शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

शरद पवार उद्योजकांचे नेते  :  प्रकाश आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2018 22:08 IST

सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे.

ठळक मुद्देशेतकरी आंदोलनावर केलेल्या वक्तव्यावर भाष्यचोंडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर सौम्य स्वरुपाची कारवाई येत्या १० जून पर्यंत गुन्हा मागे न घेतल्यास तालुकानिहाय धरणे आंदोलन

पुणे : माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाही. ते कृषी पुरक उद्योग करणाऱ्या उद्योजकांचे नेते असल्याची टीका भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केली. शेतकरी जो पर्यंत जात पाहून मतदान करतील तोपर्यंत त्यांच्या स्थितीत बदल होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.  भटक्या विमुक्त जमाती संघटनेचे लक्ष्मण माने, अ‍ॅड. विजय मोरे, नवनाथ पडाळकर यावेळी उपस्थित होते. सरकारबाबत टोकाची भूमिका घ्या, मात्र शेतमालाची नासाडी करु नका असे वक्तव्य पवार यांनी केले आहे. त्याबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, पवार हे शेतकऱ्यांचे नेते नाहीत. ते केवळ शेतमालावर प्रक्रिया करणाऱ्या उद्योजकांचे नेते आहेत. शेतकऱ्यांनी अन्नधान्य फेकून दिल्याने त्यांच्या स्थितीत काहीच बदल होणार नाही. त्यांना मोर्चा आणि आंदोलने काढूनही फारसा फरक पडणार नाही. जोपर्यंत शेतकरी जात पाहून मतदान देत राहील, तोपर्यंत शेतकरी आत्महत्या देखील थांबणार नाही. त्यामुळे जातीसाठी माती खाणार नाही, हे शेतकऱ्यांनी ठरविले पाहिजे. अहमदनगर येथील चोंडी येथे झालेल्या घटनेबाबत बोलताना आंबेडकर म्हणाले, धनगर आरक्षणाबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील २०१४मध्ये आश्वासन दिले होते. मात्र, गेल्या चार वर्षांत त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्याची विचारणा करणाऱ्या व्यक्तींवर गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करण्यात आले. भारतीय जनता पक्षाने राष्ट्रवादीला हाताशी धरुन हे गुन्हे दाखल केले आहेत. चोंडी येथे झालेल्या कार्यक्रमाच्या वेळी सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यक्तींवर सौम्य स्वरुपाची कारवाई करण्यात आली. तर, धनगर आरक्षणासाठी घोषणाबाजी करणाऱ्यांवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला. असा दडपशाहीचा प्रकार देशभरात सर्वत्र दिसून येत आहे. खरेतर ही स्थिती अघोषित आणीबाणीसारखीच आहे. -------------भिसेंवरील गुन्हा मागे न घेतल्यास आंदोलन बहुजन एकता परिषदेचे अध्यक्ष डॉ. इंद्रकुमार भिसे यांच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आंदोलनकर्त्यांपैकी एकाने पोलिसांना दगड मारल्याचा आरोप करण्यात आला आहे. पुर्वी जातीवादी मनुवाद होता. आता पक्षपाती मनुवाद केला जात असल्याचे यावरुन दिसून येत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी डॉ. भिसेंवरील गुन्हा मागे घ्यावा असे त्यांना आवाहन करतो. त्यांनी येत्या १० जून पर्यंत गुन्हा मागे न घेतल्यास धनगर समाज सत्ता संपादन समितीच्या नेतृत्वाखाली तालुकानिहाय धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेPrakash Ambedkarप्रकाश आंबेडकरSharad Pawarशरद पवार