शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
4
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
5
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
6
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
7
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
8
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
9
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
10
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
11
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
12
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
13
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
14
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
15
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
16
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
17
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
18
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
19
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
20
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?

... म्हणून 72 हजार जागांची 'मेगा भरती' होणारच नव्हती, कोल्हेंनी सांगितलं राज'कारण'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2019 17:12 IST

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा घेण्यात आली

मुंबई - विधानसभेची निवडणूक ही महाराष्ट्राच्या भविष्याची निवडणूक आहे. शेतकऱ्याचं भविष्य, तरुणाचं भविष्य, माताभगिनींची सुरक्षा कोणाच्या हातात द्यायची हे ठरविणारी ही निवडणूक आहे. केंद्रीयमंत्र्यांच्या सभेला लोकं येत नाहीत, पण माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या सभेला लोकं गर्दी करतात. पवारसाहेबांवरील आणि दत्ता भरणेंवरील प्रेम असल्यानेच ही गर्दी जमा होतेय. महाराष्ट्रातील सत्तापरिवर्तनाची ही नांदी आहे, असे डॉ. अमोल कोल्हेंनी म्हटले. 

इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी येथे उमेदवार दत्तात्रय भरणे यांच्या प्रचारासाठी अमोल कोल्हेंची सभा घेण्यात आली. या सभेत बोलताना, अमोल कोल्हेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीका केली. कितीही झालं तर कमळ हे चार पेपरातच गुंडाळलं जात, असे कोल्हेंनी म्हटले. राखणदार नेमायचा असेल तर दुसऱ्याच्या घरात चोरी केलेल्याला आपण नेमतो का?. मग, मेगा भरतीचं महापोर्टल करण्याचं काम त्या कंपनीला देण्यात आलं. ज्या कंपनीचं काम मध्य प्रदेशमधील व्यापम घोटाळ्यात ब्लॅकलीस्ट झालं होतं. म्हणजे मेगा भरती होणारचं नव्हती? काय झालं मेगा भरतीचं? असा प्रश्न उपस्थित करुन अमोल कोल्हेंनी भाजपा सरकारवर टीका केली. 

तसेच 19 वर्षे मंत्रीपद मिळाल्यानंतरही एखाद्या माणसाला कमळाचा आधार घ्यावा लागत असेल, तर 19 वर्षे काय केलं? असा प्रश्न कोल्हे यांनी हर्षवर्धन पाटील यांचं नाव न घेता विचारला. त्यानंतर, स्थानिक मुद्द्यांनाही कोल्हेंनी हात घातला.   

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेBJPभाजपाindapur-acइंदापूरAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019Mumbaiमुंबई