शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

"काही पंतप्रधान करीत काही नाहीत अन् बोलतातच जास्त" घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची मिश्कील टिपणी

By नम्रता फडणीस | Updated: April 18, 2023 17:40 IST

निवडणूक आयोगाने अंपायरसारखे काम करणे आवश्यक असते...

पुणे : लोकशाहीचे अंतिम न्यायालय हे जनता आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यामुळे जनतेच्या असंतोषाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यांच्या हत्येनंतर भारतीय लोकांना अत्याचार सहन होत नसल्यामुळे राजीव गांधी यांना सहानुभूती मिळाली. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी टेलिकम्युनिकेशन विकसित केले. मतदानाचे वय २१ वरून १८ वर आणले. पण आपण काय काम केले हे त्यांना मांडता आले नाही. मात्र, काही पंतप्रधान करीत काही नाहीत आणि बोलतातंच फार...अशी मिश्कील टिपणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली.

सध्या खूप चुका होत आहेत. त्यामुळे आदर्श लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही पण लोकशाही टिकून आहे. आता भारतीय जनतेच्या हातात सगळे आहे, असेही ते म्हणाले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त ’संविधानातील संसदीय लोकशाहीचे आजचे स्वरुप’ याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, कितीही काही झाले तरी भारतात 75 वर्षे लोकशाही टिकून आहे. एकोणीस सह विसाव्या शतकात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी हे पॉवरफुल पंतप्रधान झाले. पंतप्रधान व्यवस्थेचा पॉवरफुल घटक आहे. राज्यघटना स्वीकृत झाली तेव्हा पंतप्रधानांचा सल्ला राज्यांसह राष्ट्रपती वर बंधनकारक असेल अशी घटनेत सुधारणा करण्यात आली. आजमितीला राज्यपाल हे संविधानिक पद असले तरी राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखे वागतात. राज्यपालांची लॉयल्टी ही संविधानाशी असतानाही या पदाचा सरकार पाडण्याकरिता उपयोग केला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान च्या विरोधात कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही अशाप्रकारची असंवैधानिक घटना दुरुस्ती केली. चार दिवसात ही घटना दुरुस्ती करण्यात आली. मोदींनी त्यांचे रेकॉर्ड मोडत एका दिवसातच घटना दुरुस्ती केली. त्यामुळे ही संसदीय लोकशाही नव्हे तर पंतप्रधानीय लोकशाही आहे असे म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.

बापट यांच्या व्याख्यानातील प्रमुख मुद्दे

- भारतात पंडित नेहरूंमुळे 17 वर्षे लोकशाही टिकली.

- धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत ढाँचा आहे. तो बदलता येणार नाही

- निवडणूक आयोगाने अंपायर सारखे काम करणे आवश्यक असते. पण पंतप्रधानांकडूनच आयोगातील व्यक्तींची नेमणूक होते.

- सीएए हा असंवैधानिक मुद्दा आहे. जो घटनाबाह्य आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देता येत नाही.

- आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. ती सुविधा आहे. अधिकारांपेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. 50 टक्क्यांवर आरक्षण देता येणार नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajiv Gandhiराजीव गांधी