शहरं
Join us  
Trending Stories
1
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
4
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
5
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
6
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
7
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
8
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
9
भारत-विरुद्ध पाकिस्तान सामन्यावर नाना पाटेकर म्हणाले, "आपल्या लोकांचं रक्त वाहिलं आहे..."
10
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
11
VIRAL : भूकंपाच्या झटक्यानं आसाम हादरलं, नर्सनी धाडस दाखवलं! स्वतःचा जीव धोक्यात घालून वाचवले बाळांचे प्राण 
12
'दशावतार' पाहायला गेलेल्या अमराठी प्रेक्षकाच्या डोळ्यांत पाणी, दिलीप प्रभावळकरांना दिला कडक सॅल्यूट, थिएटरमधील व्हिडीओ
13
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
14
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
15
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
16
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
17
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
18
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
19
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती कृती भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
20
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?

"चारच महिन्यांत सत्तेत गेले मग त्यावेळी परकीय मुद्दा कुठं गेला होता..." अजित पवार थेटच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2024 21:44 IST

अजित पवारांची शरद पवारांवर टीका...

नारायणगाव (पुणे) : परकीय व्यक्ती आपल्या देशाचे पंतप्रधान नसावी म्हणून शरद पवार, पी. ए. संगमा, तारीक अन्वर यांनी वेगळी भूमिका घेतली आणि सन १९९९ काँग्रेसमधून बाहेर पडून राष्ट्रवादी पक्षाची स्थापना केली. चारच महिन्यांत विलासराव देशमुख यांच्यासोबत मंत्रिमंडळात सामील झाले. त्यावेळी परकीय मुद्दा कुठे गेला? सोनिया गांधी पक्षाच्या अध्यक्ष होत्या, मग त्यांच्यासोबत जाण्याचा निर्णय त्यावेळी कसा घेतला? असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपळवंडी (ता. जुन्नर ) येथील शेतकरी मेळाव्यात व्यक्त केला. ममता बनर्जी स्वंतत्र निवडणूक लढविणार, पंजाब मुख्यमंत्री वेगळे लढणार, अशा पद्धतीने देश चालेल का? आघाडीत मोदीविरोधी सक्षम पर्याय आहे का? असा सवाल करून नरेंद्र मोदींशिवाय पर्याय नाही, असे स्पष्ट मत अजित पवार यांनी यावेळी व्यक्त केले .

दरम्यान, शिवसेनेच्या माध्यमातून उद्धव ठाकरे, मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, काँग्रेसकडून विलासराव देशमुख, अशोक चव्हाण, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण तर भाजपच्या वतीने देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मुख्यमंत्री पदाची संधी असताना ती संधी का दिली गेली नाही? छगन भुजबळ, आर. आर. पाटील यांना संधी द्यायला हवी होती, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पिंपळवंडी येथे आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात अजित पवार हे बोलत होते. यावेळी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, पोपटराव गावडे, प्रदीप वळसे पाटील, यशवंत पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष महादेव वाघ, सभापती संजय काळे, विघ्नहरचे चेअरमन सत्यशील शेरकर, गणपत फुलवडे, भगवान पासलकर, शरद लेंडे, रघुनाथ लेंडे, अशोक घोलप, किशोर दांगट, गुलाब नेहेरकर, भाऊ देवाडे, उज्वला शेवाळे वैष्णवी चतुर, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

यांना भाजप का चालत नाही?

अजित पवार पुढे म्हणाले की, उद्धव ठाकरेंचे सरकार पडताना सगळ्यांनी भाजप सोबत जाण्याचे ठरवले. पवार साहेबांना शिवसेनेत गेलेले चालते पण भाजपसोबत गेलेले का चालत नाही? वरिष्ठांनी निर्णय घेतला तो बरोबर , आम्ही निर्णय घेतला तो बरोबर नाही, असं कसं? असा सवाल अप्रत्यक्षरित्या शरद पवार यांना विचारला. राजकारणात हेतू परस्पर आरोप केला जातो. माझ्यावर ७० हजार कोटी रुपये भ्रष्टाचार आरोप केला. १९६० पासून जलसंपदा विभाने ४५  हजार कोटी खर्च केले आणि माझ्या आरोप होतो ७० हजार कोटीचा.

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारSonia Gandhiसोनिया गांधी