शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींनी वाराणसीतून तिसऱ्यांदा दाखल केला उमेदारी अर्ज, शाह-राजनाथ यांच्यासह ये दिग्गज होते उपस्थित
2
"लोक मदतीसाठी ओरडत होते पण आम्ही काहीच करु शकलो नाही"; होर्डिंग कोसळलं, 14 जणांचा मृत्यू
3
यशवंत जाधव, रवींद्र वायकर हे महापालिकेचे लाभार्थी, ज्यांनी मुंबई लुटली - संजय राऊत
4
बळीराजासाठी आनंदाची बातमी! येत्या ८ दिवसांत मान्सून अंदमानात दाखल होणार
5
इस्रायलला गाझावर अणुबॉम्ब टाकण्याची परवानगी मिळायला हवी; अमेरिकी खासदाराचे खळबळजनक वक्तव्य
6
आईच्या निधनानंतर आता...; वाराणसीमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भावुक झाले पंतप्रधान मोदी
7
DC vs LSG : 'करा किंवा मरा'! पंतची एन्ट्री; राहुलसोबतच्या नाट्यमय घडामोडींनंतर पहिलाच सामना
8
Fact Check : हैदराबादमध्ये मोदींनी AIMIM ला पाठिंबा दिल्याच्या Video दिशाभूल करणारा; जाणून घ्या 'सत्य'
9
भाजपासोबत जाण्याचा घटनाक्रम नेमका कसा होता?; सुनील तटकरेंनी २०१४ पासूनचं सगळं सांगितलं
10
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
11
Sangli Lok Sabha Election 2024 : 'साहेबा'साठी कायपण! सांगलीत निवडणूक निकालासाठी बुलेट अन् युनिकॉर्नची पैज
12
बीडमध्ये बोगस मतदान, काही ठिकाणी फेरमतदान घ्या, बजरंग सोनावणे यांनी केली मागणी   
13
RRR, 'आदिपुरुष'पेक्षा महागडा आहे नितेश तिवारीचा 'रामायण', बजेटचा आकडा पाहून व्हाल हैराण
14
Video - "सुशील कुमार मोदी रागवायचे तेव्हा..."; अश्विनी कुमार चौबे यांना अश्रू अनावर
15
राहुचे नक्षत्र गोचर: ६ राशींना संधींचा काळ, लाभाचे शुभ योग; सुख-समृद्धीत वाढ, भाग्याची साथ!
16
मी कुठलंही वचन दिलं नव्हतं, उद्धव ठाकरे खोटं बोलतायेत; अमित शाहांनी पुन्हा फटकारलं
17
IPO असावा तर असा! ३८६% प्रीमिअमवर झाला लिस्ट, पहिल्याच दिवशी ₹७५ वरुन पोहोचला ₹३६५वर
18
Ganga Saptami 2024: गंगेत स्नान केल्याने खरोखरंच पाप धुतले जाते का? गंगासप्तमिनीत्त वाचा गंगा स्नानाचे महत्त्व!
19
Ganga Saptami 2024: गंगा सप्तमीला का केले जाते पितृतर्पण? ते कसे करायचे व त्यामुळे काय फळ मिळते? वाचा!
20
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....

मेट्रो वाढविणार पुण्याचा लौकिक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 24, 2019 2:18 AM

मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली;

पुणे : मेट्रोची चर्चा सुरू झाली त्या वेळी मनात अनेक शंका होत्या. आता प्रत्यक्ष काम सुरू होऊन दोन वर्षे झाली; पण मेट्रोमुळे एक वाहतूक वगळता कुठेही पाडापाडी किंवा कोणाचे नुकसान झालेले नाही. वाहतूककोंडी सुटण्यासाठी मेट्रो सुरू होणे फायद्याचेच असून, त्यामुळे पुणे शहराच्या लौकिकात भरच पडणार आहे असे मत पुण्यातील नामवंतांनी व्यक्त केले.दुसऱ्या वर्धापनदिनानिमित्त महामेट्रो कंपनीच्या वतीने जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे ‘पुण्याची मेट्रो’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांच्यासह महापालिका आयुक्त सौरव राव, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर, पीएमपीएलच्या व्यवस्थापकीय संचालक नयना गुंडे, वृक्षप्रेमी एस. डी. महाजन, आर. एस. नागेशकर, शशिकांत लिमये, आर. एस. नागेशकर, टी. एम. परचुरे, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले वस्तुपाल रांका आदींनी चर्चेत भाग घेतला.बहुसंख्य वक्त्यांनी मेट्रोच्या कामाबद्दल व त्यामुळे पुण्याचे किती नुकसान होणार आहे याबाबत शंका होती असे सांगितले, मात्र मेट्रोचे काम सुरू झाले, त्यातून आपोआप अनेक शंका मिटत गेल्या, संवाद सारख्या कार्यक्रमाला तज्ज्ञ अभियंते उपस्थित असल्यामुळे त्यांना अनेक गोष्टी विचारता आल्या, असे त्यांनी सांगितले. महाजन यांनी वृक्षांचे पुनर्रोपण करण्याच्या महामेट्रोच्या प्रयत्नांचे कौतुक केले. नवे वृक्ष लावताना देशी वृक्षच लावावेत व तसेच लावले जात आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. परचुरे, रांका, राजेभोसले आदींनी मेट्रोने दोन वर्षांत काम बरेच पुढे नेले असे मत व्यक्त केले.वर्धापनदिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी महामेट्रोने काही स्पर्धा घेतल्या होत्या. त्यात नेताजी सुभाषचंद बोस स्कूल व महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थी सहभागी झाले होते. पूर्वा कानडे, प्रचिती काटे, प्रीती पिल्लई या विजेत्यांना बक्षिसे देण्यात आली. मुख्य प्रकल्प अभियंता रामनाथ सुब्रह्मण्यम यांनी आभार मानले.>लोक प्रतिनिधींना आमंत्रण नव्हतेकार्यक्रमाला लोकप्रतिनिधींना बोलविले नव्हते. महापौरांनाही निमंत्रण नव्हते. मेट्रोचे काम सुरू असल्यामुळे सध्या शहरात बºयाच ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. त्यामुळे नगरसेवकांमध्ये नाराजी आहे. वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात ही नाराजी व्यक्त व्हायला नको म्हणून त्यांना दूर ठेवण्यात आले असल्याचे समजते.दीक्षित यांनी एकूणच सर्व गोष्टींचा आढावा घेत पुण्याची मेट्रो व मेट्रो स्थानके भारतात प्रसिद्ध होतील, अशी खात्री व्यक्त केली. वेगळ्या कल्पना, वेगळी डिझाइन्स यात वापरण्यात आली आहेत.कोणत्याही गोष्टीत कसलीही कमतरता ठेवण्यात आलेली नाही असे त्यांनी सांगितले. विस्तारित मार्गांचे अनेक प्रस्ताव येत आहेत. त्यातील काहींवर काम सुरू आहे. स्वारगेट ते कात्रज या मार्गाचा प्रकल्प अहवाल आता अंतिम टप्प्यात आहे अशी माहिती त्यांनी दिली.