शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

छत्रपती संभाजीराजेंवर शिवसेनेने अन्याय केला; केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:40 IST

आठवलेंची शिवसेनेवर टीका...

इंदापूर : माजी खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्यावर शिवसेनेने मोठा अन्याय केला आहे. मागील अनेक दिवसांपासून संभाजीराजे यांनी अपक्ष लढण्याची भूमिका जाहीर केली होती. त्यांनी प्रयत्न केला असता तर ते भाजपचे उमेदवार राहिले असते. मात्र, ते स्वत:च स्वबळावर लढण्याचे सांगत होते. त्यातच त्यांना शिवसेनेने दिलेला शब्द पाळला नाही. महाविकास आघाडी नेत्यांनी त्यांना धोका दिल्याची टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केली.

इंदापूर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी आठवले बोलत होते. यावेळी आठवले म्हणाले, खासदार संजय राऊत यांनी भाजपवर आरोप करू नयेत. उलट शिवसेनेनेच संभाजीराजेंवर अन्याय केला आहे. काँग्रेसचे नाना पटोले म्हणाले होते की, राष्ट्रवादीने आमच्या पाठीत खंजीर खुपसला आहे. त्यांचे तसे मत असेल तर त्यांनी महाविकास आघाडीत न राहता हिंमत असेल तर पाठिंबा काढून घ्यावा.

आठवले पुढे म्हणाले, काँग्रेसने पाठिंबा काढला की, भाजप व आम्ही सरकार करायला तयार आहोत. आमच्याकडे १०५ आमदार असून, अपक्षांचाही आम्हाला पाठिंबा आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री पदासाठी खंबीर आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपेक्षा फडणवीस हे कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम आहेत. त्यांचे कामही उत्तम होते. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासासाठी फडणवीस मुख्यमंत्री होणे आवश्यक असल्याचे आठवले म्हणाले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा इंदापूर तालुका आरपीआयकडून सत्कार करण्यात आला.

कायद्याबद्दल गैरसमज

देशात समान नागरी कायदा झाल्यास मागासवर्गीय जीवनावर त्याचा परिणाम होणार नाही. मुस्लिम समाजात समान नागरी कायद्याबद्दल गैरसमज आहेत, त्याबाबत समाजाने गंभीरपणे घेऊ नये. समान नागरी कायदा आला तर लोकसंख्या नियंत्रणासाठी त्याचा चांगला उपयोग होऊ शकणार असल्याचे सांगितले. तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरपीआय भाजपसोबत सन्माजनक जागा घेऊन सर्व जागा लढविणार असल्याचे आठवले यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीRamdas Athawaleरामदास आठवलेUddhav Thackerayउद्धव ठाकरे