शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर हिरवाईला येणार बहर! सयाजी शिंदे यांचा स्तुत्य उपक्रम

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2021 18:27 IST

वडाच्या नावाने चांगभलं म्हणून करणार वृक्षारोपण 

पुणे : झाड हेच माणसांचा श्वास असून, त्यामुळेच आपण जीवंत आहोत. त्यामुळे त्यांना जपणे आवश्यक आहे. झाडांचे महत्त्व छत्रपती शिवाजी महाराज यांनी देखील सांगितले होते आणि गडांवर वृक्षराजी बहरू दिली होती. पण नंतरच्या काळात अनेक गडांवरील झाडे कमी झाली. आता पुन्हा गड-किल्ले हिरवाईने नटविण्यासाठी अभिनेते सयाजी शिंदे यांनी पुढाकार घेऊन येत्या शिवजयंतीला गडकिल्ल्यांवर वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

झाडांची मूळ ओलावा शोधत राहतात. घट्ट होत जातात. तसेच झाडांवर प्रेम करणारे लोक एकमेकांना शोधून काढतात. नातं घट्ट करतात. सह्याद्री देवराईच्या निमित्ताने आता वृक्षांसाठी काम करणाऱ्यांना एकत्र आणण्यात येणार आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. या शिवसुर्याचा शिवनेरी गडावर जन्म झाला. आणि हा जन्मदिवस महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध सण व उत्सव म्हणून आपण १९ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रभर साजरा करत असतो. प्रत्येक गडकिल्ल्यावर सुमारे ४०० रोपं लावण्यात येणार आहेत. चला तर मग शिवरायांना आपल्या जवळील गडकिल्यावर, देवराई मध्ये तसेच जिथे गडकिल्ले नाही तिथे "वृक्षदिंडी" काढून ज्या झाडाची वृक्षदिंडी काढली, त्या झाडाच्या नावाने उदा. वडाच्या नावाने चांगभलं म्हणून झाड लावायचे आहे. त्याचे संगोपन करून, दरवर्षी शिवजयंती या जगवलेल्या झाडाच्या वाढदिवसाने साजरी करून "मानवंदना" देऊया. आणि या छोट्या परंतु महत्वाच्या उपक्रमाचे फोटो, व्हिडीओ ची एक चित्रफीत तयार करून सहृ्याद्री देवराईकडे पाठवायचे आहे.——————————————शिवरायांचे गडकिल्ले बोडके झाले आहेत. त्यांना परत हिरवाईने फुलवू या. गडकिल्ल्यांवर देशी झाडे लावून शिवजयंती साजरी करूया. प्रत्येक शिवजयंतीला या झाडांचा  वाढदिवस साजरा करू आणि शिवरायांना आगळेवेगळी मानवंदना देऊया.- सयाजी शिंदे, ज्येष्ठ अभिनेते

टॅग्स :PuneपुणेFortगडsayaji shindeसयाजी शिंदेShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज