शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत द्वेष्टा...! डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर पहिला वार; ६ भारतीय ऑईल कंपन्यांवर निर्बंध लादले...
2
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
3
सलवार सूट घातला, त्यावर बुरखा चढवला अन् महिला डॉक्टरच्या घरात घुसून ७ वेळा चाकूने वार केला; नेमकं प्रकरण काय?
4
अरे ही कसली आई! १५ महिन्यांच्या लेकाला बस स्टँडवर सोडलं अन् इन्स्टा बॉयफ्रेंडसोबत पळाली
5
जुनी मैत्रिण ४ वर्षांनी पुन्हा भेटली, एकांतात भेटायला बोलावलं; बंद खोलीत तिला कायमचं संपवलं, मग... 
6
Video - क्रूरतेचा कळस! 'ती' जीव वाचवण्यासाठी हाता-पाया पडली पण 'तो' अमानुषपणे मारत राहिला
7
Video - पावसाचे थैमान! पुरामध्ये ३० तास अडकली शाळेची बस, १०० जणांना वाचवण्यात यश
8
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
9
धक्कादायक! ४००० देऊन भीक मागणाऱ्यांचे स्पर्म गोळा केले, टेस्ट ट्यूब बेबीसाठी लाखो रुपये आकारून लोकांना फसवले! 
10
आजचे राशीभविष्य ३१ जुलै २०२५ : या राशीला धनलाभाचा दिवस, या राशीला काहीसा प्रतिकूल
11
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
12
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
13
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
14
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
15
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
16
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
17
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
18
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
19
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
20
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 21:44 IST

अजित पवारांची शरद पवारांवर टीका...

नारायणगाव (पुणे) : परकीय व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान नसावी म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सन १९९९ काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. चारच महिन्यांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील झाले. त्यावेळी परकीय मुद्दा कुठे गेला? सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी कसा घेतला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला. ममता बनर्जी स्वंतत्र निवडणूक लढविणार, पंजाब मुख्यमंत्री वेगळे लढणार, अशा पद्धतीने देश चालेल का? आघाडीत मोदीविरोधी सक्षम पर्याय आहे का? असा सवाल करून नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .

दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण तर भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती संधी का दिली गेली नाही? छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, सभापती संजय काळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, गणपत फुलवडे, भगवान पासलकर, शरद लेंडे, रघुनाथ लेंडे, अशोक घोलप, किशोर दांगट, गुलाब नेहेरकर, भाऊ देवाडे, उज्वला शेवाळे वैष्णवी चतुर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यांना भाजप का चालत नाही?

अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडताना सगळ्यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले. पवार साहेबांना शिवसेनेत गेलेले चालते पण भाजपसोबत गेलेले का चालत नाही? वरिष्ठांनी निर्णय घेतला तो बरोबर , आम्ही निर्णय घेतला तो बरोबर नाही, असं कसं? असा सवाल अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना विचारला. राजकारणात हेतू परस्पर आरोप केला जातो. माझ्यावर ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार आरोप केला. १९६० पासून जलसंपदा विभाने ४५  हजार कोटी खर्च केले आणि माझ्या आरोप होतो ७० हजार कोटीचा.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSonia Gandhiसोनिया गांधी