शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रकरण शमविले? अजित पवार दोनदा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, पार्थ पवार 'ती' जमीन मागे देण्याची शक्यता 
2
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण
3
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
4
'या' सरकारी बॉन्डने ८ वर्षांत दिला तब्बल ३१६% परतावा; मॅच्युरिटीवर मिळतोय 'टॅक्स फ्री' नफा!
5
अंपायरच्या लेकीसाठी ICC नं नियम बदलला? प्रतीकाच्या गळ्यात झळकला विश्वविजेतेपदाचा 'दागिना'
6
Smartphone Hacking : व्हॉट्सअ‍ॅपवर RTOचा मेसेज आला? चुकूनही त्यावर क्लिक करू नका! नाहीतर...
7
'अमेरिका, चीन, पाकिस्तान कोणीही आपल्यावर दबाव आणू शकत नाही'; अणुचाचणीच्या चर्चेवर राजनाथ सिंह यांचं मोठं विधान
8
धक्कादायक! मुंग्यांच्या भीतीने गमावला जीव, कोणत्या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हे होतं?
9
Hanuman Upasana: दिवसाची सुरुवात 'या' मंत्राने कराल तर २१ दिवसांत फरक बघाल!
10
Indonesia: इंडोनेशियात नमाज वेळी मशिदीत स्फोट; ५० हून अधिक जण जखमी!
11
राहुल गांधींच्या ‘या’ आवडत्या शेअरची बाजारात धूम; कंपनीची एकाच दिवसात १७ हजार कोटींची कमाई
12
Typhoon Kalmaegi : खिडकीच्या काचा फुटल्या, घरं कोसळली; व्हिएतनाममध्ये कलमेगी वादळाचं थैमान, ५ जणांचा मृत्यू
13
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
14
Rahul Gandhi: "मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
15
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
16
Dental Care: टार्टर आणि प्लाक दातांचे मुख्य शत्रू, करू शकतात गंभीर नुकसान; वेळीच घ्या 'ही' काळजी 
17
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
18
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
19
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट

Vijay Shivtare: तेवढी त्यांची ताकद नाही; अजित पवारांवर शिवतारेंचा हल्लाबोल, शिंदेंविषयी काय म्हणाले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 17:38 IST

आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता.

Shiv Sena Eknath Shinde ( Marathi News ) : मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजीचाही विस्तार झाला असून सत्ताधारी महायुतीतील विविध नेत्यांनी जाहीरपणे आपल्याच पक्षाविरोधात हल्लाबोल केल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये पुरंदरचे शिवसेना आमदार विजय शिवतारे यांचाही समावेश आहे. आम्ही नेत्यांचे गुलाम नाहीत, असं म्हणत नागपूर येथील विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सोडून आमदार शिवतारे यांनी थेट आपला मतदारसंघ गाठला होता. मतदारसंघात विविध कार्यक्रमांना उपस्थित राहिल्यानंतर आता विजय शिवतारेंनी पुन्हा एकदा आपली भूमिका मांडली असून त्यांचा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याविषयीचा राग शांत झाल्याचं दिसत आहे. मात्र त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर मात्र निशाणा साधला आहे.

"दोन दिवस आधी मला मंत्रिपद मिळणार नसल्याची कल्पना दिली असती तर काहीच वाटलं नसतं. पण माझे सर्व कुटुंबीय आले होते. सोबतच मतदारसंघातील कार्यकर्ते ३०० हून अधिक गाड्या घेऊन नागपूरला आले होते. या सगळ्यांचा हिरमोड झाला. त्यामुळे प्रचंड अस्वस्थता होती. मला वैयक्तिक हितासाठी मंत्रिपद नको होते, तर राज्याच्या विकासात योगदान देण्याची माझी क्षमता आहे आणि त्यासाठी मंत्रिपद मिळावं, अशी माझी इच्छा होती. पण ती पूर्ण झाली नाही. मी आता सर्व कार्यकर्त्यांना समजावलं आहे. शेवटी मी शिवसेना हे माझं कुटुंब समजतो," असं विजय शिवतारे यांनी म्हटलं आहे. तसंच एकनाथ शिंदे यांच्याविषयी नाराजी नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

अजित पवारांविषयी काय म्हणाले विजय शिवतारे?

तुमचा मंत्रिमंडळातून पत्ता कट करण्यात अजित पवारांचा हात आहे का, असा प्रश्न पत्रकारांकडून विजय शिवतारे यांना विचारण्यात आला होता. त्यावर "अजित पवार यांची एवढी ताकद नाही. एकनाथ शिंदे असे कोणाचे ऐकून निर्णय घेत नाहीत," असं शिवतारे म्हणाले. तसंच अनेक जण वाईटावर असताना आम्ही २७ हजारांचे मताधिक्य मिळवले, असा टोलाही शिवतारे यांनी लगावला आहे.

महाराष्ट्राचा बिहार झाला, शिवतारे काय म्हणाले होते?

"महाराष्ट्राचा बिहार झाला आहे. कारण इथं प्रादेशिक समतोल न राखता जातीय समतोल राखण्यासाठी प्राधान्य दिल्याचं दिसत आहे," असा हल्लाबोल विजय शिवतारे यांनी मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर केला होता. "मला मंत्रिपद मिळालं नाही, याचं जास्त वाईट वाटत नाही. मात्र महायुतीतील तीनही नेत्यांनी जी वागणूक दिली, ती चुकीची आहे. हे नेते साधे भेटायलाही तयार नाहीत. आम्ही या नेत्यांचे गुलाम नाही," अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली होती. 

टॅग्स :Vijay Shivtareविजय शिवतारेEknath Shindeएकनाथ शिंदेShiv SenaशिवसेनाMahayutiमहायुतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४purandar-acपुरंदर