शहरं
Join us  
Trending Stories
1
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
2
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
3
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
4
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
5
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
6
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
7
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
8
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
9
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
10
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
11
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
12
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
13
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
14
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...
15
संजय कपूर यांच्या पार्थिवावर कुठे आणि कधी होणार अंत्यसंस्कार? 'या' कारणामुळे होतोय उशीर
16
Sonam Raghuwanshi: कॉर्पोरेट लूक ते साखरपुड्यातील शृंगार! राजाच्या हत्येतील आरोपी सोनमचे पहिल्यांदाच समोर आले फोटो
17
June Panchak 2025: आजपासून पाच दिवस पंचक योग; महत्त्वाचे काम तसेच प्रवास टाळता आला तर उत्तम!
18
जिओचे नेटवर्क डाऊन झाले! इंटरनेट गायब, कॉल ड्रॉपही...; फायबरचे ग्राहकही वैतागले... 
19
Share Market Update : बाजारात जोरदार तेजी! सेन्सेक्स ८१,००० पार, 'या' शेअर्सनी दिला बंपर रिटर्न! कुठे झाली घसरण?

Vikram Gokhale: '...तेव्हा फडणवीस मला चूक झाली म्हणाले होते'; विक्रम गोखलेंचा मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 16:16 IST

vikram gokhale: शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले.

पुणे-

शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र यावेत यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सांगत मुख्यमंत्रिपदाबाबतच्या वादावर देवेंद्र फडणवीसांना रोखठोक प्रश्न मी तेव्हा विचारले होते, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले. ते पुण्यात ब्राम्हण महासंघाद्वारे त्यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. विक्रम गोखले यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना राजकीय मुद्द्यांवर रोखठोक विधानं केली. ज्या मुख्यमंत्रीपदावरुन भाजपा आणि शिवसेना दुरावले त्या प्रसंगाबाबत विक्रम गोखले यांनी एक गौप्यस्फोटच यावेळी केला. 

"शिवसेना-भाजपा एकत्र यावेत यासाठी मी प्रयत्न करत आहे. युती झाली त्याबाबत मी देवेंद्र फडणवीसांना थेट विचारणा केली होती. शिवसेनेला अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद का दिलं नाही? मुख्यमंत्रीपद अडीच वर्षांसाठी दिलं असतं तर काय बिघडलं असतं? असा प्रश्न मी त्यांना विचारला होता. त्यातही आधीची अडीच वर्ष तुम्हाला हवी की नंतरची? असंही मी त्यांना म्हटलं होतं", असं विक्रम गोखले म्हणाले. त्यावर फडणवीसांची प्रतिक्रिया काय होती? असं विक्रम गोखले यांना विचारण्यात आलं असता फडणवीसांनी झाली चूक असं म्हटलं होतं, असा दावा गोखले यांनी केला. 

एकट्या फडणवीसांची चूक नाही"फडणवीसांनी तेव्हा झाली चूक असं मला म्हटलं होतं. पण खरंतर ही एकट्या फडणवीसांची चूक नाही. त्यांच्यात जे काही झालं होतं त्याबाबत त्यांनी जनतेला विश्वासात घ्यायला हवं होतं. लोकांना तुम्ही फसवू शकत नाही. कारण मग लोक कधीतरी त्याची प्रचंड शिक्षा तुम्हाला करतात. ती आता आपण भोगत आहोत. मी तोंड दाभणाने बांधून घेत नाही आणि  म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाला उत्तर द्यायला बांधील नाही. मी फाडफाड बोलणारा माणूस आहे. मी वरचे आदेश वगैरे झुगारुन देतो", असं गोखले म्हणाले. 

भाजपा-शिवसेनेनं एकत्र यायला हवं"शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे", असंही विक्रम गोखले म्हणाले आहेत. 

"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना