शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

"काही पंतप्रधान करीत काही नाहीत अन् बोलतातच जास्त" घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची मिश्कील टिपणी

By नम्रता फडणीस | Updated: April 18, 2023 17:40 IST

निवडणूक आयोगाने अंपायरसारखे काम करणे आवश्यक असते...

पुणे : लोकशाहीचे अंतिम न्यायालय हे जनता आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यामुळे जनतेच्या असंतोषाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यांच्या हत्येनंतर भारतीय लोकांना अत्याचार सहन होत नसल्यामुळे राजीव गांधी यांना सहानुभूती मिळाली. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी टेलिकम्युनिकेशन विकसित केले. मतदानाचे वय २१ वरून १८ वर आणले. पण आपण काय काम केले हे त्यांना मांडता आले नाही. मात्र, काही पंतप्रधान करीत काही नाहीत आणि बोलतातंच फार...अशी मिश्कील टिपणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली.

सध्या खूप चुका होत आहेत. त्यामुळे आदर्श लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही पण लोकशाही टिकून आहे. आता भारतीय जनतेच्या हातात सगळे आहे, असेही ते म्हणाले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त ’संविधानातील संसदीय लोकशाहीचे आजचे स्वरुप’ याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, कितीही काही झाले तरी भारतात 75 वर्षे लोकशाही टिकून आहे. एकोणीस सह विसाव्या शतकात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी हे पॉवरफुल पंतप्रधान झाले. पंतप्रधान व्यवस्थेचा पॉवरफुल घटक आहे. राज्यघटना स्वीकृत झाली तेव्हा पंतप्रधानांचा सल्ला राज्यांसह राष्ट्रपती वर बंधनकारक असेल अशी घटनेत सुधारणा करण्यात आली. आजमितीला राज्यपाल हे संविधानिक पद असले तरी राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखे वागतात. राज्यपालांची लॉयल्टी ही संविधानाशी असतानाही या पदाचा सरकार पाडण्याकरिता उपयोग केला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान च्या विरोधात कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही अशाप्रकारची असंवैधानिक घटना दुरुस्ती केली. चार दिवसात ही घटना दुरुस्ती करण्यात आली. मोदींनी त्यांचे रेकॉर्ड मोडत एका दिवसातच घटना दुरुस्ती केली. त्यामुळे ही संसदीय लोकशाही नव्हे तर पंतप्रधानीय लोकशाही आहे असे म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.

बापट यांच्या व्याख्यानातील प्रमुख मुद्दे

- भारतात पंडित नेहरूंमुळे 17 वर्षे लोकशाही टिकली.

- धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत ढाँचा आहे. तो बदलता येणार नाही

- निवडणूक आयोगाने अंपायर सारखे काम करणे आवश्यक असते. पण पंतप्रधानांकडूनच आयोगातील व्यक्तींची नेमणूक होते.

- सीएए हा असंवैधानिक मुद्दा आहे. जो घटनाबाह्य आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देता येत नाही.

- आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. ती सुविधा आहे. अधिकारांपेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. 50 टक्क्यांवर आरक्षण देता येणार नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajiv Gandhiराजीव गांधी