स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धोरणांची गरज
By Admin | Updated: March 22, 2016 01:53 IST2016-03-22T01:53:30+5:302016-03-22T01:53:30+5:30
जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट

स्मार्ट सिटीसाठी स्मार्ट धोरणांची गरज
पुणे : जागतिक हवामान बदलामुळे आपण वापरत असलेल्या नैसर्गिक स्रोतांचा किती वापर करायचा, याचा विचार करण्याची गरज आहे. त्यामुळे शाश्वत विकासाठी स्मार्ट सिटीतील तंत्रज्ञानापेक्षाही स्मार्ट धोरणे तयार करून ती राबवणे अधिक आवश्यक आहे, असे मत पर्यावरणतज्ज्ञ डॉ. प्रियदर्शनी कर्वे यांनी व्यक्त केले.
शारदा शक्ती या महिला संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या २५ व्या विज्ञान कट्टा या कार्यक्रमात ‘पुणे : स्मार्ट शहर’ या विषयावर डॉ. कर्वे बोलत होत्या. या वेळी शारदा शक्तीच्या राष्ट्रीय सचिव डॉ. लिना बावडेकर, डॉ. राजश्री कशाळकर उपस्थित होत्या. शारदाशक्तीच्या पुणे शाखेने दोन वर्षांपूर्वी विज्ञान कट्टा हा व्याख्यानाचा अभिनव उपक्रम सुरू केला. त्यातील २५वे व्याख्यान स्मार्ट सिटी या विषयावर आयोजित करण्यात आले होते.
त्या म्हणाल्या, की पुणे शहरातील दळणवळण आणि पाणीपुरवठा या दोन प्रकल्पांना शहर पातळीवर प्राधान्य असल्याचे केंद्राला दिलेल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा प्रकल्प आराखडा तयार केला आहे. स्मार्ट सिटीसाठी औंध-बाणेर-बालेवाडी भागाची निवड केली असून, या एकूण निधीतील ७५ टक्के खर्च या भागावर तर २५ टक्के खर्च अन्य शहरात करण्यात येणार आहे. मात्र, खर्चवसुलीसाठी सरचार्ज लावला तर तो फक्त त्या सेवा घेणाऱ्या नागरिकांना असेल की पूर्ण शहरातील सर्वांना द्यावा लागेल, याबाबतही संदिग्धता आहे. पुण्यात पीएमपीएमएल या कंपनीचा अनुभव जमेस असताना पुन्हा एकदा स्मार्ट सिटीसाठी विकासाचे हक्क स्वतंत्र कंपनीला देण्यात येणार आहेत, असे सांगून कर्वे म्हणाल्या, की या कंपनीवर महापालिकेचे नियंत्रण असणार नाही तर संचालक मंडळाचेच म्हणजे अधिकाऱ्यांचे नियंत्रण असेल. पीएमपीएमएलवर अधिकाऱ्यांचे नियंत्रण असूनही त्याचे म्हणावे तसे परिणाम का दिसत नाहीत, असा सवालही त्यांनी केला.