शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

कर्मचाऱ्यांना वेतन मिळणार अन् राज्य शासनात विलीनीकरणही होणार; गुणरत्न सदावर्ते यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2021 10:10 IST

जर मन:स्थिती ठीक नसेल अशा वेळी कर्मचारी कामावर गेला नाही, तर त्याला त्याचे वेतन द्यावेच लागते

पुणे : आपली कुठली युनियन नाही, ना आपण कोणता संप करीत आहोत. आपली मन:स्थिती ठीक नाही. प्रकृती अत्यावस्थ आहे. ५२ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचा हा दुखवटा आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना नोव्हेंबर महिन्याचे वेतन तर मिळेलच शिवाय एस.टी.चे राज्य शासनात विलीनीकरण देखील होईल, असे आश्वासन ॲड. गुणरत्न सदावर्ते यांनी दिले.

रविवारी रात्री स्वारगेट बस स्थानक येथे येऊन आंदोलक एस.टी. कर्मचाऱ्यांशी त्यांनी यावेळी संवाद साधला. यावेळी त्यांच्या समवेत जयश्री पाटील या देखील होत्या. 

उपस्थित एस.टी. कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना सदावर्ते म्हणाले, आपली युनियन नाही. त्यामुळे आपण कोणता संप करीत नाही. ही भारत जोडोची लढाई आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना आधी निलंबनाची धमकी दिली. त्यानंतर बडतर्फ आणि आता मेस्मा लावण्याची धमकी देत आहे; पण कर्मचाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. भारतीय संविधानात असे लिहिले आहे. जर मन:स्थिती ठीक नसेल अशा वेळी कर्मचारी कामावर गेला नाही, तर त्याला त्याचे वेतन द्यावेच लागते. तसेच निलंबित कर्मचाऱ्यांना देखील त्यांचा निर्वाह भत्तादेखील द्यावा लागतो. ही कायद्यातीलच तरतूद आहे. त्यामुळे तुम्ही घाबरू नका. येणाऱ्या काळात एस.टी.चे विलीनीकरण होणार व संविधान जिंकणार, असेही ते म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष, खासदार शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर देखील टीका केली.

टॅग्स :ST Strikeएसटी संपEmployeeकर्मचारीGovernmentसरकारMONEYपैसा