शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

Vikram Gokhale: बाळासाहेबांच्या आत्म्याला यातना होत असतील, भाजपा-सेनेनं एकत्र यायला हवं; विक्रम गोखलेंचं रोखठोक मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2021 15:31 IST

Vikram Gokhale on Shivsena BJP Alliance: विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

पुणे-

शिवसेनेची स्थापना बाळासाहेब ठाकरेंनी ज्या कारणासाठी केली, ज्यांच्यामुळे मराठी माणसाला आधार मिळाला आणि आज जे सुरू आहे ते पाहून बाळासाहेबांच्या आत्म्याला किती यातना होत असतील याची कल्पना आता जे बाहेर राहून फक्त बघतायत त्यांनाच येऊ शकते आणि त्यातला मी एक आहे, असं ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले आहेत. ते पुण्यात बोलत होते. विक्रम गोखले यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त पुण्यातील ब्राम्हण महासंघाच्यावतीनं त्यांना सन्मान करण्यात आला. यावेळी गोखले यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

राज्यातील महाविकास आघाडीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. शिवसेना-भाजप एकत्र यावेत म्हणून माझे प्रयत्न सुरू आहेत. तुमचं तरी काय बिघडलं असतं. ती चूक झाली. ज्यांना फॉलोअर्स असतील त्यांनी शिवसेना आणि भाजपच्या आघाडीसाठी पुढाकार घाययला हवा, मी घेतोय पुढाकार, असं विक्रम गोखले म्हणाले. 

उद्धव ठाकरे आणि फडणवीसांशी बोलणार"राज्यात जे सुरूय ते योग्य नाही. माझी सखी आत्तेसासू ही बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या महिला आघाडीची पहिली प्रमुख होती. बाळासाहेब हे माझे मामेसासरे होते. बाळासाहेबांची भाषणं ऐकून गेली ४० वर्ष महाराष्ट्र तृप्त झालेला आहे. त्यांच्या निधनानंतर राजकारणामध्ये जे खेळ सुरू आहेत. ते इतक्या विचित्र स्तरावर पोहोचले आहेत. ते पाहून खरंतर मराठी माणूस भरडला जातोय. प्रत्येकाचं हे म्हणणं आहे की सरकारचं हे गणित चुकलेलं आहे", असं विक्रम गोखले म्हणाले. 

"चुकलेलं गणित नीट करायचं असेल. तर अजूनही वेळ गेलेली नाही. ज्या संकटाच्या कड्यावर आपला देश उभा आहे. त्यातून जर मागे खेचायचं असेल तर भाजपा आणि शिवसेनेनं एकत्र यायलाच पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही", असंही ते म्हणाले. 

शिवसेना-भाजपाला एकत्र आणण्यासाठी माझे प्रयत्न सुरू आहेत. फडणवीसांना मी स्वत: प्रश्न विचारलेले आहेत की अडीच वर्ष दिली असती तर तुमचं काय बिघडलं असतं किंवा शिवसेनेचं काय बिघडलं असतं? हे माझे प्रश्न मी त्यांना विचारलेले आहेत. मी स्वत: उद्धव ठाकरे आणि फडणवीसांची भेट घेऊन याबाबत नक्कीच बोलेन. कारण भाजपा-शिवसेना एकत्र यायलाच हवेत. तेच देशासाठी चांगलं आहे, असं ठाम मत विक्रम गोखले यांनी व्यक्त केलं. 

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा