शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टी उधळल्यानंतर रोहिणी खडसेंच्या घराची झाडाझडती, पोलिसांना मिळाल्या तीन गोष्टी 
4
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
5
भन्साळींच्या या सिनेमासाठी २ मराठी अभिनेत्यांनीही दिलेली ऑडिशन, वैभव तत्ववादीने मारली 'बाजी'
6
संजय कपूर यांच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीवरून गृहकलह? कोण आहे प्रिया सचदेव? अचानक का आली चर्चेत?
7
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
8
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
9
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
10
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
11
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
12
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
13
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
14
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
15
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
16
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
17
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
18
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
19
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
20
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर

Vijay Shivtare: तेवढी त्यांची ताकद नाही; अजित पवारांवर शिवतारेंचा हल्लाबोल, शिंदेंविषयी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:38 IST

आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता.

Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचाही विस्तार झाला असून सत्ताधारी महायुतीतील विविध नेत्यांनी जाहीरपणे आपल्याच पक्षाविरोधात हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता. मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर आता विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली असून त्यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा राग शांत झाल्याचं दिसत आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.

"दोन दिवस आधी मला मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना दिली असती तर काहीच वाटलं नसतं. पण माझे सर्व कुटुंबीय आले होते. सोबतच मतदारसंघातील कार्यकर्ते ३०० हून अधिक गाड्या घेऊन नागपूरला आले होते. या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता होती. मला वैयक्तिक हितासाठी मंत्रिपद नको होते, तर राज्याच्या विकासात योगदान देण्याची माझी क्षमता आहे आणि त्यासाठी मंत्रिपद मिळावं, अशी माझी इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. मी आता सर्व कार्यकर्त्यांना समजावलं आहे. शेवटी मी शिवसेना हे माझं कुटुंब समजतो," असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्याविषयी नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांविषयी काय म्हणाले विजय शिवतारे?

तुमचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, असा प्रश्न पत्रकारांकडून विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर "अजित पवार यांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत," असं शिवतारे म्हणाले. तसंच अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राचा बिहार झाला, शिवतारे काय म्हणाले होते?

"महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे," असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर केला होता. "मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४purandar-acपुरंदर