रक्तातील हिमोग्लोबीनची तपासणी करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी. ’’ आरोग्य शिबीरात ५ हजार ३६५ रूग्णांनी तपासणी करुन घेतली. डॉ.चंद्रकांत ढगे यांनी चष्मे वाटप केले. १२८ लोकांची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. संचालक राजेंद्र गावडे, तालुका वैद्यकीय अधिकारी राजेंद्र शिंदे यांनी प्रयत्न केले.

टॅग्स :BJPभाजपाGovernmentसरकार