शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीचंद पडळकरांचे वादग्रस्त विधान: अजित पवारांनी टोचले कान; म्हणाले, 'भाजपची जबाबदारी फडणवीसांची'
2
फायद्याची बातमी! पेन्शनचा १००% पैसा टाका इक्विटीत; १ ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम; पैसे कुठे आणि किती वाढत आहेत हे समजणे सोपे होणार
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानवर रात्री १.३० वाजताच स्ट्राइक का केले?; CDS चौहान यांचा खुलासा
4
..तर महाराष्ट्रात एक नवीन 'खिचडी' पकेल! एकत्र राहण्यासाठी वरून खूपच दबाव आला तर बंडखोरीचे पेव फुटेल
5
आयफोन १७ च्या खरेदीवर ईएमआय किती येईल? जाणून घ्या बँक आणि कॅशबॅक ऑफर्स!
6
सात महिन्यांमध्ये राज्यात वाढले १४ लाख मतदार; राजकीय पक्षांकडून कोणताच आक्षेप नाही
7
iPhone 17: आयफोन १७ मालिकेची विक्री आजपासून सुरू; मुंबईतील अ‍ॅपल स्टोअरबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी
8
सरकारचे आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर, वितरण २२ सप्टेंबर रोजी मुंबईत होणार; जाणून घ्या यादी
9
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
10
आजचे राशीभविष्य, 19 सप्टेंबर 2025: धनलाभ होण्याचा योग; कोणत्या राशींसाठी आजचा दिवस आनंदाचा?
11
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
12
एका आठवड्यात खड्डे बुजवा, कंत्राटदारांवर कारवाई करा; उच्च न्यायालयाचे महापालिकांना आदेश, राज्यभरात १२ जणांचा मृत्यू
13
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
14
ओला उबरचे भाडे प्रति किमी २२.७२ रुपये, मागणीच्या वेळेत १.५ पट वाढ करण्यास परवानगी
15
गेल्या वर्षभरात महाराष्ट्रात ५५ हजार किलो गांजा जप्त; सिंथेटिक अमली पदार्थांच्या तस्करीत ६ पटीने वाढ; 'एनसीबी'चा अहवाल
16
रविवारी 'खंडग्रास' पाहण्यावर लागणार 'ग्रहण'; दा. कृ. सोमण यांचे मत; भारतीयांची होणार निराशा
17
'महापालिका निवडणुकीत महायुतीचाच झेंडा फडकणार': एकनाथ शिंदे
18
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
19
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
20
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर

Shivaji Maharaj : राजनाथसिंहांच्या वक्तव्याचा निषेध, अमोल कोल्हेंनी सांगितला जाज्वल्य इतिहास

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:07 IST

Shivaji Maharaj : संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

ठळक मुद्देसंरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला.

मुंबई - केंद्रीयमंत्री राजनाथ सिंह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या विधानावरुन आता वाद निर्माण झाला आहे. त्यामुळे, शिवाजी महाराजांच्या स्वराज्य निर्माणतेचा जाज्वल्य इतिहास सांगत खासदार खासदार अमोल कोल्हे यांनी संरक्षणमंत्र्यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. राजमाता जिजाऊ, समर्थ रामदास आणि दादोजी कोंडदेव यांनी खेळांच्या माध्यमातून बालशिवाजींना डावपेच शिकवले आणि पुढे ते छत्रपती शिवाजी महाराज म्हणून राष्ट्रनायक बनले, असा दावा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी केला होता.   

संरक्षणमंत्र्यांच्या या विधानानंतर राज्यात त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. खासदार अमोल कोल्हे यांनीही व्हिडिओच्या माध्यमातून त्यांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवला. तसेच, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा आणि जाज्वल्य इतिहास जगभर सांगण्याची गरजही व्यक्त केली. ''केंद्रीयमंत्री राजनाथसिंह यांनी केलेलं धक्कादायक विधान माध्यमातून माझ्या वाचनात आलं, या वक्तव्याचा मी निषेध करतो. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्रनायक ठरले ते त्यांनी निर्माण केलेल्या रयतेच्या कल्याणकारी राज्यामुळे आणि स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे,'' असं माझं प्रामाणिक मत असल्याचं कोल्हेंनी म्हटलं. 

महाराजांचा जाज्वल्य इतिहास जगभर पोहोचवणे गरजेचं

आपण इतिहासाच्या पानांचा धांडोळा घेतला तर, सुरुवातीच्या काळात स्वराज स्थापनेच्या प्रयत्नांविषयी दादोजी कोंडदेव यांची नाराजी होती. आधीच्याही दरबारात शहाजी महाराज यांना त्याचा त्रास तर होणार नाही ना, ही स्वामीनिष्ठा त्यामागे होती हे सिद्ध होतंय. समर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट 1971 साली झाली, असा ऐतिहासिक दाखला सापडते, त्यावेळी स्वराज्य पूर्णत्वाला आलं होतं, असा इतिहास कोल्हे यांनी सांगितला. तसेच, संरक्षणमंत्र्यांनी जे विधान केलं. ते चुकीच्या माहितीमुळे किंवा चुकीच्या फीड्समुळे केल्याची शक्यता नाकारता येत नाही. पण, यामुळे आपला जाज्वल्य इतिहास नि:पक्ष आणि तर्कसंगतीने देशभर, जगभर सांगण्याची गरज वाटते, असेही अमोल कोल्हे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Dr. Amol Kolheडॉ अमोल कोल्हेRajnath Singhराजनाथ सिंहShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजPuneपुणे