शहरं
Join us  
Trending Stories
1
घसा बसला, कंठ दाटला अन् ७ मिनिटांत आवरलं भाषण; बारामतीतील सभेत पवारांनी काय आवाहन केलं?
2
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
3
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
4
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
5
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई
6
राजनाथ सिंह यांचा PoK बाबत मोठा दावा; अब्दुल्ला म्हणाले- 'पाकिस्तानने बांगड्या घातल्या नाहीत'
7
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
8
कृष्णप्पा गौथम, KL Rahul यांच्या अफलातून झेलने सामना गाजला; जाँटी ऱ्होड्सही चकित झाला
9
मालवाहू जीप व मोटरसायकलचा भीषण अपघात, माय-लेकाचा जागीच मृत्यू
10
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
11
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
12
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
13
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
14
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
15
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
16
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
17
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
18
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
19
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
20
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...

सामाजिक जाणिवेने भारलेलं व्यक्तिमत्व म्हणजे ‘भाई ’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2018 5:37 PM

संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली..

ठळक मुद्देपुलोत्सवात गुरुवारी झालेल्या 'पुलंचे सामाजिक भान' या विषयावर परिसंवाद

पुणे : केवळ लेखनातून नव्हे तर प्रत्यक्षात समाजात फिरुन तळागाळातील पीडितांच्या चेह-यावर आनंद फुलविण्याचे काम पुलंनी केले. त्याकरिता सामाजिक भावनेतून मोठ्या स्वरुपात त्यांनी मदत केली. अनेक संस्थांना देणग्या देवून त्यांचे कार्य अखंडित सुरु राहावे यासाठी प्रयत्नशील राहिले. संवेदनशील लेखकाबरोबर एक संवेदनशील माणूस म्हणून पुलंची वेगळी ओळख होती. त्यात त्यांना सुनीताबाईंची देखील महत्वपूर्ण साथ मिळाली, अशा शब्दांत विविध सामाजिक क्षेत्रात काम करणा-या मान्यवरांनी ’’भाईं’’च्या सामाजिक व्यक्तिमत्वाचे पैलु उलगडले.  पु. ल. परिवार आणि आशय सांस्कृतिकच्या वतीने आणि स्क्वेअर १च्या सहयोगाने आयोजित पुलोत्सवात गुरुवारी झालेल्या 'पुलंचे सामाजिक भान' या विषयावरील परिसंवादाचे. या परिसंवादात डॉ. अनिल अवचट, गिरीश प्रभुणे आणि रेणू गावस्कर सहभागी झाले होते. सूत्रसंचालनाच्या माध्यमातून डॉ. मंदार परांजपे यांनी आमटे कुटुंबियांचे प्रतिनिधी या नात्याने पुलंविषयीच्या आठवणींना उजाळा दिला. परिसंवादापूर्वी बालगंधर्व कलादालनात दाखविण्यात आलेल्या फिल्म डिव्हीजन्स निर्मित 'पु.लं' या लघुपटाचा रसिकांनी आस्वाद घेतला.   गावस्कर म्हणाल्या, सुनीताबाईंना एकदा एका खेड्यातून एका मुलाचे पत्र आले. 'आम्हाला शाळेतून काढून टाकतात, शेतात पाठवतात, कारखान्यावर पाठवतात', असे त्या मुलाने लिहिले होते. तेव्हापासून पन्नास पैशांची शाळा आणि शंभर रूपयांची शाळा अशी दरी पुलं आणि सुनीताबाईंना अस्वस्थ करून गेली. त्यामुळेच या दांपत्याची वेदना कमी करण्यासाठी आपण प्रयत्न केले पाहिजे, असे सतत वाटत रहाते. आपल्याला बरेच  काही करता आले पण जे करता आले नाही, त्यात लहान मुलांना गाणे शिकवता आले नाही, अशी खंत पुलंना वाटत होती. प्रभुणे म्हणाले, पुलंना भेटण्याची मला प्रचंड ओढ होती. ते पुण्यात आल्यानंतर बरेचदा मी त्यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या घरी गेलो. पण पुलंच्या लेखनात व्यत्यय नको, म्हणून कर्तव्यदक्ष सुनीताबाईंनी मला परत पाठवले. त्यानंतर माजगावकरांच्या माणूसचा एक विशेषांक मी काढला होता आणि त्यात 70-80 पानांचा एक लेख लिहिला होता. तेव्हा पुलंनी स्वत:हून माझी माहिती काढून मला घरी भेटायला बोलवले होते.* पुलंची ओळख ही एका तीव्र मतभेदातून झाल्याची आठवण डॉ. अवचट यांनी सांगितले. ते म्हणाले,  बालगंधर्व रंगमंदिराच्या जागेवरील झोपडपट्टया हटवून त्याठिकाणी रंगंमदिर उभारले पाहिजे, यासाठी पुलं आग्रही होते. त्यांच्या या भूमिकेला माझा विरोध होता. त्याविषयी साधना साप्ताहिकात दीर्घ लेख देखील लिहिला होता. पण कालांतराने आमच्यातील मतभेद दूर झाले आणि पुलं माझे आईबाप बनले. मतभेदाच्या काळातील कटूता कणभरही मनात न ठेवता त्यांनी आपलेसे केले. पुलं आणि सुनीताबाई प्रचंड हळवे होते.  मुक्तांगणचा जन्म त्यांच्याच प्रेरणेने झाला. 

टॅग्स :PuneपुणेP L Deshpandeपु. ल. देशपांडे