शहरं
Join us  
Trending Stories
1
"आजच्या भेटीचा डायरेक्ट संबंध...!"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय शिरसाटांची पहिली प्रतिक्रिया, मनसे प्रमुखांना थेट ऑफरच दिली!
2
Raja Raghuvanshi Case: एक चूक अन् डाव पालटला! राजाच्या हत्येला आत्महत्या दाखवायचे होते; सोनमच्या एका चुकीमुळे झाले उघड
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
भाजपाची खेळी स्वत:वरच उलटली; १० पैकी ९ नगरसेवकांनी बनवला स्वतंत्र गट, CM फडणवीसांना धक्का
5
Interest Rate Cut : स्वस्त झालं होम आणि कार लोन, 'या' ३ बँकांनी ग्राहकांना दिलं मोठं गिफ्ट
6
पाकिस्तानच्या नागरिकांची अन्नासाठी वणवण अन् ११ कोटींचा शेफ बनवणार शाहबाज शरीफ यांचं जेवण!
7
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
8
Paytm च्या शेअरमध्ये १०% ची मोठी घसरण; सरकारच्या एका पोस्टनं स्टॉकमध्ये भूकंप
9
महापालिका निवडणुकीत ‘मराठी’ मुद्दा गाजण्याची चिन्हे! पाणी, जमीन, भाषा महत्त्वाची, देशाचे विभाजन होऊ नये; मनसेची भूमिका
10
कामाख्या देवीचं दर्शन ठरलं अखेरचं! राजा रघुवंशीचा मंदिरातील 'तो' फोटो आला समोर
11
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
12
ट्रम्प आणि मस्क यांच्यात 'पॅच-अप'? माफी मागताच एकाच रात्रीत संपत्तीत 'एवढी' वाढ!
13
पन्नाशी ओलांडली तरी इतक्या फिट कशा आहेत कविता मेढेकर? म्हणाल्या- "दोन मुलं झाली तरी..."
14
हनिमूनलाच केली नवऱ्याची हत्या; सोनम-राजा रघुवंशीसारखीच अंगावर काटा आणणारी घटना
15
IND vs ENG: कसोटी मालिकेआधी इग्लंडच्या उपकर्णधाराला विराट कोहलीची आठवण, म्हणाला...
16
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
17
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
18
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
19
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 

"कलंकला कलंक नाही तर अष्टगंध म्हणायचं का", अंधारेंचा गृहमंत्रालयावर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2023 15:07 IST

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते

पुणे - आमदार नितेश राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विधान करताना तृतीयपंथीयांना धरुन आक्षेपार्ह टिपण्णी केली. त्यांच्या या विधानामुळे आपल्या भावना दुखावल्याचे सांगत पुण्यातील तृतीयपंथी रस्त्यावर उतरले आहेत. येथील बंडगार्डन पोलीस स्टेशनला तृतीयपंथीयांना रात्रीपासून आग्रह करत आमदार नितेश राणेंविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. त्याला पाठिंबा देत शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्डन पोलीस स्टेशनला भेट देत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.  

पुण्यात मध्यरात्री बंडगार्ड पोलीस स्टेशनबाहेर तृतीयपंथी नितेश राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यासाठी आले होते. मात्र, पोलीस प्रशासनाने गुन्हा दाखल करून घेतला नाही. त्यामुळे तृतीयपंथींनी मध्यरात्रीपासून आंदोलन सुरु केले आहे. सकाळी आंदोलन सुरु असताना पोलीस आणि तृतीयपंथी यांच्यात झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी  पोलीस प्रशासन सरकारच्या दबावाला बळी पडत असल्याचा आरोपही आंदोलनकर्त्यांनी केला. तर, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनीही बंडगार्ड पोलीस स्टेशनला जाऊन पोलिसांशी संवाद साधला. त्यानंतर, पत्रकारांशी बोलताना सुषमा अंधारे यांनी थेट गृहमंत्रालयावर निशाणा साधला. 

शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी, आजची घटना ही थेट गृहमंत्रालयाला लागलेला कलंक असल्याचे म्हणत पुण्यातील घटनेवरुन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. पोलिसांना सध्या कोणतंच प्रकरण हाताळता येत नाही. गृहमंत्रालयाची त्यांच्यावरील पकड किती ढिली झालीय हे दिसून येतं. चर्नी रोडवरील वसतिगृहातील प्रकरण असेल, एका शासकीय वसतिगृहातील बलात्कार आणि खून प्रकरण असेल किंवा सामूहिक बलात्कार आणि हत्येची प्रकरणं पाहिली तर गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे अपयशी असल्याचं ठरत आहेत. तसेच, आजचा पुण्यातील तृतीयपंथीयांवरील निरुपद्रवी हल्ला हा माणूसकीला काळिमा फासणार आहे, पण, गृहखात्यावर कंलक लावणारा आणि गृहखातं कलंकित करणारा आहे, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी देवेंद्र फडणवीसांवर टीका केली. 

कलंकाला कंलक नाही तर अष्टगंध म्हणायचं का?

उद्धव ठाकरेंनी बोलताना चूक केली असं अजिबात म्हणता येणार नाही, कलंकाला कलंक नाही तर काही अष्टगंध म्हणायचं का, असा प्रतिसवाल सुषमा अंधारे यांनी केला. समृद्धी महामार्गावरील अपघातानंतर मृतांचा अंत्यविधी सुरू असताना एक पक्ष फोडून शपथविधी केला जातो हा कंलक नाही का, एक-एक पक्ष फोडून लोकशाही धोक्यात आणली जाते हे कंलक नाही का, येथील महिला-भगिनी असुरक्षित आहेत, मुली गायब होतात हा कलंक नाही का, असे अनेक सवालही यावेळी सुषमा अंधारे यांनी केले.  

टॅग्स :Sushma Andhareसुषमा अंधारेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसShiv SenaशिवसेनाPoliceपोलिस