शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

'जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार टार्गेट करतंय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2021 16:39 IST

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला (sharad pawar ed, ncb, income tax, modi government, nawab malik, bhavna gavli)

पुणे: जिथं भाजपची सत्ता नाही तिथल्या सरकारला केंद्र सरकार केंद्रीय संस्था हातात धरून त्रास देत आहे.केंद्र सरकारला सामान्य माणसांविषयी आस्था नाही. पेट्रोल- डिझेलच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत म्हणत राष्ट्रवादी नेते शरद पवार यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. आज शरद पवारपिंपरी चिं

केंद्र सरकारकडून 35 हजार कोटी जीएसटी रक्कम येणे बाकी आहे. तर 3 हजार कोटींची बाकी असल्याने कोळशाचा पुरवठा मात्र थांबवल्याचा आरोपही शरद पवार यांनी केला. सध्या सीबीआय, आयकर, एनसीबी आणि ईडीसारख्या केंद्रीय संस्थांचा वापर करून भाजपविरहीत राज्य सरकारांना भाजप त्रास देत असल्याचे पवार म्हणाले.

पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्दे-

- आरोप करणारे परमबीर सिंह आता कुठे गायब झाले?

- भाजपची सरकारे नसलेली राज्ये केंद्राकडून अस्थिर करण्याचा प्रयत्न केला जात आहेत.

- केंद्र राज्यावर, लोकप्रतिनिधींवर दडपण आणण्याचा प्रयत्न करत आहे.

- एनसीबीकडून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातोय.

- मत्र्यांवर दबाव आणण्याचा प्रयत्न.

- मलिकांनी केंद्राविरोधात मते मांडल्याने सुडबुद्धीने त्यांच्या जावयावर कारवाई.

- खासदार भावना गावित, अनिल परब, नवाब मलिक यांच्या विराधात यंत्रणांचा गैरवापर केला.

- केंद्राकडून सत्तेचा गैरवापर वाढत आहे.

- केंद्रीय संस्थांना हाती धरून केंद्र सरकार दहशत पसरवत आहे.

- महाराष्ट्र सरकार अस्थिर करण्याचे काम केंद्र सरकार करतेय.

- गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांना पंच म्हणून घेऊन चांगल्या माणसांच्या विरोधात खोटे पुरावे तयार करून अडकविण्याचे काम सुरू आहे.

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- शासकीय यंत्रणेची तक्रार असेल त्यांनी खुलासा करणे योग्य आहे. मात्र, भाजपचे खासदार, माजी मुख्यमंत्री खुलासा करतात. याचा अर्थ काय?

- ''मी येणारच...असे छाती ठोक पणे सांगणारे , ते काही आले नाही म्हणून राजकीय आकसाने चौकशी सुरू आहे.

- एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडला म्हणून त्यांच्यावर कारवाई करण्यात येत येत आहे.

 - एक माजी खासदार, एक माजी मुख्यमंत्री बोलले की यंत्रणा लगेच कारवाई सुरू केले आहे, यावरून काय समजायचे?

- ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर अनेक संकटे आले, राज्य सरकारने कोरोना चे संकट योग्य पद्धतीने हाताळले

- आघाडी सरकार बनविण्यात माझा हात होता.

- मी सक्तीने उद्धव ठाकरे यांचा हात हातात घेऊन त्यांचे मुख्यमंत्री पदासाठी नाव सुचवलं.

- सत्ता गेल्याचे दुःख देवेंद्र फडणवीसांना जास्त आहे.

- महाविकास आघाडीचे नेतृत्त्व शिवसेनेकडे राहणार.

- आघाडी सरकार बनवण्यात माझाही हात होता. 

-

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारPuneपुणेpimpri-acपिंपरी