शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

जवानांची शौर्यगाथा लवकरच अभ्यासक्रमात; लष्करप्रमुख बिपीन रावत यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2017 19:12 IST

वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या  पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली.

ठळक मुद्देलष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळा व शिक्षकांचा सत्कारआतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश

पुणे : भारतीय जवानांची शौर्यगाथा विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, त्यातून त्यांनी प्रेरणा घ्यावी, यासाठी वीर जवानांवरील पाठ्यपुस्तक अभ्यासक्रमात येणार आहे. याबाबत मानव संसाधन मंत्रालयाशी चर्चा सुरू असून, वर्षभरात केंद्रीय विद्यालयाच्या अभ्यासक्रमात या पुस्तकाचा समावेश होईल, अशी माहिती लष्करप्रमुख बिपीन रावत यांनी दिली. बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनला १० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयातील धन्वंतरी सभागृहात लष्करातील जवानांसाठी भेटवस्तू तसेच कार्ड पाठवणार्‍या १४ शाळांचा व शिक्षकांचा सत्कार रावत यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ते बोलत होते.  याप्रसंगी लष्कराच्या दक्षिण कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे उपस्थित होते. रावत म्हणाले, ‘‘देशाचे रक्षण करताना अनेक जवानांनी बलिदान दिले आहे. त्यांची माहिती विद्यार्थ्यांना शैक्षणिक जीवनात व्हावी आणि त्यांना प्रेरणा मिळावी यासाठी लष्कराचे प्रयत्न सुरू आहेत. आतापर्यंत २०० विद्यालयांतील अभ्यासक्रमात वीरांच्या माहितीचा समावेश केला आहे.’’भारतीय जवानांना भेटवस्तू तसेच राख्या पाठवण्याचे बी. एन. श्रीवास्तव फाउंडेशनचे काम कौतुकास्पद आहे, असे सांगून रावत म्हणाले, ‘‘भारतीय लष्करातील जवान हा सीमेवर लढत असतो. २४ तास तो आपले कर्तव्य बजावत असतो. अशा वेळी विद्यार्थ्यांनी पाठवलेली शुभेच्छापत्रे तसेच राख्यांमुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. एखादा सण साजरा करण्यासाठी कर्तव्यामुळे जवानाला घरी जाता येत नाही. अशा वेळी या विद्यार्थ्यांनी पाठवलेल्या भेटवस्तूंमुळे देश आपल्या पाठीशी आहे, ही जाणीव या भेटवस्तूंमुळे जवानांमध्ये वाढते. भारतीय सैन्यदल हे धर्मनिरपेक्ष सैन्यदल आहे. यासाठी विद्यार्थ्यांनी भेटवस्तू पाठवताना विविध भाषांचा वापर करत त्यांच्या कल्पनेला वाव द्यावा, असे आवाहनही रावत यांनी विद्यार्थ्यांना केले. या वेळी भारतीय जवानांना जवळपास ७ हजार शुभेच्छापत्रे पाठवण्याचा विक्रम केलेल्या पुण्यातील डीएव्ही स्कूलला ‘फिल्ड मार्शल सॅम मानिकशॉ’ ही फिरती ट्रॉफी रावत यांच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. 

काश्मीरमधील दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी लष्करातर्फे आॅल आऊट मोहीम राबविण्यात आहे. मात्र, ही समस्या चर्चेने सोडवण्यासाठी केंद्र सरकारने माजी आयबी प्रमुख दिनेश्वर शर्मा यांची नियुक्ती केली आहे. यावर रावत म्हणाले, ‘काश्मीर प्रश्न  सोडवण्यासाठी चर्चेद्वारे ते प्रयत्न करतील, लष्कर मात्र आपले काम सुरूच ठेवेल.’ 

 

भारत-चीन सीमेवर शांतताडोकलाम प्रश्नावरून भारत आणि चीन यांच्यादरम्यान निर्माण झालेला तणाव आता निवळला आहे. सीमेवर सध्या शांतता असल्याचे कार्यक्रमानंतर रावत यांनी पत्रकारांना सांगितले.

 

एल्फिन्स्टनचा ब्रीज लष्करच बांधणारचेंगराचेंगरीची दुर्घटना झालेल्या एल्फिन्स्टन रोड तसेच करी रोड आणि आंबिवली स्थानकांवरील नवे पादचारी पूल ब्रीज लष्कर बांधणार आहे. यावरून सध्या वाद  सुरू आहे. याबाबत रावत यांना विचारले असता ते म्हणाले, एल्फिन्स्टन येथील पूल बांधण्यासाठी लष्कराची मदत घेतली आहे. त्याचे काम लवकरच सुरू होईल. चेंगराचेंगरीसारख्या घटनांमध्ये जीवितहानी टाळण्यासाठी या पुलांचे काम पूर्ण करण्यात येईल. या नंतर लष्करामार्फतच या पुलांचे काम पूर्ण केल्याचा निर्णय योग्य असल्याचे सिद्ध होईल. 

टॅग्स :Soldierसैनिकeducationशैक्षणिक