शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

२८ मार्चला निघणार संभाजी भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 15:23 IST

कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांना निष्कारण गोवण्यात आले आहे या विचारासह २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार येणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठान संघटनेतर्फे पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ठळक मुद्दे२८ मार्च रोजी प्रत्येक जिल्ह्यात निघणार मोर्चा :जिल्हाधिकाऱ्यांना देणार निवेदन जिग्नेश मेवाणी, उमर खालिद आणि बी. जे. कोळसे पाटील यांच्या चौकशीची मागणी

पुणे :

संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे हे अत्यंत निस्वार्थीपणे राष्ट्रहिताचे काम करीत आहेत. या दोन्ही व्यक्ती जातपात न पाहता काम करत असून त्यांना कोरेगाव भीमा प्रकरणात निष्कारण गोवण्यात आले आहे असे सांगत त्यांच्या समर्थनार्थ २८ मार्च रोजी पुण्यासह महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात सन्मान मोर्चा काढणार असल्याची माहिती श्रीशिवप्रतिष्ठानचे पराशर मोने यांनी पत्रकार परिषदेत दिली. एकबोटे आणि भिडे गुरुजी यांच्यावरील गुन्हे मागे घेण्यात यावेत आणि ज्यांनी दाखल केले त्यांची चौकशी व्हावी अशा मागणीचे पत्र प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याला देण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या महामोर्चामध्ये बजरंग दल, समस्त हिंदू आघाडी, हिंदू जन जागृती, विविध गणेश  मंडळे सहभागी होणार आहेत असे स्पष्ट करण्यात आले. पुढे मोने म्हणाले की, ३१डिसेंबरला पुण्यातील शनिवारवाड्यावर भरवण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या निमंत्रण पत्रिकेतच विद्वेषपूर्ण लिखाण होते.त्यामुळे या परिषदेला उपस्थित असणाऱ्या आणि चिथावणीखोर भाषणे देणाऱ्या जिग्नेश मेवानी, उमर खालिद आणि बी.जी.कोळसे पाटील यांनाही चौकशीसाठी ताब्यात घ्यावे अशी आमची मागणी आहे. जिल्हाप्रमुख संजय जढार म्हणाले की, गुरुजींचा सदर प्रकरणाशी काडीमात्रही संबंध नाही. गेली अनेक वर्ष गुरुजी या परिसरातदेखील आलेले नाहीत. मात्र प्रसारमाध्यमांचा वापर करून राजकीय हेतूने हा अपप्रचार सुरु आहे. यामुळे राष्ट्रीय ऐक्यास बाधा पोहोचत असून राष्ट्राचे मोठे नुकसान होत आहे. याला विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे  अशी माहिती त्यांनी दिली. 

 

 

 

टॅग्स :PuneपुणेBhima-koregaonभीमा-कोरेगावSambhaji Bhideसंभाजी भिडे गुरुजीMilind Ekboteमिलिंद एकबोटे