शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
3
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
4
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
5
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
6
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
7
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
8
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
9
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
10
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
11
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
12
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
13
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
14
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
15
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
16
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
17
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
18
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
19
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली

देशाच्या नेतृत्वाला द्वेष निर्माण करायचाय : शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2018 21:06 IST

कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली

पुणे :  देशात परिस्थिती इतकी खालावली आहे की,  कोणी काय घालावं, काय खावं हे सांगितलं जातं आहे. देशाच्या नेतृत्वाला या प्रकारे देशात द्वेष निर्माण करायचा आहे अशी विखारी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पुण्यातील ईद मिलन कार्यक्रमात ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील,खासदार वंदना चव्हाण, शिक्षणतज्ञ डॉ पी ए इनामदार उपस्थित होते.

आज समाजाची स्थिती वेगळी आहे. जिथे बंधुभाव संपतो तिथे द्वेषाचा माहोल तयार होत असून अशा परिस्थितीत देशाची प्रगती संपते. दुर्दैवाने हीच स्थिती आज देशात दिसत आहे. कधी मुस्लिम तर कधी इसाई समाजाच्या व्यक्तीवर हल्ले होतात आणि सांगितलं जातं हे हल्ले करणं हा आमचा अधिकार आहे.

आज मला विचारलं, तुम्हाला फर कॅप घालू का ? त्यावर मी देशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास भोगलेले मौलाना अबुल कलाम आझाद जी टोपी घालायची मला का लाज वाटावी असे उत्तर देत फर कॅप घातली. ज्यांच्या हातात देशाचा नकाशा त्यांना फर कॅप घालण्यात लाज वाटते अशा भाषेत त्यांनी उत्तर प्रदेशाच्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ईदच्या कार्यक्रमात न घातलेल्या टोपीचा उल्लेख केला. आजूबाजूच्या देशात फार चांगली स्थिती नाही. अशावेळी द्वेषाचा माहोल पसरणार नाही याची आपण काळजी घेऊ असेही ते म्हणाले.

भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी ख्रिश्चन समाजाच्या बाबत केलेल्या विधानावरही त्यांनी टीका केली. ते म्हणाले की, शेट्टी यांनी बोलताना इसाईंचे योगदान नाही असे म्हटले. त्यांना लाज वाटली पाहिजे ज्यावेळी स्वातंत्र्यपूर्व काळात काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळच्या स्थापना सदस्या अँनी बेझंट या इसाई होत्या.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारGopal Shettyगोपाळ शेट्टीBJPभाजपा