शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

हर्षवर्धन पाटील व राष्ट्रवादी वितुष्टाला शरद पवार जबाबदार; अजित पवारांची नाव न घेता टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2024 14:54 IST

हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले...

इंदापूर (पुणे) : मी महायुतीचा धर्म पाळणार आहे, असे जाहीर करत मागील चार लोकसभा निवडणुकीच्या वेळेस हर्षवर्धन पाटील हे आमच्या वरच्यांकडे जाऊन चर्चा करायचे, असे सांगून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हर्षवर्धन पाटील व तत्कालीन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण झालेल्या राजकीय वितुष्टाला शरद पवार जबाबदार आहेत, असे भाजप पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात अप्रत्यक्षरित्या सांगितले. भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, अजित पवार, महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार, अंकिता पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत व भाजपच्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत वाघ पॅलेस येथे हा मेळावा झाला.

अजित पवार म्हणाले की, मागील चार लोकसभा निवडणुकांमध्ये आमच्याकडून काम करून घेतले जाते. नंतर मात्र वेगळे घडते असा अंकिता पाटील यांच्यासह बहुतेक कार्यकर्त्यांचा आक्षेप आहे. मी शब्दाचा पक्का आहे. सन २००४ ते २०१९ या कालावधीत झालेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मी हर्षवर्धन पाटलांशी चर्चा करत नव्हतो. चर्चा कोण करत होते ते त्यांना माहिती आहे. ते आमच्या वरच्यांकडे जायचे. त्यांच्याशी चर्चा करायचे, असे सांगत पवार यांनी शरद पवारांचे नाव न घेता त्यांच्याकडे बोट दाखवले.

देशातील १३५ कोटी जनतेचा कारभार पाहू शकणारा माेदींच्या तोडीचा नेता कोणत्याही राजकीय पक्षात नाही. राहुल गांधींची काय तुलना होऊ शकते?, काय राहुल गांधींची कारकीर्द आहे? असे प्रश्न पवार यांनी उपस्थित केले. गेल्या दहा वर्षांत बारामती लोकसभा मतदारसंघात किती निधी आला, त्याची आपण शहानिशा करावी. महायुतीचा उमेदवार निवडून आला, तर विकासाकरिता केंद्राचा जास्तीचा व राज्याचा पैसा आणायला आम्ही कमी पडणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.

हर्षवर्धन पाटील म्हणाले की, एकत्र येण्याचा योग दीर्घ कालावधीनंतर का आला, याचीही चर्चा करावी लागेल. ही राजकीय लढाई होती. महायुतीत स्वाभिमानी मतदारांचा सन्मान झाला पाहिजे. तुमचा स्वभाव स्पष्ट बोलण्याचा असेल, तसाच आमचा स्वभाव दिलेला शब्द पाळण्याचा आहे. त्यामुळे बारामतीत मताधिक्य जास्त मिळते की, इंदापुरात ते पाहू या, असे सांगत मनामध्ये असलेल्या आकड्यापेक्षा जास्त मताधिक्य देण्याची ग्वाही त्यांनी दिली. अंकिता पाटील-ठाकरे, सुनेत्रा पवार निरा भीमा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष लालासाहेब पवार यांची यावेळी भाषणे झाली. प्रास्ताविक भाजपचे तालुकाध्यक्ष शरद जामदार यांनी केले.

‘बटण दाबा कचकच’ या विधानाने वादाचा मुद्दा ठरल्यानंतर ते ग्रामीण भागातील भाषण होते, असे सांगत अजित पवार यांनी पुण्यात भाषण झाले असते, तर कसे असते याचीही नक्कल करून दाखवली. निधीबाबत बोलल्याने आचारसंहितेचा भंग होत असल्याची चर्चा होत आहे, तर मग बाकीचे काहीही सांगतात आम्ही तुमच्या खात्यावर दरवर्षी अमूक इतके लाख टाकणार, आम्ही असे करणार, तसे करणार, त्यावेळी आचारसंहितेचा भंग होत नाही का? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवारharshvardhan patilहर्षवर्धन पाटील