शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रात्रीची हुल्लडबाजी बंद; बेजबाबदार वाहनचालकांवर पोलिसांची करडी नजर, मध्यरात्रीही कडक पहारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2022 10:36 IST

वाहनांवर पोलिसांची नजर मध्यरात्रीपर्यंत असणार

पुणे : शहरात साधारणत: रात्री नऊनंतर वाहतूक पोलिसांची ड्यूटी संपली आणि सिग्नल यंत्रणा बंद झाली की वाहनचालक सर्रास नियमांचे उल्लंघन करतात. अशा बेजबाबदार वाहनचालकांना आता 'ब्रेक' लागणार आहे. अशा वाहनचालकांवर आता सिग्नल आणि वाहतूक पोलिसांची नजर मध्यरात्रीपर्यंत असणार आहे.

शहरातील प्रमुख रस्त्यावर मध्यरात्रीही वाहतूककोंडी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी वाहतूक पोलिसांना मध्यरात्री दोनपर्यंत वाहतूक नियमनाचे नियोजन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना आता रात्रपाळीत काम करावे लागणार आहे. त्यानुसार वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये (शिफ्ट) काम विभागून देण्यात येणार आहे.

यापूर्वी वाहतूक पोलिसांना रात्रपाळीत काम करावे लागत नव्हते. सकाळी नऊ ते रात्री नऊपर्यंत वाहतूक पोलीस एकाच पाळीत काम करत होते. गेल्या काही वर्षांपासून शहरातील महत्त्वाचे रस्ते आणि चौकात मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. त्यामुळे शहरात वाहतूककोंडी होत असल्याचे पाहायला मिळते. अनेक रस्त्यांवर विकासकामे सुरू आहेत. त्यामुळे वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे, असे गुप्ता यांनी सांगितले.

मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असलेले भाग

कोरेगाव पार्क, मुंढवा, कोंढवा, जंगली महाराज रस्ता, बाणेर रस्ता, गणेशखिंड रस्ता, स्वारगेट, मार्केट यार्ड, हडपसर, कोथरूड भागातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असते. या विभागातील वाहतूक पोलिसांना मध्यरात्रीपर्यंत वाहतूक नियोजनाचे काम करावे लागणार आहे. तसेच या भागातील सिग्नल यंत्रणा मध्यरात्रीपर्यंत सुरू ठेवण्यात येणार आहेत. किरकोळ किंवा गंभीर अपघात झाल्यास रात्रपाळीत नियुक्तीस असलेल्या वाहतूक पोलिसांना वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत.

कोंडी सोडविण्यास प्राधान्य

पावसाळ्यात प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक विस्कळीत होते. मोठ्या संख्येने मोटारी रस्त्यावर येतात. त्यामुळे वाहतुकीचा वेग कमालीचा संथ होतो. झाडांच्या फांद्या तुटल्याने वाहतूक विस्कळीत होऊन ठिकठिकाणी कोंडी होते. खड्ड्यांमुळे वाहतूक संथगतीने सुरू असते. त्यामुळे पावसाळ्यात वाहतुकीचे नियोजन करण्यास प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील प्रमुख रस्त्यांवर मध्यरात्रीपर्यंत वर्दळ असल्याने वाहतूक पोलिसांना तीन पाळ्यांमध्ये वाहतूक नियोजनाचे काम विभागून देण्यात येणार आहे. त्यानुसार वाहतूक विभागाने पोलिसांच्या कामाचे नियोजन केले आहे. वाहनचालकांनी नियमांचे पालन करून वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे.

- अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड