शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
3
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
4
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
5
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
6
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
7
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
8
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
9
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
10
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
11
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
12
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
13
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
14
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
15
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
16
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
17
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
18
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
19
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
20
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
Daily Top 2Weekly Top 5

श्रीपांडुरंग पालखी सोहळा आज आळंदीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2019 13:18 IST

आळंदी कार्तिकी यात्रेत पंढरपूरहून श्री पांडुरंगाच्या पादुका आणण्यास गेल्या ६ वर्षांपासून सुरुवात..

ठळक मुद्देहैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने सोहळ्याचा आज प्रारंभ दिवे घाटातील अपघातामुळे शोककळा

आळंदी : श्री संत ज्ञानेश्वरमहाराज यांच्या ७२४व्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी श्रीक्षेत्र पंढरपूर येथून श्रीपांडुरंगाच्या पादुका पालखी सोहळ्याअंतर्गत ‘श्रीं’ची पादुका पालखी दिंडी हरिनाम गजरात आळंदीत बुधवारी (दि. २०) प्रवेश होणार आहेत. दरम्यान, ‘श्रीं’च्या कार्तिकी यात्रेची सुरुवात श्रीगुरू हैबतरावबाबा यांच्या पायरीपूजनाने आळंदीत होईल. यानिमित्त आळंदीला जोडणाऱ्या रस्त्यावरून भाविकांच्या दिंड्या-दिंड्यांतून हरिनाम गजरात सुरू असलेला प्रवास अंतिम टप्प्यात आला आहे. सोहळ्यासाठी आळंदीत भाविक वारकरी दाखल होत आहेत. दरम्यान सकाळी दिवे घाटात झालेल्या अपघातात सोपान महाराज नामदास व एका वारकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने आळंदीवर शोककळा पसरली आहे.आळंदी कार्तिकी यात्रेत पंढरपूरहून श्री पांडुरंगाच्या पादुका आणण्यास गेल्या ६ वर्षांपासून विठूनामाच्या जयघोषात मोठ्या भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली. यासाठी श्री पांडुरंगाचे सेवेकरी कै. तात्यासाहेब वासकर यांनी संजीवन समाधीला श्री पांडुरंगाच्या पादुका आळंदीला नेण्याची मागणी केली होती. प्रत्यक्ष श्री पांडुरंग माऊलींचे संजीवन समाधी दिन प्रसंगी सोहळ्यास आळंदीत उपस्थित असतात, अशी भावना व वारकºयांची श्रद्धा आहे. वासकरमहाराज यांच्या मागणीप्रमाणे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने यासाठी मान्यता दिली. त्यानंतर श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळा श्रीक्षेत्र पंढरपूर ते आळंदी या मार्गावर पायी वारीस सुरुवात झाली. श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळ्यात दर वर्षी भाविकांची संख्या व सोहळ्यात वाढ होत आहे.  या वर्षी रथाच्या पुढे १५, तर रथामागे १० दिंड्या सहभागी झाल्या आहेत. सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, कोकण व कर्नाटकातील वारकरी श्री पांडुरंगरायाच्या पादुका पालखी सोहळा पायी वारीत सहभागी झाले आहेत. यात सुमारे १६ हजारांवर वारकरी भाविक प्रवास करीत असल्याचे सोहळाप्रमुख गोपालमहाराज देशमुख यांनी सांगितले.पंढरपूर येथून कार्तिकी पौर्णिमेला पांडुरंगाचा पालखी सोहळा हरिनाम गजरात मार्गस्थ झाला. हा सोहळा आळंदीत (दि. २०) अष्टमीला अलंकापुरीनगरीत दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासह अनेक ठिकाणी श्रींचे पादुकांचे दर्शन व स्वागत होत आहे............आळंदीत कार्तिकी वारीला बुधवार (दि. २०)पासून मौली मंदिरात विविध धार्मिक प्रथांचे पालन करीत सुरुवात होणार असल्याचे पालखी सोहळ्याचे मालक बाळासाहेब आरफळकर यांनी संगितले. श्रीगुरू हैबतरावबाबांचे पायरीपूजन सकाळी ९ वाजता होत असून, त्या प्रसंगी प्रमुख विश्वस्त विकास ढगे-पाटील आदी मान्यवरांसह वारकरी संप्रदायातील कीर्तनकार उपस्थित रहाणार आहेत. आळंदी यात्रेदरम्यान कार्तिकीत भागवत एकादशीला फार महत्त्व आहे. या दिवशी भाविक, वारकरी एकादशी साजरी करतात. ४या वर्षीची भागवत एकादशी आळंदी यात्रेत शनिवारी (दि. २३) साजरी होत आहे. भागवत एकादशीनिमित्त पहाटपूजेत अभिषेक (मध्यरात्री) होणार आहे. नगरप्रदक्षिणेस दुपारी एकच्या दरम्यान सुरुवात होईल. जागर कार्यक्रम रात्री १२ ते पहाटे २ होणार आहे. रविवारी (दि. २४) श्रींना अभिषेक रात्री १२ ते पहाटे २, शासकीय पूजा पहाटे ३.३० वाजता होणार आहे. पालखी नगरप्रदक्षिणेस सुरुवात दुपारी ४ वाजता, रथोत्सवाची सांगता सायंकाळी ७, प्रसादवाटप रात्री ११ ते १२, सोमवारी (दि. २५) मुख्य सोहळा यात ‘श्रीं’चा संजीवन समाधी दिन सोहळा साजरा होईल. यानिमित्ताने  संत नामदेवांच्या वंशजांकडून मंदिरात पूजा (सकाळी ७ ते ९), नामदासमहाराज यांच्या वतीने परंपरेने मानाचे कीर्तन, नामदासमहाराजांचे कीर्तन (सकाळी १० ते दु. १२), घंटानाद, पुष्पवृष्टी (दुपारी १२) होईल.........पुणे : कार्तिकी एकादशी व श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यानिमित्त आळंदी यात्रेसाठी पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून (पीएमपी) दि. २० ते २६ नोव्हेंबर या कालावधीत १२४ जादा बस सोडणार आहेत.  यात्रेनिमित्त भाविक मोठ्या संख्येने आळंदी येथे जातात. त्यांच्या सोयीसाठी पीएमपीकडून दर वर्षी जादा बस सोडण्यात येतात. त्यानुसार यंदाही बसचे नियोजन केले असून, एकूण २११ बस सलग सात दिवस या मार्गावर धावणार आहेत. तसेच दि. २२ ते २५ नोव्हेंबर या कालावधीत रात्री १२नंतरही गरजेनुसार बस सोडण्यात येणार आहेत. रात्री १० नंतर जादा बससाठी सध्याच्या तिकीटदरापेक्षा ५ रुपये जादा तिकीट आकारणी करण्यात येईल. ....अन्य मार्गांच्या फेºया रद्द४स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, मनपा भवन, निगडी, पिंपरी, चिंचवड, देहूगाव, भोसरी व रहाटणी या ठिकाणांहून जादा बस सोडण्यात येणार आहेत. यात्रेनिमित्त आळंदी आवारातील सध्याचे बस स्थानक स्थलांतरित करून ते काटेवस्ती येथून संचालित करण्यात आले आहे. दरम्यान, यात्रेनिमित्त जादा बस सोडण्यासाठी अन्य मार्गांवरील काही बसफेºया रद्द कराव्या लागणार आहेत.

टॅग्स :Alandiआळंदीsant dnyaneshwarसंत ज्ञानेश्वरPandharpurपंढरपूर