शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

डेक्कन, प्रगती एक्स्प्रेस आठ दिवस बंद राहणार; कोयना, सह्याद्रीही मुंबईपर्यंत नाही येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2019 15:18 IST

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे.

ठळक मुद्देपुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे.डेक्कन व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तब्बल आठ दिवस बंद राहणार. लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे.

पुणे - पुणे-मुंबईरेल्वे मार्गावरील वाहतूक ही तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान बंद राहणार आहे. पुण्याहून मुंबईला येणाऱ्या  डेक्कन व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या तब्बल आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळा ते कर्जतदरम्यान दुरुस्तीचे काम हाती घेतले जाणार आहे. या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी खबरदारी म्हणून वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. 

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावरील वाहतूक बंद असल्याने या काळात काही ट्रेनचे मार्ग हे बदलण्यात आले आहेत. कोयना, सह्यादी, महालक्ष्मी एक्स्प्रेस या मुंबईहून सुटतात मात्र या कालावधी दरम्यान त्या पुण्याहून सुटणार आहेत. पुणे-पनवेल-पुणे शटल सेवा रद्द करण्यात आली आहे. तसेच पुणे-भुसावळ ट्रेन ही मनमाड मार्गे धावणार आहे. प्रवाशांनी 26 जुलै ते 9 ऑगस्ट दरम्यान पर्यायी मार्गाचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

कोयना, सह्याद्री आणि हुबळी-मुंबई एक्स्प्रेस शुक्रवार (26 जुलै) ते 9 ऑगस्ट या कालावधीत केवळ पुण्यापर्यंतच धावणार आहेत. घाटक्षेत्रात काम सुरू असल्याने मध्य रेल्वेने या एक्सप्रेसबाबत निर्णय घेतला आहे. कोयना आणि सह्याद्री एक्सप्रेस मिरज-सातारा-पुणे यामार्गे मुंबईला जाते. हुबळी-मुंबई एक्सप्रेसचा बेळगाव-मिरज-सातारा-पुणे आणि मुंबई असा मार्ग आहे. मात्र, आता मध्य रेल्वेने या एक्सप्रेस 9 ऑगस्टपर्यंत केवळ पुण्यापर्यंत नेण्याचा आणि तेथून या मार्गावर पुन्हा सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतची कार्यवाही रेल्वे विभागाकडून शुक्रवारपासून केली जाणार आहे. पुणे-मुंबई मार्गावरील घाटाच्या क्षेत्रात काही काम करावयाचे असल्याने रेल्वे विभागाने पुण्यापर्यंत संबंधित एक्सप्रेस सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याची शक्यता पुणे विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य शिवनाथ बियाणी यांनी व्यक्त केली आहे.

 

टॅग्स :PuneपुणेMumbaiमुंबईrailwayरेल्वे