शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
4
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
5
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
6
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
7
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
8
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
9
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
10
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
11
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
12
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
13
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
14
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
15
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
16
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
17
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
18
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
19
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
20
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला

पर्यावरणदिनीच केली झाडांची कत्तल, खडकीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:00 IST

पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे, रवी बोजवारे या दोन युवकांनी बोर्डाविरोधात तक्रार करीत नाराजी व्यक्त केली आहे.

खडकी - पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे, रवी बोजवारे या दोन युवकांनी बोर्डाविरोधात तक्रार करीत नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाचे अधिकारी झाड कोणी कापले हे कबूल करीत नसून, एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खडकीत रहदारी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. त्या तुलनेत झाडांचे पुनर्रोपण होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हे प्रकार वेळीच थांबणे आवश्यक आहे. मात्र संबंधित यंत्रणांकडून आणि सामाजिक संस्था आणि संघटनांकडूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड करण्याबाबत त्यांच्याकडून आवाहनही करण्यात येते. मात्र संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.खडकीतील एक तरुण या विरोधात खडकी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, याबाबत पोलीस चौकीत अर्ज करा, असे पोलिसांनी त्याला सांगितले. याबाबत खडकीतील शिवराज प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मदन गाडे म्हणाले, ‘‘वृक्षसंवर्धन व जतन कायद्यानुसार वृक्ष तोडताना वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. एक झाड कापण्यापूर्वी त्या बदल्यात तीन झाडे लावणे गरजेचे असते. परंतु बोर्डाचे अधिकारी याबाबत उदासीन दिसून येतात.’’बोर्डाचे आरोग्य आणि उद्यान विभागाचे अधीक्षक भारत नाईक यांनी सांगितले, ‘‘झाडे कापण्याची रीतसर परवानगी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांच्याकडून घेऊनच झाडे कापली आहेत.’’आरोग्य निरीक्षक राजेंद्र वाईकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘मला काही माहीत नाही. मी त्या ठिकाणी सहज काय चालले आहे हे बघण्यासाठी गेलो होतो. तुम्ही संत किंवा वरंदानी यांना विचारा. माझा त्या गोष्टीशी काहीएक संबंध नाही.’’बोर्डाचे मुख्य अभियंता प्रेम वरंदानी यांनी याबाबत सांगितले, ‘‘माझा काहीही संबंध नाही.’’नागरीकरणाचा पर्यावरणाला फटका- खडकीतील रहदारीसह नागरीकरणही झपाट्याने वाढले आहे. नागरिकरणामुळे झाडांची कत्तल होऊन त्याचा पर्यावरणाला फटका बसत आहे. त्या तुलनेत वृक्षारोपण होताना दिसत नाही. झाडांचे पुनर्रोपण केले नाही म्हणून संबंधितांवर कारवाई झाल्याचे किंवा त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत नाही. वृक्षलागवड, पुनर्रोपण किंवा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी- शासकीय यंत्रणा किंवा खासगी संस्था आणि संघटनांकडून पावसाळ्यात दर वर्षी वृक्षारोपण करण्यात येते; मात्र त्यानंतर वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वृक्षारोपणानंतर त्यांचे संवर्धन होत नसल्याने रोपे सुकून जातात. यात आर्थिक नुकसानही होते. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीही वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. संवर्धनाची जबाबदारी घेत असल्यानंतरच वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.सामान्यांच्या पुढाकाराची गरज- वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी सामाजिक संस्था, संघटना, शासकीय यंत्रणेसह सर्वसामान्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन कामाचा एक भाग असल्याची भावना रुजली पाहिजे. तरच वृक्षसंवर्धन होईल. त्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.हिरवे खडकी शहर- खडकी शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. काही दिवसांपासून या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. याला आळा बसला पाहिजे. हिरवे खडकी शहर अशी ओळख कायम ठेवण्यासाठी शहरवासीयांनी पुढे आले पाहिजे आणि वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याenvironmentवातावरण