शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

...तर सुभाषचंद्र बोसदेखील स्वातंत्र्यसैनिक नाहीत - पी. साईनाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 09:45 IST

स्वातंत्र्यसैनिकाऐवजी एक चेहरा व्हॅक्सिनपासून ते बस तिकिटापर्यंत...

पुणे : ‘ज्या स्वातंत्र्यसेनानींनी भूमिगत राहून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. परंतु, ते तुरुंगात गेले नाहीत, म्हणून ते स्वातंत्र्यसैनिक ठरत नाही आणि त्यांना तो दर्जाही दिला जात नाही. हे खरंतर प्रचंड अन्यायकारक आहे. तसा नियम लावायचा झाला तर मग स्वातंत्र्यसेनानी सुभाषचंद्र बोस हेदेखील भूमिगत राहून आणि स्वयंसेवक म्हणून स्वातंत्र्यासाठी लढा दिला. तेदेखील या नियमानुसार स्वातंत्र्यसैनिक ठरणार नाहीत,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार व लेखक पी. साईनाथ यांनी सोमवारी पुण्यात केले.

मधुश्री प्रकाशनातर्फे प्रकाशित आणि पी. साईनाथ लिखित ‘अखेरचे शिलेदार’ या पुस्तकाचे प्रकाशन एस. एम. जोशी सभागृहात झाले. त्या वेळी साईनाथ बोलत होते. या पुस्तकाचा मराठी अनुवादन मेघा काळे यांनी केला. या वेळी ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस, इतिहासकार डॉ. श्रद्धा कुंभोजकर उपस्थित होते. या कार्यक्रमाला सांगली जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक कॅप्टन रामभाऊ लाड, गणपत यादव आणि हौसाबाई पाटील या तिन्ही स्वातंत्र्यसैनिकांचे कुटुंबीय उपस्थित होते. ज्या स्वातंत्र्यसैनिकांनी ब्रिटिशांची रेल्वे लुटली, त्यामध्ये सहभागी झालेल्यांची कथा या पुस्तकात आहे. ज्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा दर्जा मिळाला नाही आणि कुठेही त्यांची ओळख नोंदवली गेली नाही. त्यांना समोर आणण्याचे काम या पुस्तकातून करण्यात आले. सबनीस आणि कुंभोजकर यांनी देखील मनोगत व्यक्त केले. या पुस्तकासाठी पत्रकार संपत मोरे, नमिता वाईकर यांनीदेखील काम केले.

साईनाथ म्हणाले,‘‘देशातील अनेक जणांनी स्वातंत्र्यासाठी लढा दिला होत, ना की पेन्शन मिळविण्यासाठी. त्यांच्याकडून सरकार स्वातंत्र्यलढ्याचे प्रमाणपत्र कसे मागू शकते? जे देशासाठी लढले त्यांना पेन्शन नको होती, तर त्यांना स्वातंत्र्यसैनिकांचा आदर, सन्मान हवा होता. तो त्यांना आपण देऊ शकलो नाही. सरकार देऊ शकले नाही. ही शोकांतिका आहे.’’

स्वातंत्र्यसैनिकाऐवजी एक चेहरा व्हॅक्सिनपासून ते बस तिकिटापर्यंत : पी. साईनाथ

साईनाथ म्हणाले, आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतोय. त्यासाठी सरकारने ‘आजादी का महोत्सव’ संकेतस्थळ बनवले. त्यासाठी ११० कोटी खर्च केले; पण त्यामध्ये एकाही स्वातंत्र्यसैनिकाचे नाव नाही, कहाणी नाही, कोट नाही. देशाकडील लिस्टमध्ये स्वातंत्र्यसैनिक जिवंत आहेत पण त्यांचा एकही फोटो त्या संकेतस्थळावर नाही. हा कसला स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे? पण आज एक फोटो मात्र सर्वत्र पहायला मिळतो. तो फोटो व्हॅक्सिनवर छापला जातो, भविष्यात बस तिकिटावरही त्यांचा फोटो येईल. परंतु, स्वातंत्र्यसैनिकांचा फोटो मात्र कुठेही नाही.’’

स्वातंत्र्यसैनिकांसाठी नियमच वेगळे

स्वातंत्र्यलढ्यात कुरिअरचे काम करणारा माणूसदेखील स्वातंत्र्यसेनानी होता. ज्या महिलेने हाताने भाकरी करून स्वातंत्र्यासाठी लढा देणाऱ्यांना जेवण दिले. त्या महिलादेखील स्वातंत्र्यसेनानी आहेत; पण आपल्याकडे स्वातंत्र्यसैनिकाचे नियमच वेगळे आहेत, अशी खंत साईनाथ यांनी व्यक्त केली.

विश्वगुरूंना कोण प्रश्न करणार ?

आपल्या देशात कोविड काळात किती मृत्यू झाले, त्याविषयीदेखील चुकीची माहिती दिली गेली. देशात १० मिलियन मृत्यू झाल्याचे सांगितले गेले. जागतिक आरोग्य संघटनेने ४० लाख, लॅन्सेट संस्थेने ४५ लाख मृत्यू झाल्याचे सांगितले. पण आपल्या विश्वगुरूने मात्र ४ लाख ८६ हजार मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यांना कोणी प्रश्न विचारू शकत नाही, अशी टीका साईनाथ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोस