शहरं
Join us  
Trending Stories
1
डोळ्यांत ओला दुष्काळ! मायबाप सरकार, माझं कसं होणार? कुटुंब काय खाणार?; आसवांचा महापूर
2
आजचे राशीभविष्य- २४ सप्टेंबर २०२५, अविवाहितांचे विवाह ठरतील; नोकरी- व्यवसायात उत्पन्न वाढेल
3
ICC Suspends USA Cricket :आयसीसीनं अमेरिकेच्या क्रिकेट संघाला केलं निलंबित; जाणून घ्या कारण
4
अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी देणार २,२१५ काेटी; राज्य सरकारने घेतला नुकसानीचा आढावा
5
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
6
६ कोटींच्या हुंड्यासाठी विवाहितेचा छळ अन् गर्भपात; माहीम पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल
7
सरकारमान्य दरांना ठेंगा! ओला, उबरकडून मनमानी; RTO लायसन्स रद्द करण्याचा इशारा हवेतच
8
नवी मुंबईतून डिसेंबरपासून देश-विदेशसाठी करा उड्डाण; नव्या विमानतळाची ९ कोटी प्रवासी क्षमता
9
कोकणात जाणारी रो-रो सेवा ऑक्टोबरपासून; साडे पाच तासांत सिंधुदुर्ग गाठता येणार, दर किती? पाहा
10
...अन्यथा नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांवर कारवाई; कुळगाव बदलापूरप्रकरणी उच्च न्यायालयाचा इशारा
11
कुजबुज! जनता रस्त्यावर उतरताच मतावर डोळा ठेवून ठाण्यातील सर्वपक्षीय नेत्यांना जागा आली का?
12
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
13
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
14
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
15
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
16
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
17
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
18
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
19
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
20
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."

"काही पंतप्रधान करीत काही नाहीत अन् बोलतातच जास्त" घटनातज्ज्ञ उल्हास बापटांची मिश्कील टिपणी

By नम्रता फडणीस | Updated: April 18, 2023 17:40 IST

निवडणूक आयोगाने अंपायरसारखे काम करणे आवश्यक असते...

पुणे : लोकशाहीचे अंतिम न्यायालय हे जनता आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आणीबाणी जाहीर केल्यामुळे जनतेच्या असंतोषाचा सामना त्यांना करावा लागला आणि त्यानंतरच्या निवडणुकीत त्या पराभूत झाल्या. त्यांच्या हत्येनंतर भारतीय लोकांना अत्याचार सहन होत नसल्यामुळे राजीव गांधी यांना सहानुभूती मिळाली. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी टेलिकम्युनिकेशन विकसित केले. मतदानाचे वय २१ वरून १८ वर आणले. पण आपण काय काम केले हे त्यांना मांडता आले नाही. मात्र, काही पंतप्रधान करीत काही नाहीत आणि बोलतातंच फार...अशी मिश्कील टिपणी घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांनी केली.

सध्या खूप चुका होत आहेत. त्यामुळे आदर्श लोकशाही आहे असे म्हणता येणार नाही पण लोकशाही टिकून आहे. आता भारतीय जनतेच्या हातात सगळे आहे, असेही ते म्हणाले. पुणे बार असोसिएशनच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 जयंतीनिमित्त ’संविधानातील संसदीय लोकशाहीचे आजचे स्वरुप’ याविषयावर आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष केतन कोठावळे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

ते म्हणाले, कितीही काही झाले तरी भारतात 75 वर्षे लोकशाही टिकून आहे. एकोणीस सह विसाव्या शतकात पंडित नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नरेंद्र मोदी हे पॉवरफुल पंतप्रधान झाले. पंतप्रधान व्यवस्थेचा पॉवरफुल घटक आहे. राज्यघटना स्वीकृत झाली तेव्हा पंतप्रधानांचा सल्ला राज्यांसह राष्ट्रपती वर बंधनकारक असेल अशी घटनेत सुधारणा करण्यात आली. आजमितीला राज्यपाल हे संविधानिक पद असले तरी राज्यपाल हे पंतप्रधानांचे नोकर असल्यासारखे वागतात. राज्यपालांची लॉयल्टी ही संविधानाशी असतानाही या पदाचा सरकार पाडण्याकरिता उपयोग केला जातो याकडे त्यांनी लक्ष वेधले. इंदिरा गांधी यांनी पंतप्रधान च्या विरोधात कुठल्याही कोर्टात जाता येणार नाही अशाप्रकारची असंवैधानिक घटना दुरुस्ती केली. चार दिवसात ही घटना दुरुस्ती करण्यात आली. मोदींनी त्यांचे रेकॉर्ड मोडत एका दिवसातच घटना दुरुस्ती केली. त्यामुळे ही संसदीय लोकशाही नव्हे तर पंतप्रधानीय लोकशाही आहे असे म्हणावे लागेल असेही ते म्हणाले.

बापट यांच्या व्याख्यानातील प्रमुख मुद्दे

- भारतात पंडित नेहरूंमुळे 17 वर्षे लोकशाही टिकली.

- धर्मनिरपेक्षता हा राज्यघटनेचा मूलभूत ढाँचा आहे. तो बदलता येणार नाही

- निवडणूक आयोगाने अंपायर सारखे काम करणे आवश्यक असते. पण पंतप्रधानांकडूनच आयोगातील व्यक्तींची नेमणूक होते.

- सीएए हा असंवैधानिक मुद्दा आहे. जो घटनाबाह्य आहे. धर्माच्या आधारावर नागरिकत्व देता येत नाही.

- आरक्षण हा मूलभूत अधिकार नाही. ती सुविधा आहे. अधिकारांपेक्षा अपवाद मोठा असू शकत नाही. 50 टक्क्यांवर आरक्षण देता येणार नाही.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडRajiv Gandhiराजीव गांधी