शिक्रापुर ग्रामपंचाय बिनविरोधाचा प्रयत्न उधळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:30 IST2021-01-08T04:30:02+5:302021-01-08T04:30:02+5:30
लोकमत न्यूज नेटवकर्क शिक्रापूर : ''''शिक्रापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा केला प्रयत्न आखेर उधळला गेला. तब्बल १६० उमेदवारी आर्ज ...

शिक्रापुर ग्रामपंचाय बिनविरोधाचा प्रयत्न उधळला
लोकमत न्यूज नेटवकर्क
शिक्रापूर : ''''शिक्रापूर ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचा केला प्रयत्न आखेर उधळला गेला. तब्बल १६० उमेदवारी आर्ज १७ जागेसाठी आले हो. सोमवारी अर्ज माघारीच्या दिवशी तब्बल ४७ उमेदवार रिंगणात राहिले आहे. ग्रामपंचायतीत तिरंगी लढत होणार असलल्याने निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागुन आहे.
जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ग्रामपंचायत बिनविरोध करण्याचे प्रयत्न सुरू होते. यासाठी बैठकाही घेण्यात आल्या होत्या. या बैठकीनंतर राजकीय घडमोडिना वेग आला होता. १७ जागेसाठी तब्बल १६० उमेदवारी अर्ज आल्याने आता बिनविरोध निवडणूक कशी करायची याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिक्रापूरच्या गावकारभाऱ्यांनी ग्रामदैवत श्री भैरवनाथाच्या साक्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याच्या निर्णय घेतला असल्या तरी माजी सरपंच बापूसाहेब जकाते यांनी आपण स्वतंत्र पॅनलने निवडणूक लढविणार असल्याची घोषणा केली. विशेष म्हणजे गावातील एकुण १७ जागांसाठी आता तब्बल १६० जणांनी अर्ज भरल्याने शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणूक पुन्हा एकदा जादुई स्थितीत पोहचली होती. द रम्यान आंदोलक डॉ. धनंजय खेडकर यांनीही स्वतंत्र पॅनल टाकण्याची घोषणा केल्याने सगळ्याच गावकारभाऱ्यांपुढे पेच उभा राहिला होता.
मागील निवडणूकीत दूसऱ्या क्रमांकाची मते घेवून पराभूत १७ उमेदवारांना यावेळी थेट ग्रामपंचायतीची संधी देण्याचे ठरले होते. मात्र, अर्ज भरण्याच्या मुदतीत तब्बल १६० अर्ज प्रत्यक्ष राहिल्याने निवडणूक बिनविरोध होवू द्यायची नाही असाही प्रयत्न गावातूनच सुरू झाला होता. दरम्यान माजी सरपंच आबासाहेब करंजे-पाटील, अरुण करंजे-पाटील, बाजार समिती संचालक आबाराजे मांढरे, बाबासाहेब सासवडे, रामभाऊ सासवडे, सोमनाथ भुजबळ, बाळासाहेब चव्हाण आदींसह माजी सभापती मंगलदास बांदल व काही ग्रामस्थांचा बिनविरोध निवडणूक करण्याचा प्रयत्न अखेर फसला आहे.
*****
सर्वात मोठी व शिरूर ची आर्थिक राजधानी असलेल्या शिक्रापूर ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा राजकीय घडामोडींना वेग आला आसून मतदार राजा मात्र या घडामोडींवर लक्ष देऊन आहे. मागील वेळी पाच हजार ते दहा हजार रुपये मताचा बाजार भाव या निवडणुकीत देखील होईल असे राजकीय जाणकार व मतदारान मधून आज वेक्त होत आहे.