शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

एकेक किरण तेजाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:13 IST

अभिजित कोळपे पूर्वी यूपीएससीचे मुख्य परीक्षेचे पेपर तुलनेने अवघड, कठीण होते. गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र या अभ्यासक्रमात मोठा बदल ...

अभिजित कोळपे

पूर्वी यूपीएससीचे मुख्य परीक्षेचे पेपर तुलनेने अवघड, कठीण होते. गेल्या पाच-सहा वर्षांत मात्र या अभ्यासक्रमात मोठा बदल झाला आहे. त्यामुळे आता पूर्व परीक्षा कठीण झाली आहे. त्यामुळे अभ्यास करताना विद्यार्थ्यांनी हा बदल लक्षात घ्यायला हवा. तसेच बदलत्या परीक्षा पद्धतीनुसार विद्यार्थ्यांनी बदलायला हवे. त्याचबरोबर आपल्याला गती कशात आहे, हे समजणे फार गरजेचे आहे. कारण यूपीएससी किंवा एमपीएससीच्या परीक्षेत प्रचंड स्पर्धा निर्माण झाली आहे. प्रत्येक विद्यर्थ्यांनी स्वत:ला ओळखत परीक्षा पद्धती, स्वत:च्या चुका समजून घ्याव्यात. तरच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत यशस्वी होता येईल, असे भारतीय आयकर विभागातील (आयआरएस) सहायक आयुक्त धीरज मोरे सांगतात.

मध्य प्रदेश येथील इंदूर येथे सहायक आयुक्त या पदावर धीरज मोरे हे कार्यरत आहेत. धुळे जिल्ह्यातील निमगूळ हे त्यांचे मूळ गाव आहे. वडील पाटबंधारे खात्यातून तर आई मुख्याध्यापिका या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. दोघांनीही प्रथमपासून स्पर्धा परीक्षांची तयारीसाठी पाठबळ, प्रोत्साहन दिले आहे. पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून त्यांनी एम. टेकमध्ये पदवी शिक्षण घेतले आहे.

यूपीएससीची तयारी करताना मी उलट्या क्रमाने अभ्यास केला. जनरली विद्यार्थी सुरुवातीला पूर्व परीक्षा, त्यानंतर मुख्य परीक्षेचा अभ्यास तर, शेवटी मुलाखतीची तयारी करतात. मी मात्र सुरुवातीला मुख्य परीक्षेचा बऱ्यापैकी अभ्यास केला. त्यानंतर पूर्व परीक्षेची तयारी सुरू केली. कारण नंतर प्रत्यक्ष परीक्षेच्या वेळी त्याची उजळणी करताना चांगला फायदा झाल्याचे धीरज मोरे सांगतात.

संदर्भ साहित्य वापरताना मुख्य परीक्षेसाठी सामान्य अध्ययन १, २, ३ आणि ४ या चारही पेपरसाठी मुख्यत: शालेय स्तरावरील इयत्ता पाचवी ते बारावीपर्यंतची मूळ पुस्तके वाचणे आवश्यक आहे. त्यानंतर प्रत्येक विषयाची बाजारात उपलब्ध असणाऱ्या विविध मान्यवर लेखकांची पुस्तके ही वरिष्ठ अधिकारी, मित्र अथवा संबंधित तज्ज्ञ शिक्षकांच्या सल्ल्याने यादी घेऊन ती वापरावीत. बाजारात एकाच विषयावर विविध लेखकांची खूप सारी पुस्तके असतात. त्यातील कोणतेही पुस्तके न घेता तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वाचावीत. अन्यथा तुमचा वेळ अनावश्यक वाया जाऊ शकतो. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे, असा सल्ला धीरज मोरे देतात.

पूर्व असो की मुख्य परीक्षा, या दोन्हीसाठी प्रचंड लेखन सराव गरजेचा आहे. कारण यूपीएससीच्या परीक्षेत पेपर सोडवण्यासाठी वेळेचे नियोजन अत्यंत आवश्यक आहे. बऱ्याच वेळा आपण खूप पुस्तके वाचलेले असतात. मात्र, प्रत्यक्ष अंतिम परीक्षेच्या वेळी त्या तीन तासांत ते सर्व मांडताना धावपळ होते. त्यामुळे पेपर सोडवताना अनेक मुद्दे राहून जातात. त्याचा परिणाम आपल्याला मिळणाऱ्या गुणांवर होत असताे.

मुलाखतीला सामोरे जाण्यापूर्वी डिटेल ॲप्लिकेशन फॉर्ममधील प्रत्येक शब्दाबद्दल आपल्याला माहिती हवी. त्यातील प्रत्येक शब्दाचे किती अर्थ निघतात. त्याचे काही वैशिष्ट्य आहेत का, हे आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. या फॉर्मच्या आधारेच यूपीएससीचे पॅनलमधील सदस्य हे प्रश्न विचारत असतात. त्या फॉर्ममध्ये भरलेली माहितीच जर आपल्याला माहिती नसेल किंवा आपल्याला त्यावर काही बोलता येत नसेल तर त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मुलाखतीला जाताना या गोष्टींवर काम करायला हवे.

फोटो : धीरज मोरे