शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
4
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
5
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
6
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
7
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
8
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
9
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
10
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
11
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
12
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
13
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
14
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
15
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
16
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
17
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
18
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
19
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
20
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण

जितेंद्र आव्हाडांसोबत काम करण्यास काँग्रेसच्या शिंदेंचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2019 06:50 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीत बेबनाव । पूर्णेकर गटाच्या पाठिंब्यानंतर केला विरोध

अजित मांडके 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ. जितेंद्र आव्हाड यांना विरोध करत काँग्रेसमधील शहराध्यक्ष मनोज शिंदे गटाने नाराजीचे निशाण फडकावले आहे. ‘आम्ही आमचा निर्णय पक्षश्रेष्ठींसोबतच्या बैठकीनंतरच घेऊ’, अशी भूमिका त्यांनी जाहीर केली आहे. राष्ट्रवादीने आम्हाला वारंवार डावलले आहे, त्यामुळे आता आमच्या ज्या काही मागण्या आहेत, त्या त्यांनी मान्य केल्या, तरच समन्वय समितीच्या बैठकीला हजर राहू, अशी टोकाची भूमिका त्यांनी घेतली आहे.

राज्यपातळीवर काही ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये काही जागांवरून ठिणगी पडली आहे. ठाण्यातही तशीच ठिणगी पडली असून ठाणे शहर काँग्रेसमधील ब्लॉक अध्यक्षांनी ज्या ठिकाणी जितेंद्र आव्हाड असतील, त्या ठिकाणी आम्ही प्रचार करणार नसल्याची भूमिका घेत थेट प्रदेशाध्यक्षांना पत्र पाठवले होते. त्यामुळे अलीकडेच काँग्रेसमधील पूर्णेकर गटाने राष्ट्रवादीच्या उमेदवाराला आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याची भूमिका घेतली असली, तरी काँग्रेसमधील दोन गटांचा वाद पुन्हा उफाळल्याचे दिसून आले. परंतु, यावर राष्टÑवादीने पुढाकार घेत, तोडगा काढण्याचा निर्णय घेत, काँग्रेसच्या कार्यालयात जाऊन नाराज झालेले काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांची भेट घेतली. या वेळी काँग्रेसचे प्रदेश पातळीवरील नेते हुसेन दलवाई हेसुद्धा हजर होते. या बैठकीत काँग्रेस आणि राष्टÑवादीमध्ये दिलजमाई झाली, असे स्पष्ट करण्यात आले. परंतु, त्यावेळी शिंदे यांची भूमिका अस्पष्ट होती.‘दिलजमाई’ होणार?ठाणे लोकसभा मतदारसंघातील भाजपाच्या नगरसेवकांनी शिवसेनेबरोबरील मनोमिलनाचा डाव अवघ्या काही दिवसांत मोडल्याने आता काँग्रेसच्या एका गटाने राष्टÑवादीच्या विरोधात ताठर भूमिका घेतली आहे. येत्या सोमवारी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांची बैठक ठाण्यात बोलावण्यात आली आहे. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशपातळीवरील नेते राजेश शर्मा आणि हुसेन दलवाई हजर राहणार असून, त्यांच्यासमवेत प्रदेशचे इतर महत्त्वाचे पदाधिकारी हजर राहणार आहेत. या बैठकीत आम्ही राष्टÑवादीच्या विरोधातील आमची भूमिका स्पष्ट करणार असल्याचे काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितले. आम्ही राष्टÑवादीच्या विरोधात नाहीत. श्रेष्ठींचा निर्णय आम्ही मान्य करू, मात्र आमच्या काही मागण्या आहेत, त्या मान्य झाल्यास आम्ही २ एप्रिल रोजी होणाºया आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीला हजर राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले.‘आमच्या मागण्या मान्य करा’दरम्यान मुंब्रा, दिवा भागांत राष्टÑवादीने काँग्रेसला बुथ लेव्हलचे काम करण्याची परवानगी द्यावी. मागील ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत राष्टÑवादीने अनेक आश्वासने दिली होती, ती पाळलेली नाहीत. ती त्यांनी पाळावीत. निवडणुकीच्या वेळेस आम्ही साथ देत असलो, तरी प्रचाराच्या बॅनर, पोस्टरवर आमचा उल्लेख टाळला जातो. नावांचा उल्लेख स्पष्टपणे करण्यात यावा. ठाण्यातील प्रचाराचे केंद्र हे काँग्रेसचे मध्यवर्ती कार्यालय असावे, या व इतर काही मागण्या पक्षश्रेष्ठींकडे मांडल्या जाणार आहेत. राष्ट्रवादीकडून त्या मागण्या मान्य झाल्या, तरच आम्ही राष्टÑवादीचे काम करू, असा इशारा या नाराजांनी दिला आहे.काही दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीला पक्षश्रेष्ठी उपस्थित होते, त्यामुळे त्यांचा मान ठेवण्यात आला होता. परंतु, आजही राष्टÑवादीकडून आम्हाला डावलले जात आहे. त्यामुळे आम्ही ज्या मागण्या केल्या आहेत. त्या मान्य झाल्या तरच आम्ही काम करू, अन्यथा आम्ही राष्टÑवादीच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही.-मनोज शिंदे,अध्यक्ष,ठाणे शहर काँग्रेस.

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक