शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:07 IST

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते

पुणे - आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान करताना तृतीयपंथीयांना धरुन आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यांच्या या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्याचे सांगत पुण्यातील तृतीयपंथी रस्त्यावर उतरले आहेत. येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनला तृतीयपंथीयांना रात्रीपासून आग्रह करत आमदार नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याला पाठिंबा देत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्डन पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी  पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्ड पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांशी संवाद साधला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी थेट गृहमंत्रालयावर निशाणा साधला. 

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, आजची घटना ही थेट गृहमंत्रालयाला लागलेला कलंक असल्याचे म्हणत पुण्यातील घटनेवरुन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पोलिसांना सध्या कोणतंच प्रकरण हाताळता येत नाही. गृहमंत्रालयाची त्यांच्यावरील पकड किती ढिली झालीय हे दिसून येतं. चर्नी रोडवरील वसतिगृहातील प्रकरण असेल, एका शासकीय वसतिगृहातील बलात्कार आणि खून प्रकरण असेल किंवा सामूहिक बलात्कार आणि हत्येची प्रकरणं पाहिली तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी असल्याचं ठरत आहेत. तसेच, आजचा पुण्यातील तृतीयपंथीयांवरील निरुपद्रवी हल्ला हा माणूसकीला काळिमा फासणार आहे, पण, गृहखात्यावर कंलक लावणारा आणि गृहखातं कलंकित करणारा आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. 

कलंकाला कंलक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?

उद्धव ठाकरेंनी बोलताना चूक केली असं अजिबात म्हणता येणार नाही, कलंकाला कलंक नाही तर काही अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिसवाल सुषमा अंधारे यांनी केला. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मृतांचा अंत्यविधी सुरू असताना एक पक्ष फोडून शपथविधी केला जातो हा कंलक नाही का, एक-एक पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली जाते हे कंलक नाही का, येथील महिला-भगिनी असुरक्षित आहेत, मुली गायब होतात हा कलंक नाही का, असे अनेक सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी केले.  

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस