शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

आलाेकनाथ यांना मी टू वरील चित्रपटात घेण्यावरुन नेटकरी संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2019 21:12 IST

आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे.

पुणे : गेल्या वर्षी मी टू या चळवळीने अवघे सिनेमाविश्व हादरुन गेले हाेते. अनेक अभिनेत्रींनी दिग्दर्शक, अभिनेत्यांवर मी टू चे आराेप केले हाेते. निर्मात्या -लेखिका विनता नंदा यांनी आलाेकनाथ यांच्यावर बलात्काराचा आराेप केला हाेता. आता हेच आलाेकनाथ मी टू वर आधारीत में भी या सिनेमात चक्क न्यायाधीशाच्या भूमिकेत असणार आहेत. नासीर खान हा चित्रपट दिग्दर्शित करत आहेत. आलाेकनाथ यांच्यावर गंभीर आराेप असताना त्यांना त्याच विषयावरच्या चित्रपटात न्यायाधीशाची भूमिका देणे हे जखमेवर मीठ चाेळण्यासारखे असल्याचा आराेप करत तरुणाई याविराेधात फेसबुकवर आवाज उठवत आहे. चेंज डाॅट ओआरजी या वेबसाईटकडून त्यांच्याविराेधात पिटीशन साईन करण्यात येत असून त्यांच्यावर चित्रपटांमध्ये काम करण्यावर बंदी घालण्याची मागणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडे करण्यात येत आहे. 

विनता नंदा यांनी मीटू मोहिमेअंतर्गत आलोकनाथ यांच्यावर बलात्काराचा आरोप करणारी पोस्ट लिहिली होती. एका पाटीर्नंतर मी एकटी घरी जात होते. त्यांनी मला लिफ्ट देण्याची ऑफर दिली. मी त्याच्यावर विश्वास ठेवला आणि कारमध्ये बसले. त्यानंतरचे मला अंधूक आठवते. मला जेव्हा जाग आली तेव्हा मला वेदना होत होत्या. मी बेडवरुन उठू शकले नाही. याबद्दल मी माज्या मित्रांना सांगितले, परंतु सर्वांनी या घटनेला कायमचे विसरुन जाण्याचा सल्ला दिला, असे नंदा यांनी म्हटले होते. केवळ विनता नंदानंतर अन्य काही महिलांनीही आलोक नाथ यांच्यावर गैरतर्वनाचे आरोप केले होते.

त्यानंतरही त्यांना मी टू विषयावरच असलेल्या चित्रपटात घेतले जात आहे. त्यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त करण्यात येत आहे. याविषयी बाेलताना सायली सहस्रबुद्धे ही तरुणी म्हणाली, आलाेकनाथ यांच्यावर बलात्कारासारखे गंभीर आराेप आहेत. त्यांच्यावर मी टू या माेहिमेंतर्गत तीन महिलांनी लैंगिक शाेषणाचे आराेप केले आहेत.सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही त्यांच्यावर बंदी लादली आहे. असे असताना त्यांना मी टूवरच आधारीत सिनेमामध्ये न्यायाधीशाची भूमिका देणे हे महिलांचा अपमान करणारे आहे. त्यामुळे या विराेधात ऑनलाईन पिटीशन साईन करण्यात येत आहे. 

सिनेक्षेत्रात काम करणारा अविनाश सपकाळ म्हणाला, आलाेकनाथ यांच्यावर सिने अ‍ॅण्ड टीव्ही आर्टिस्ट असोसिएशननेही बंदी लादली आहे. त्यांच्यावर गंभीर आराेप आहेत, असे असताना त्यांना चित्रपटात घेणे अत्यंत चुकीचे आहे. त्यांच्यावर चित्रपटसृष्टीने बहिष्कार घालायला हवा. 

टॅग्स :AloknathआलोकनाथMetoo CampaignमीटूPuneपुणे