रस्तारुंदीकरणासाठी दीडशेवर वृक्षांची कत्तल

By Admin | Updated: May 22, 2014 05:45 IST2014-05-22T05:45:38+5:302014-05-22T05:45:38+5:30

हरातून जाणार्‍या पुणे-नगर रस्त्याचे ४.२ कि मी लांबीचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी १०० वर्षे जुनी १५० ते २०० झाडे तोडण्यात आली आहेत

For slaughter of trees and trees | रस्तारुंदीकरणासाठी दीडशेवर वृक्षांची कत्तल

रस्तारुंदीकरणासाठी दीडशेवर वृक्षांची कत्तल

शिरूर : शहरातून जाणार्‍या पुणे-नगर रस्त्याचे ४.२ कि मी लांबीचे रुंदीकरणाचे काम सुरू असून, त्यासाठी १०० वर्षे जुनी १५० ते २०० झाडे तोडण्यात आली आहेत. तोडण्यात आलेल्या झाडांच्या जागी नवीन झाडे लावण्याचा मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाला सोयीस्करपणे विसर पडला आहे. रस्तारुंदीकरण करताना पर्यावरणाची हानी होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. ही काळजी गांभीर्याने घेतली जात नाही, याचा अनुभव शिरूर-पुणे व शिरूर-अहमदनगर रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम केल्यानंतर आला आहे. एक झाड तोडल्यास त्याबदल्यात तीन झाडे लावणे, हा नियम आहे. हा नियम असला, तरी पर्यावरणाच्या रक्षणासाठी स्वयंस्फूर्तीने संबंधित यंत्रणांनी झाडे लावली, तसेच जोपासली पाहिजेत. उपरोक्त दोन रस्त्यांच्या कामासाठी १०० ते १५० वर्षे जुन्या व त्याहूनही जुन्या हजारो झाडांची कत्तल करण्यात आली. शहराच्या वैभवात भर टाकणारी जुन्या वड, पिंपळ, निंब, चिंच ही बहारदार झाडे चौपदरी रस्त्यासाठी बळी गेली आहेत. मात्र, सा.बां. विभागाने चौपदरीकरणाच्या कामानंतर नवीन झाडे उभी राहतील, याची काळजी घेतलेली नाही. (वार्ताहर)

Web Title: For slaughter of trees and trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.