शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
4
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
5
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
6
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
7
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
8
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
9
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
10
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
11
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
12
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
13
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
14
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
15
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
16
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
17
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
18
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
19
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
20
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
Daily Top 2Weekly Top 5

मेंढपाळांना मिळेना आसरा

By admin | Updated: November 3, 2014 05:03 IST

शहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत.

अंकुश जगताप, पिंपरीशहरांचा पसारा वाढून शेतविक्रीमुळे सर्वत्र भूखंडाना घातलल्या कुंपणांचा वेढा पडला आहे. परिणामी गावाकडून तळकोकणात व माघारी गावी प्रवास करणा-या धनगर वाड्यांची गावोगावची मुक्कामस्थळेच नामशेष होत आहेत. कुंपणांमुळे चाऱ्याअभावी नुुसतीच रस्त्याने पायपीट करावी लागल्याने मेंड्या अर्धपोटी राहून उत्पादनावर विपरीत परिणाम होत आहे. दौड, बारामती, यवत, तुळजापूर, भिगवन, माळशिरस, शिरूर, टाकळी, पारनेर, संगणमनेर आदी भागात धनगर समाज मोठ्या प्रमाणात आहे. उदरनिर्वाहासाठी विशेषत: बकरी व शेळीपालन हाच प्रमुख व्यवसाय असून दूध व पशुविक्रीतून त्यांना अर्थार्जन होते. या भागात पावसाचे अत्यल्प प्रमाण, तुलनेने हलक्या प्रतिची व दगडगोट्यांच्या जमीनीमुळे शेळ्या मेंढ्यांना चाऱ्याची टंचाई असते. म्हणूनच दरवर्षी मजल दरमजल करीत खडकवासला, पुणे, वाकड, तळेगाव, लोणावळा या मार्गाने तळकोकणात चाऱ्याच्या शोधात भटकावे लागते. काहीजण पाषाण ते ताम्हिणी घाट, भोरमार्गे अथवा चाकण-देहू परिसरातून कोकणात जातात. प्रवासादरम्यान सलग चालत राहण्यापेक्षा या भागात एक मुक्काम आवर्जून ठरलेला असायचा. आपल्या शेतात बकऱ्यांचा वाड्याचा तळ बसवून खत उपलब्ध व्हावे म्हणून मोबदल्यापोटी शेतकऱ्याकडून धनगरांना बकऱ्यांच्या संखेनुसार धान्यरूपात मोबदला दिला जायचा. त्यातून वाड्याला पूढील प्रवासाची तजवीज व्हायची. मुळगावी परततानाही ज्वारी, कांदा तसेच इतर बागायती पिकांची काढणी झालेल्या शेतातील उरलेसुरले पीक व आजूबाजूच्या मोकळ्या मैदानात फुटलेला चारा उपलब्ध व्हायचा. मात्र सध्या शहरांलगतच्या गावांमध्ये नागरिकरण व त्यासाठी जमीन विक्री झपाट्याने झाली आहे. परिणामी लोणी काळभोरपासून ते पिरंगुट, मावळच्या चांदखेड, तळेगाव पट्टयात बहुतेक गावांत ४० ते ७० टक्के शेतीक्षेत्राची विक्री झाली आहे. उरलेसुरले शेतकरी धनगरवाडे बसविण्याकडे कानाडोळा करून रासायनिक खतांचा वापर करू लागले आहेत. त्यामुळे पूर्वी या भागात आवश्यक ठरणाऱ्या मुक्कामाची आश्रयस्थानेच नामशेष होत आहेत. थेट पूढील प्रवासाचे अंतर कापून तळेगावपूढील गावांमध्ये मुक्कामस्थळे हलवावी लागत आहेत. चारा उपलब्ध होणारी शेती तसेच मोकळी मैदाने आता १०० ते ५०० एकरांवरील बड्या गृहप्रकल्पांनी, कुंपनांनी व्यापली आहेत. त्यामुळे पूर्वीच्याच मार्गावरुन जाण्याच्या प्रयत्नात अनेक धनगर वाड्यांचा कोंडमारा होत आहे. मेंढ्यांना चारा मिळणे तर दूरच पण आता मार्ग कुठून काढावा, असाच प्रश्न अनेक धनगरांपूढे आहे. मेंढ्यांना उपाशीपोटी लांबच्या पल्यापर्यंत पिटाळत नेण्याची वेळ आली आहे.