शहरं
Join us  
Trending Stories
1
हिमाचल प्रदेश: बिलासपूरमध्ये बसवर डोंगराचा ढिगारा कोसळला, १५ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू
2
निलेश घायवळचा पाय खोलात;बनावट पासपोर्ट प्रकरणासह आतापर्यंत ४ गुन्हे दाखल
3
भूस्खलन होऊन बसवर कोसळली दरड, १८ जणांचा मृत्यू, पण ३ मुलं आश्चर्यकारकरीत्या बचावली  
4
Dharashiv: मोठी बातमी! तातडीने मदत द्या, मागणी करणाऱ्या आंदोलक शेतकऱ्यांवर गुन्हे!
5
Bigg Bossचं घर सील, सर्व स्पर्धकांना लवकरच काढणार बाहेर, समोर आलं असं कारण 
6
ICC Womens World Cup 2025 : हेदर नाइटचा हिट शो! इंग्लंडनं बांगलादेशला पराभूत करत भारताला दिला धक्का
7
कस्तुरबा रुग्णालयातील पुस्तक वाटप प्रकरणाला वेगळं वळण, किशोरी पेडणेकरांचा तक्रारदारालाच प्रतिप्रश्न, म्हणाल्या...
8
धक्कादायक!! विरारमध्ये दोन तरूणांनी एकत्र संपवलं जीवन, १८व्या मजल्यावरून मारली उडी
9
अभिषेक शर्मा ICC पुरस्काराच्या शर्यतीत; त्याला कुलदीपसह झिम्बाब्वेचा गडी देणार टक्कर!
10
भर वर्गात महिलेसोबत आक्षेपार्ह चाळे करताना सापडला शिक्षक, मुलांनी रेकॉर्डे केला व्हिडीओ, कुठे घडली घटना
11
...अन् रागाच्या भरात पृथ्वी शॉनं विकेट घेणाऱ्या मुशीर खानवर उगारली बॅट; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
मार्कशीटवर दिसले स्वीमीजी... विद्यार्थ्याने ऑनलाइन केला अर्ज, विद्यापीठाने घातला वेगळाच घोळ
13
सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रकरणाचा ठाण्यात निषेध, मूक निदर्शने
14
६८ कोटींचा रस्ता ३ वर्षांपासून पूर्ण होईना; कल्याण-अंबरनाथ रस्त्याच्या कामाला अखेर मुहूर्त
15
सांगलीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का; आमदार पुत्राचा थेट भाजपमध्ये प्रवेश
16
पुणे अपघात प्रकरण: गौतमी पाटीलला अश्रू अनावर, म्हणाली- "सगळे मला ट्रोल करत सुटलेत..."
17
Navi Mumbai Airport: भव्य, दिव्य अन् नजर खिळवून ठेवणारं, पण नवी मुंबई विमानतळाबद्दल 'या' गोष्टी माहिती आहे का?
18
स्मृती मानधना फ्लॉप ठरली तरी टॉपला; आता चुका सुधारून हिट शो द्यावाच लागेल, नाहीतर...
19
ICU मध्ये असलेल्या भाजप खासदाराची ममता बॅनर्जींनी घेतली भेट; म्हणाल्या, "जास्त सीरियस नाहीये."
20
अहो आश्चर्यम! महिलेने कुत्र्याच्या नावाने केलं मतदान; पोलखोल होताच पोलीसही झाले हैराण

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:09 IST

यूपीएससी म्हणजे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व अन् खरेपणाची परीक्षा : पंकज देशमुख अभिजित कोळपे जे तुमच्या आतमध्ये आहे ते समोरच्याला दिसणे ...

यूपीएससी म्हणजे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व अन् खरेपणाची परीक्षा : पंकज देशमुख

अभिजित कोळपे

जे तुमच्या आतमध्ये आहे ते समोरच्याला दिसणे गरजेचे आहे. आक्रस्ताळेपणा, खोटारडेपणा, वेळ मारून नेणाऱ्या लोकांना शासन व्यवस्थेत जागा नाही. कारण तुमचे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि खरेपणा हेच तपासणारी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (यूपीएससी) परीक्षा आहे. त्यामुळे भाबडा आदर्शवाद किंवा भोळेपणा न ठेवता. प्रामाणिकपणे परीक्षेला सामोरे जा, असा मोलाचा सल्ला केवळ दुसऱ्याच प्रयत्नात संपूर्ण देशात १३७ वी रँक मिळवलेले पंकज देशमुख देतात. सातारा, अहमदनगर, उस्मानाबाद, नांदेड येथे उल्लेखनीय कार्याचा ठसा देशमुख यांनी उमटवला आहे. सध्या पुणे शहर पोलीस उपायुक्त (वाहतूक शाखा) झोन-४ येथे ते कार्यरत आहेत.

