शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पर्यावरणदिनीच केली झाडांची कत्तल, खडकीतील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 03:00 IST

पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे, रवी बोजवारे या दोन युवकांनी बोर्डाविरोधात तक्रार करीत नाराजी व्यक्त केली आहे.

खडकी - पर्यावरण दिनालाच खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बाजारातील आकाशदीप सोसायटीसमोरील राणी लक्ष्मीबाई उद्यानातील दोन-तीन मोठी झाडे कापून वृक्षसंवर्धन व जतन कायद्याचे उल्लंघन केले आहे. या विरोधात खडकीतील पर्यावरणप्रेमी मदन गाडे, रवी बोजवारे या दोन युवकांनी बोर्डाविरोधात तक्रार करीत नाराजी व्यक्त केली आहे. बोर्डाचे अधिकारी झाड कोणी कापले हे कबूल करीत नसून, एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत.पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन्ही शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी असल्याने खडकीत रहदारी वाढली आहे. त्यामुळे रस्त्यांचे रुंदीकरण होत आहे. या रुंदीकरणात मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल केली जात आहे. त्या तुलनेत झाडांचे पुनर्रोपण होताना दिसत नाही. त्यामुळे पर्यावरणाची मोठ्या प्रमाणात हानी होत आहे. हे प्रकार वेळीच थांबणे आवश्यक आहे. मात्र संबंधित यंत्रणांकडून आणि सामाजिक संस्था आणि संघटनांकडूनही त्याकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. वृक्षप्रेमी आणि पर्यावरण प्रेमींकडून याबाबत सातत्याने आवाज उठविण्यात येत आहे. वृक्षसंवर्धन आणि वृक्षलागवड करण्याबाबत त्यांच्याकडून आवाहनही करण्यात येते. मात्र संबंधित यंत्रणेकडून याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे.खडकीतील एक तरुण या विरोधात खडकी पोलिसांकडे तक्रार करण्यासाठी गेला असता, याबाबत पोलीस चौकीत अर्ज करा, असे पोलिसांनी त्याला सांगितले. याबाबत खडकीतील शिवराज प्रतिष्ठानाचे अध्यक्ष मदन गाडे म्हणाले, ‘‘वृक्षसंवर्धन व जतन कायद्यानुसार वृक्ष तोडताना वन विभागाची परवानगी घेणे आवश्यक होते. एक झाड कापण्यापूर्वी त्या बदल्यात तीन झाडे लावणे गरजेचे असते. परंतु बोर्डाचे अधिकारी याबाबत उदासीन दिसून येतात.’’बोर्डाचे आरोग्य आणि उद्यान विभागाचे अधीक्षक भारत नाईक यांनी सांगितले, ‘‘झाडे कापण्याची रीतसर परवानगी बोर्डाचे अध्यक्ष ब्रिगेडियर यांच्याकडून घेऊनच झाडे कापली आहेत.’’आरोग्य निरीक्षक राजेंद्र वाईकर यांनी याबाबत सांगितले, ‘‘मला काही माहीत नाही. मी त्या ठिकाणी सहज काय चालले आहे हे बघण्यासाठी गेलो होतो. तुम्ही संत किंवा वरंदानी यांना विचारा. माझा त्या गोष्टीशी काहीएक संबंध नाही.’’बोर्डाचे मुख्य अभियंता प्रेम वरंदानी यांनी याबाबत सांगितले, ‘‘माझा काहीही संबंध नाही.’’नागरीकरणाचा पर्यावरणाला फटका- खडकीतील रहदारीसह नागरीकरणही झपाट्याने वाढले आहे. नागरिकरणामुळे झाडांची कत्तल होऊन त्याचा पर्यावरणाला फटका बसत आहे. त्या तुलनेत वृक्षारोपण होताना दिसत नाही. झाडांचे पुनर्रोपण केले नाही म्हणून संबंधितांवर कारवाई झाल्याचे किंवा त्यांना दंड ठोठावण्यात आल्याचे दिसून येत नाही. वृक्षलागवड, पुनर्रोपण किंवा संवर्धनाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येते.वृक्षसंवर्धनाची जबाबदारी घ्यावी- शासकीय यंत्रणा किंवा खासगी संस्था आणि संघटनांकडून पावसाळ्यात दर वर्षी वृक्षारोपण करण्यात येते; मात्र त्यानंतर वृक्षसंवर्धनाकडे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. वृक्षारोपणानंतर त्यांचे संवर्धन होत नसल्याने रोपे सुकून जातात. यात आर्थिक नुकसानही होते. केवळ प्रसिद्धी मिळविण्यासाठीही वृक्षारोपण करण्यात येत असल्याचे दिसून येते. अशा प्रकारांना आळा बसला पाहिजे. संवर्धनाची जबाबदारी घेत असल्यानंतरच वृक्षारोपण करण्यात यावे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून करण्यात येत आहे.सामान्यांच्या पुढाकाराची गरज- वृक्षारोपण आणि संवर्धनासाठी सामाजिक संस्था, संघटना, शासकीय यंत्रणेसह सर्वसामान्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे. केवळ उपक्रम म्हणून याकडे पाहण्याची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. आपल्या दैनंदिन कामाचा एक भाग असल्याची भावना रुजली पाहिजे. तरच वृक्षसंवर्धन होईल. त्यासाठी सर्वसामान्यांनी पुढे येणे आवश्यक आहे.हिरवे खडकी शहर- खडकी शहरात मोठ्या प्रमाणात झाडे आहेत. काही दिवसांपासून या झाडांची संख्या मोठ्या प्रमाणात घटत आहे. याला आळा बसला पाहिजे. हिरवे खडकी शहर अशी ओळख कायम ठेवण्यासाठी शहरवासीयांनी पुढे आले पाहिजे आणि वृक्षलागवड, वृक्षसंवर्धन केले पाहिजे, असे मत पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त केले जात आहे.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्याenvironmentवातावरण