शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

‘वैकुंठा’तील धुराविरोधात नवी पेठेतील सहा सोसायट्या न्यायालयात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:11 IST

पुणे : वैकुंठ स्मशानभूमीतून होणाऱ्या वायुप्रदूषणाविरोधात नवी पेठेतील सोसायट्या पुढे सरसावल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी उच्च न्यायालयात एकत्रित ...

पुणे : वैकुंठ स्मशानभूमीतून होणाऱ्या वायुप्रदूषणाविरोधात नवी पेठेतील सोसायट्या पुढे सरसावल्या आहेत. प्रातिनिधिक स्वरूपात सहा सोसायट्यांनी उच्च न्यायालयात एकत्रित जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेत छायाचित्रांच्या माध्यमातून बेकायदेशीर चिमणी, धूर, महानगरपालिकेचा खोटारडेपणा व लोकांच्या जिवाला निर्माण झालेला धोका हे मुद्दे ठळकपणे मांडले आहेत. ‘आमचा परिसर आम्हाला प्रदूषणमुक्त हवा’ ही नागरिकांची प्रमुख मागणी आहे.

नवी पेठेतील आनंदबाग को-ऑपरेटिव्ह, सुंदरबन सहकारी गृहरचना संस्था, फाटक बाग सहकारी गृहरचना संस्था, प्रणव को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग, द सत्संग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग आणि अनुपम को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग या सहा सोसायटींच्या सचिव व अध्यक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. महानगरपालिका, महापालिकेचा विद्युत विभाग, राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळ, राज्य शासन आणि आरोग्य विभाग यांना यात प्रतिवादी करण्यात आले आहे. यापूर्वी नवी पेठेतील रहिवासी विक्रांत धनंजय लाटकर यांनी देखील उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

याचिकाकर्ते सुमित सबनीस म्हणाले, “वैकुंठ स्मशानभूमीतील सततच्या वाढत्या धुराचा त्रास आसपासच्या सोसायट्यांमधील दोन ते तीन हजार नागरिकांसह निवारा वृद्धाश्रममधील ज्येष्ठ नागरिकांनाही होत आहे?. स्मशानभूमीतील चिमणी आणि विद्युत दाहिनी जुनी झाली असून त्याची योग्य देखभाल दुरुस्ती केली जात नाही. त्यामुळे चिमणीतून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर पडतो. प्रदूषणावर कोणतेही नियंत्रण नाही. या चिमणीची क्षमता जर संपुष्टात आली असेल तर त्याचे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ झाले पाहिजे. प्रदूषण नियंत्रण करणारी यंत्रणा कार्यांन्वित केली पाहिजे.

महापौरांनी वैकुंठ स्मशानभूमीला भेट दिल्यानंतर, अजून तीन भट्ट्या येथे आणणार असल्याचे सांगितले. मात्र या वैकुंठ स्मशानभूमीतच का, असा आमचा प्रश्न आहे?. पुण्यात २१ स्मशानभूमी आहेत. आधीच वैकुंठ स्मशानभूमीवर प्रचंड ताण आला आहे?. ही स्मशानभूमी मध्यवर्ती भागात आहे?. सध्याच्या धुराच्या प्रदूषणावर नियंत्रण न आणता अजून ताण वाढवला जात आहे? आम्हाला प्रदूषणमुक्त करा. वैकुंठ स्मशानभूमीवर ताण देऊ नका अशी याचिकाकर्त्यांची मागणी आहे?.

----------------------------------------------

एनजीटीची सूचना

“नवी पेठेत वीस वर्षांपासून राहतो. गेल्या दोन वर्षांत वैकुंठ स्मशानभूमीमधून धुराचे प्रचंड प्रदूषण सुरू झाले आहे. यासंदर्भात ऑगस्ट २०२० मध्ये महापौर आणि आयुक्तांना १२० कुटुंबांच्या सह्यांचे पत्र दिले होते. परंतु काहीच हालचाल झाली नाही. महापालिकेच्या विद्युत विभागाने प्रदूषण होत नसल्याचे म्हटले. त्यानंतर राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाकडे (एनजीटी) दाद मागितली. तेव्हा एनजीटीने प्रदूषण मीटर बसवण्यासह काही सूचना पीएमसीला केल्या. मात्र, त्याची अंमलबजावणी महापालिकेने केली नाही. प्रदूषण नियंत्रण मंडळ किंवा केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाकडून मंजूर एजन्सीकडून तिमाही आधारावर प्रदूषणाची तपासणी करणे आवश्यक आहे.” -विक्रांत लाटकर, याचिकाकर्ते

----------