अभियांत्रिकी शाखेतून पदवी मिळवणारे पंकज देशमुख हे मूळचे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे. २०११ साली त्यांची भारतीय पोलीस सेवेत (आयपीएस) निवड झाली. आईवडिलांचा भक्कम पाठिंबा असतानाही पदवीनंतर सुरुवातीला दोन वर्षे नोकरी करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यानंतर ठरवून पुढील दोन वर्षांत यूपीएससीत यशस्वी व्हायचेच या निर्धार, नियोजनात परीक्षेची तयारी सुरू केली. पहिल्या प्रयत्नात अपयश आल्यानंतर अभ्यास पद्धतीत उलट दिशेने बदल केला. परीक्षेत काय विचारले जाते, त्याचे नेमकेपणाने उत्तरे लिहिले. त्यामुळे दुसऱ्याच प्रयत्नात घवघवीत यश मिळाल्याचे देशमुख सांगतात.

----

नवीन विद्यार्थ्यांना सल्ला

* प्रशासकीय सेवेत अनेक आव्हाने आहेत. आपल्याला ती पार करणे शक्य आहे का, हे तपासून पाहा. स्वतःचे प्रधानक्रम पाहा. आपल्याला यूपीएससीची परीक्षा देणे शक्य होईल का, की केवळ ऐकिव माहिती आणि प्रसिद्धीझोतात जीवन जगता येईल, या आशेने या परीक्षेकडे पाहत असाल तर तुम्ही स्वतःलाच फसवत आहात, असा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. त्यामुळे व्यवस्थित विचार करून निर्णय घ्या. कारण स्पर्धा परीक्षा हे काही अंतिम धेय्य असू शकत नाही. इतर परीक्षेसारखीच ही देखील एक परीक्षा आहे. त्यामुळे अपयश आल्यानंतर खचू नका. इतरही अनेक चांगली क्षेत्रे आहेत. ज्यात आपण चांगले काम करू शकतो. मात्र, यूपीएससी करणार असाल तर दोन-तीन वर्षांचे व्यवस्थित नियोजन करा. त्यात यश आले तर ठीक. अन्यथा वेगळे क्षेत्र निवडा. कारण यात गुरफटून गेल्यास विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील ऐन उमेदीची वर्षे वाया जाातात. मग नैराश्य येते. त्यामुळे अपयश जरी आले तरी खचू नका. नवीन संधी शोधा.

------

मुख्य परीक्षा/मुलाखतीची तयारी

* गेल्या दहा वर्षांत परीक्षेत खूप बदल झाले आहेत. ते समजून घ्या. वाचन, ज्ञान याबरोबरच ही तीन तासांची परीक्षा आहे. या तीन तासांत जे तुम्ही द्याल, त्यावरच तुम्ही यशाच्या जवळ जाणार आहात. मुख्य परीक्षेत वैकल्पिक विषय, सामान्य अध्ययनाचे पेपर सोडवण्याचा जास्तीत जास्त सराव करा. त्यासाठी व्यवस्थित नियोजन करा. नियमित वर्तमानपत्र वाचन, नोट्स काढा. महत्त्वाचे म्हणजे तीन तासांत मुद्देसूद उत्तरे लिहिण्याचा सराव करा.

* मुलाखतीची तयारी एक दिवस अथवा एका महिन्यात होत नाही. आपले व्यक्तिमत्त्व, चारित्र्य यात दैनंदिन सुधारणा करू शकता. ती एक निरंतर प्रक्रिया आहे. शासनाला सकारात्मक विचारांच्या प्रशासकांची नितांत गरज आहे. त्यामुळे तुमच्या आतमध्ये जे आहे, तेच यूपीएससीच्या पॅनेल प्रमुखांना दिसायला हवे. कारण ही मुलखात म्हणजे तुमचे चारित्र्य, व्यक्तिमत्त्व आणि खरेपणा तपासणारी परीक्षा आहे.

फोटो : पंकज देशमुख