शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

पुणे : पावसाच्या संततधारेपासून काहीसा दिलासा; धरणे ५० टक्के भरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2022 09:51 IST

जिल्ह्यातील धरणांतही ४० टक्के पाणीसाठा...

पुणे : जिल्ह्यात गुरुवारी अतिवृष्टी होईल, असा इशारा हवामान विभागाने दिल्यानंतर पावसाने मात्र उसंत घेतली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. दुपारनंतर हलका पाऊस सुरू झाला; पण त्यात बुधवारसारखा जोर नव्हता. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये आता ५० टक्के पाणीसाठा जमा झाला असून, जिल्ह्यातील धरणांतही ४० टक्के पाणीसाठा झाला आहे.

शहरात बुधवारी रात्रीपासून पाऊस थांबला होता. गुरुवारी सकाळी शहराच्या काही भागांत सूर्यदर्शनही झाले. त्यामुळे नागरिकांना संततधारेपासून काहीसा दिलासा मिळाला. दुपारी सुमारे तीननंतर पुन्हा हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यात एक-दोन जोरदार सरीही होत्या. रात्री उशिरापर्यंत हलका पाऊस सुरू होता.

शहराला पाणीपुरवठा करण्याऱ्या चारही धरणांत मिळून १४.६८ टीएमसी पाणीसाठा जमा झाला आहे. हा साठा एकूण क्षमतेच्या ५० टक्के आहे. खडकवासला धरणातून विसर्गही ४७०८ क्युसेक इतका विसर्ग करण्यात आला. सायंकाळी पाच वाजेपर्यंत धरणक्षेत्रात झालेला पाऊस (मि.मी.मध्ये) : खडकवासला ५, पानशेत २५, वरसगाव २१ , टेमघर ३०.

जिल्ह्यातील धरणांच्या क्षेत्रांतील पाऊसही कमी झाला आहे. सध्या जिल्ह्यातील धरणे ४० टक्के भरली आहेत; तर कळमोडी व आंद्रा ही धरणे पूर्ण भरली आहेत. जिल्ह्यातील धरणांमध्ये आजवरचा साठा ७८.३१ टीएमसी झाला आहे. पिंपरी शहराला पाणीपुरवठा करणारे पवना धरण ५१ टक्के भरले आहे. यात सध्या ४.३४ टीएमसी पाणीसाठा आहे. जिल्ह्यातील अन्य धरणांमधील साठा (टक्क्यांत) : कासारसाई ६६.८१, चासकमान ६८.३८, भामा आसखेड ६६.२७, वडिवळे ७९.१७, गुंजवणी ६०.६९, भाटघर ४१.५१, निरा देवघर ३६.२५, वीर ७९.९३, माणिकडोह ३९.२५, डिंभे ३४.३९, पिंपळगाव जोगे २९.६६, येडगाव ८३.८७.

हवामान विभागाने शुक्रवारी शहरात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली असून, घाट परिसरात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज व्यक्त केला आहे. त्यानंतर पाऊस कमी होऊन पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातही शुक्रवारी घाट परिसरात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज असून त्यानंतर पुढील दोन दिवस घाट परिसरात मुसळधार पाऊस पडेल. तर सोमवारी (दि. १८) पावसात आणखी घट होऊन मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी