शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
3
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
4
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
5
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
6
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
7
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
8
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
9
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
10
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
11
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
12
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
13
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
14
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
15
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
16
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले
17
आंध्र प्रदेशातील बस अपघातातील चालकाला अटक, आग लागल्यानंतर प्रवाशांना सोडून पळून गेला होता
18
पॅरिसमधील संग्रहालयात ‘धूम’स्टाईल चोरी, मौल्यवान रत्ने लांबवली, अखेर असे सापडले चोर  
19
"मी दर महिन्याला एक युद्ध थांबवतो; आता पाकिस्तान-अफगाणिस्तान...," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
‘मद्यपान करून गाडी चालवणारे दहशतवादीच’, कुरनूल बस अपघातानंतर हैदराबादच्या पोलीस आयुक्तांचं परखड विधान

बलात्कारितेचाच खून होतो आहे : पुष्पा भावे; समाजवादी महिला संमेलनाचे पुण्यात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2017 16:43 IST

फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.

ठळक मुद्देमहिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला, ही लढाई समानतेची होती : पुष्पा भावे आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार : मेधा पाटकर

पुणे :  आज संपूर्ण समाजात एक गुंतागुंतीची परिस्थिती निर्माण झाली आहे. कोपर्डीची घटना घडण्यापूर्वी काय नगर जिल्ह्यामध्ये बलात्काराच्या घटना घडल्या नाहीत काय? त्यामुळे बलात्कारितेचाच एकप्रकारे खून होतो आहे. फाशी दिली म्हणजे गुन्हे कमी होतील का? तर नाही यासाठी पुरूषी मानसिकताच बदलली गेली पाहिजे, अशा शब्दात ज्येष्ठ कार्यकर्त्या पुष्पा भावे यांनी समाजव्यवस्थेवर टीकास्त्र सोडले.देशावरील फॅसिस्ट विचारधारेचे संकट आणि स्त्रीवादी चळवळीसमोर उभी ठाकलेली आव्हाने यापार्श्वभूमीवर विविध समाजवादी-पुरोगामी आंदोलनामध्ये सक्रिय असलेल्या महिला कार्यकर्त्यांमध्ये एकजूट वाढावी आणि स्त्री चळवळी संदर्भात विचारमंथन व्हावे या उददेशाने ‘हम समाजवादी संस्थाएँ’च्या वतीने आयोजित ‘अखिल भारतीय समाजवादी महिला संमेलना’च्या उद्घाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या. याप्रसंगी नर्मदा बचाओ आंदोलनाच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या मेधा पाटकर, ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य तसेच सुनिती सु. र., डॉ. मनीषा गुप्ते, रझिया पटेल आदी उपस्थित होते.संघर्षाला ऐतिहासिकतेची एक किनार आहे असे सांगून पुष्पा भावे पुढे म्हणाल्या, गेल्या अनेक वर्षांपासून संघर्षाचा लढा सुरू आहे. केवळ तो एकाच रेषेत चालू राहिलेला नाही. काळानुरूप प्रश्न बदलले नसले तरी हा संघर्ष नवे चेहरे घेऊन समोर आला आहे. यात फुले-आगरकर यांचा संघर्ष अधिक महत्त्वाचा ठरतो कारण स्त्री-पुरूष समानतेच्या संघर्षातून एक मानवीय समानतेचा प्रश्न त्यांनी मांडला आहे. या संघर्षात मग तो लढा स्वातत्र्याचा का असेना महिलांचे योगदानही महत्त्वपूर्ण ठरले आहे. लढा देताना सामाजिक कार्यही महिला करीत होत्या. महिलांनी गांधीजींबरोबरही संघर्ष केला. ही लढाई स्त्रीपुरूष विरूद्धची नव्हे तर समानतेची होती.आज डोक्याला फेटे बांधून बुलेटवर बसून बदलाची भाषा आपण करतो तेव्हा पुरूषांसारखेच व्हायचे ही विकृत वृत्ती येते. मानवीय प्रश्नांमध्ये काय भूमिका घेतो हे त्यांच्या लक्षातच येत नाही. या समानतेच्या गप्पा करताना अनेक प्रश्नांकडे आपण हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहोत. ज्यावेळी महिलांवर अत्याचाराच्या घटना घडतात तेव्हा महिलांना सुधारायची, त्यांची मानसिकता बदलायची भाषा केली जाते. मात्र पुरूषी दृष्टी बदलायला हवी यावर कुणी परिश्रम घेत नाही. समाजात जसे लहानग्या मुलींवर अत्याचार होत आहेत तसा अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत आहे. बलात्कारितेचाच खून होतो आहे. महिलांवर जे बलात्कार होत आहेत ते जातीय तेढ किंवा महिलांविषयीच्या मत्सरबुद्धीमधून होत आहेत आणि या अत्याचारांना महिलांना सामोरे जावे लागत आहे, अशी भीषण स्थिती निर्माण झाली असल्याचे त्यांनी सांगितले.मेधा पाटकर यांनी समाजातल्या विविध प्रश्नांवर महिलांनी दिलेल्या संघर्षांवर भाष्य केले. महिलांशिवाय कोणताही संघर्ष आणि परिवर्तन घडू शकत नाही. आज दाखविला जाणारा विकास म्हणजे मूर्ख बनविण्याचा प्रकार आहे. नदी आणि व्यक्तीला ‘विकास’ या नावाने संबोधित केले जात आहे. शेतक-यांची नाळ जमिनीशी तोडण्याचा प्रयत्न केला जातोय. या विकासाचा परिणाम सर्वात जास्त महिला भोगत आहेत. तरीही त्या लढा देत आहेत. महिलांमुळेच संघर्षाची ताकद अधिक बळकट होत आहे याकडे पाटकर यांनी लक्ष वेधले.भाई वैद्य यांनी पंतप्रधान पद हे मोदींना भागवंतांनी दिलेले बक्षीस आहे, दंगलीतील सहभागाबद्दल मोदींना हे बक्षीस मिळाले आहे, अशा शब्दात मोदींवर निशाणा साधला.   

टॅग्स :Puneपुणेkopardi caseकोपर्डी खटला