शहरं
Join us  
Trending Stories
1
दुर्गापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन तरुणांना अटक; सुवेंदू अधिकारी यांनी केली एन्काउंटरची मागणी
2
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
3
₹५,००० वाचवा, लखपती व्हा! 'या' सरकारी योजनेत दरमहा गुंतवणूक करुन जमा होईल २७ लाखांचा निधी
4
अतूट नातं! मृत्यूशी झुंज देणाऱ्या नवऱ्याचा वाचवला जीव, बायकोने दिली किडनी, म्हणाली...
5
मृण्मयी देशपांडेची 'मनाचे श्लोक' चित्रपटाबद्दल मोठी घोषणा; पोस्ट शेअर करत म्हणाली-"अतिशय दु:खद..."
6
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
7
मोठी दुर्घटना! टेकऑफनंतर गोल गोल फिरलं, झाडावर आदळलं; हेलिकॉप्टर क्रॅशचा भयंकर Video
8
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
9
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
10
गोंदिया जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पट्टेदार वाघ, ३ तास चालली रेस्क्यू मोहीम
11
घरात घुसून कुटुंबावर जीवघेणा हल्ला, तिघांविरोधात गुन्हा, पिस्तुलासह रॉडने हल्ला 
12
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
14
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
15
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
16
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
17
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
18
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
19
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
20
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन

काळाची पावले ओळखून व्यावसायिकता स्वीकारायला हवी : दिलीप माजगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2019 08:00 IST

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा 'मसाप जीवनगौरव' पुरस्कार ज्येष्ठ लेखक, संपादक आणि प्रकाशक दिलीप माजगावकर यांना जाहीर झाला आहे...

ठळक मुद्देयेत्या २७ मे रोजी तो प्रदान केला जाणार

- प्रज्ञा केळकर-सिंग- 

* प्रकाशनाच्या सद्यस्थितीबाबत काय सांगाल?- तूर्तास काही प्रमाणात वाचकवर्ग कमी झाल्यासारखा वाटत असला तरी ही स्थिती कायमस्वरूपी राहणार नाही. अशा पद्धतीने चढ-उतार येतच असतात. त्यामागील काही कारणे तात्कालिक, तर काही कायमस्वरूपी असतात. तंत्रज्ञान हे सध्याचे सर्वात प्रभावी कारण आहे. तंत्रज्ञानामध्ये होत असलेल्या बदलामुळे वाचनाची माध्यमे बदलत आहेत. ऑडिओ बूक, ई बूक अशी माध्यमे वाचकांना उपलब्ध झाली आहेत. या माध्यमांचा लक्षणीय परिणाम मूळ वाचकवर्गावर मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पुढील काळात या माध्यमांकडे दुर्लक्ष करता येणार नाही, असे पुरेसे संकेत आता मिळू लागले आहेत. वाचक वगार्तील ही स्थित्यंतरे कमी-जास्त प्रमाणात सुरू असतात. त्यामुळे भविष्यात पुस्तकांचा वाचक आणि या नवीन माध्यमांचा वाचक अशी आशादायी परिस्थिती नक्कीच पहायला मिळेल.

 * रॉयल्टी, कॉपी राईट अशांतून बरेचदा प्रकाशक-लेखक यांच्यात वाद उदभवतात. यावर उपाय काय?- प्रकाशक-लेखक संबंध कायम चांगलेच असतात. परस्पर संबंधात ज्या ५-१० टक्के अडचणी येतात, त्या टाळण्यासाठी सर्वांनी काळाची पावले ओळखून याकडे व्यावसायिक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. पारदर्शक पद्धतीने व्यवहार करणे आणि त्यासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर गोष्टींचा आधार घेतल्यास भविष्यातील अडचणी टाळता येऊ शकतात. आजवर प्रकाशन व्यवसायातील काम केवळ विश्वासावर सुरू होते. मात्र, आता व्यवसायिक दृष्टीकोन स्वीकारून कागदपत्रे तयार करणे, नव्या कॉपी राईटचे नियम समजावून घेणे दोन्ही बाजुंनी गरजेचे बनले आहे.

* एकीकडे शहरी भागातील वाचकांना मुबलक साहित्य उपलब्ध होत असताना, ग्रामीण भागातील वाचकांची साहित्यिक भूक भागवण्यात प्रकाशक कमी पडतात, असे वाटते का?- गेल्या दहा वर्षांमध्ये शहरातील पुस्तक प्रदर्शनांचा प्रतिसाद कमी झाला आहे. त्यामुळे पुस्तकांची प्रदर्शने भरवणा-या संस्थानी हे प्रमाण कमी केले आहे. ग्रामीण भागातील वाचकांची सांस्कृतिक भूक भागवण्यासाठी महत्वाच्या चार-पाच प्रकाशकांनी एकत्र येऊन नवीन वाचकवर्ग मिळवण्यासाठी खेडेगावापर्यंत पोहोचले पाहिजे. ऐंशीच्या दशकामध्ये अशा पद्धतीची लाट पहायला मिळाली होती. ग्रंथमेळे, ग्रंथजत्रा, लेखक-वाचक संवाद, अभिवाचन यांसारख्या उपक्रमांमधून ग्रामीण भागात साहित्य चळवळ रुजवता येईल. वाढते खर्च पाहता आता एकेक दोन-दोन प्रकाशकांना ग्रामीण भागात पोहोचणे अवघड होते आहे. त्यामुळे फिरत्या पुस्तक जत्रा, फिरते प्रदर्शने यासाठी प्रकाशकांना सामूहिक प्रयत्न करावे लागतील.

* दुर्मिळ साहित्याच्या संवर्धनासाठी प्रकाशकांच्या पातळीवर कोणते प्रयत्न आवश्यक आहेत?- साहित्य अजरामर असते. काळाच्या ओघात काही साहित्य प्रकार मागे पडतात. वाचकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन चांगल्या दुर्मिळ पुस्तकांचे पुर्नमुद्रण विविध योजनांच्या माध्यमातून प्रकाशक हाती घेऊ शकतात. डिजिटायझेशनच्या माध्यमातून साहित्याच्या जतन आणि संवर्धन प्रक्रियेला हातभार लागू शकतो. त्यादृष्टीने प्रकाशकांच्या पातळीवर प्रयत्न सुरूच आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषद