शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

... त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही : रघुनाथदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2021 17:32 IST

बारामती परिमंडलातील शेतकऱ्यांना दुप्पट, तिप्पट खोटी वीज बिले देण्यात आली आहेत.

बारामतीबारामती परिमंडलातील शेतकऱ्यांना दुप्पट, तिप्पट खोटी वीज बिले देण्यात आली आहेत. त्याचा जाब विचारण्यासाठी आज आम्ही बारामतीच्या उर्जा भवनवर आलो आहोत. राज्य शासनाने शेतकऱ्यांना १६ तास वीज देणे आवश्यक आहे. मात्र प्रत्यक्षात ८ तास शेतकऱ्यांना वीज मिळते. व वीज बिल मात्र १६ तासांचे मिळते. त्यामुळे शेतकऱ्यांचेच ८ तासांचे पैसे महावितरणकडे राहतात. त्यामुळे आम्ही वीज बिल भरणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी मांडली.

बारामती येथील उर्जाभवन परिसरात शेतकरी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.२२) बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. यावेळी माध्यमांशी बोलताना रघुनाथदादा पाटील यांनी आपली भूमिका मांडली.

पाटील म्हणाले, अनेक शेतकऱ्यांना महावितरणच्या वतीने खोटी व वाढवून वीज बिले दिली आहेत. तसेच सक्तीने वसुली केली जात आहे. वीज बिल भरले नाही तर वीजजोड तोडण्यात येत आहेत. एकीकडे शेतकरी आसमानी संकटाशी मुकाबला करून उभे राहू पाहत असताना सुलतानी संकटामुळे मात्र आता तो पुरता खचू लागला आहे. बारामती येथील महावितरणचे कार्यालय हे चार ते पाच जिल्ह्यांचे प्रमुख कार्यालय आहे. म्हणून येथे आंदोलन करत आहे. त्याचा कोणताही राजकीय अर्थ काढू नये, असे पाटील यांनी यावेळी स्पष्ट केले. 

यावेळी वर्षा काळे, शिवाजीराव नांदखिले,पांडुरंग रायते,अशोक खलाटे, रामभाऊ साखडे, बाळासाहेब घाटगे यांच्यासह शेतकरी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.-----------------------------

टॅग्स :BaramatiबारामतीFarmerशेतकरीmahavitaranमहावितरणState Governmentराज्य सरकार