शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

मेंढपाळांना मिळेना आसरा

By admin | Updated: November 3, 2014 05:03 IST

शहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत.

अंकुश जगताप, पिंपरीशहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत. कुंपणांमुळे चाऱ्याअभावी नुुसतीच रस्त्याने पायपीट करावी लागल्याने मेंड्या अर्धपोटी राहून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. दौड, बारामती, यवत, तुळजापूर, भिगवन, माळशिरस, शिरूर, टाकळी, पारनेर, संगणमनेर आदी भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. उदरनिर्वाहासाठी विशेषत: बकरी व शेळीपालन हाच प्रमुख व्यवसाय असून दूध व पशुविक्रीतून त्यांना अर्थार्जन होते. या भागात पावसाचे अत्यल्प प्रमाण, तुलनेने हलक्या प्रतिची व दगडगोट्यांच्या जमीनीमुळे शेळ्या मेंढ्यांना चाऱ्याची टंचाई असते. म्हणूनच दरवर्षी मजल दरमजल करीत खडकवासला, पुणे, वाकड, तळेगाव, लोणावळा या मार्गाने तळकोकणात चाऱ्याच्या शोधात भटकावे लागते. काहीजण पाषाण ते ताम्हिणी घाट, भोरमार्गे अथवा चाकण-देहू परिसरातून कोकणात जातात. प्रवासादरम्यान सलग चालत राहण्यापेक्षा या भागात एक मुक्काम आवर्जून ठरलेला असायचा. आपल्या शेतात बकऱ्यांचा वाड्याचा तळ बसवून खत उपलब्ध व्हावे म्हणून मोबदल्यापोटी शेतकऱ्याकडून धनगरांना बकऱ्यांच्या संखेनुसार धान्यरूपात मोबदला दिला जायचा. त्यातून वाड्याला पूढील प्रवासाची तजवीज व्हायची. मुळगावी परततानाही ज्वारी, कांदा तसेच इतर बागायती पिकांची काढणी झालेल्या शेतातील उरलेसुरले पीक व आजूबाजूच्या मोकळ्या मैदानात फुटलेला चारा उपलब्ध व्हायचा. मात्र सध्या शहरांलगतच्या गावांमध्ये नागरिकरण व त्यासाठी जमीन विक्री झपाट्याने झाली आहे. परिणामी लोणी काळभोरपासून ते पिरंगुट, मावळच्या चांदखेड, तळेगाव पट्टयात बहुतेक गावांत ४० ते ७० टक्के शेतीक्षेत्राची विक्री झाली आहे. उरलेसुरले शेतकरी धनगरवाडे बसविण्याकडे कानाडोळा करून रासायनिक खतांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वी या भागात आवश्यक ठरणाऱ्या मुक्कामाची आश्रयस्थानेच नामशेष होत आहेत. थेट पूढील प्रवासाचे अंतर कापून तळेगावपूढील गावांमध्ये मुक्कामस्थळे हलवावी लागत आहेत. चारा उपलब्ध होणारी शेती तसेच मोकळी मैदाने आता १०० ते ५०० एकरांवरील बड्या गृहप्रकल्पांनी, कुंपनांनी व्यापली आहेत. त्यामुळे पूर्वीच्याच मार्गावरुन जाण्याच्या प्रयत्नात अनेक धनगर वाड्यांचा कोंडमारा होत आहे. मेंढ्यांना चारा मिळणे तर दूरच पण आता मार्ग कुठून काढावा, असाच प्रश्न अनेक धनगरांपूढे आहे. मेंढ्यांना उपाशीपोटी लांबच्या पल्यापर्यंत पिटाळत नेण्याची वेळ आली आहे.