शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash: 'नो थ्रस्ट', अपघातापूर्वी पायलट सुमित सभरवालांचा ATC ला मेसेज; विमान का कोसळले?
2
Sanjay Raut : "अपघात झाला कसा, एकाच वेळेला २ इंजिन कशी बंद पडली, सायबरच्या माध्यमातून हायजॅक केली का?"
3
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "MY LOVE...", विमान अपघातात गर्लफ्रेंडचा मृत्यू, डोळे पाणावणारा Video
4
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
5
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
6
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
7
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
8
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
9
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
10
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
11
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
12
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
13
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
14
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
15
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
16
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
17
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
18
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
19
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
20
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती

निम्म्या कर्मचार्‍यांच्या बळावर अग्निशामक दल देतेय सेवा; दिवाळीतही सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2017 15:46 IST

अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्‍यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़

ठळक मुद्देपुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या १३ अग्निशामन केंद्रे, त्यांची संख्या ३० असण्याची गरज दलाकडे हॅडोलक क्रेनपासून बुलेटपर्यंत ७२ वाहने आहेत़ ती सर्व सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़

पुणे : दिवाळी, उन्हाळ्याचे दिवस शहरात आगी लागल्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होते़ तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला झाडपडीच्या घटना मोठ्या संख्येने होतात, अशावेळी सर्व जण १०१ क्रमांकावर फोन करुन मदत मागतात आणि काही मिनिटात अग्निशामक दलाचे जवान तत्परतेने घटनास्थळावर हजर होतात. अशा या अत्यावश्यक सेवेमध्ये कार्यरत असणार्‍या अग्निशामक दलामध्ये आवश्यक असलेल्या ९८० कर्मचार्‍यांपैकी फक्त ४९० कर्मचारी सध्या आहेत़ इतकी कमी संख्या असूनही ते सेवेमध्ये मात्र कोठेही कमी पडत नसल्याचे दिसून येत आहे़ पुणे महापालिकेच्या हद्दीत सध्या १३ अग्निशामन केंद्रे आहेत़ महापालिकेचा विस्तार आणि लोकसंख्या पाहता त्यांची ३० तरी संख्या असण्याची गरज आहे़ महापालिकेच्या हद्दीत नुकताच ११ गावांचा समावेश करण्यात आला़ त्यामुळे आता त्यांच्यासाठीही अग्निशामन सेवा पुरविण्यासाठी तेथे अग्निशामक दलाची केंद्रे उभारावी लागणार आहेत़ याबाबत अग्निशामक दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी सांगितले, की दिवाळीत आता आहेत, त्या सर्व कर्मचार्‍यांच्या रजा रद्द करण्यात आल्या आहेत़ अग्निशामक दलाकडे हॅडोलक क्रेनपासून बुलेटपर्यंत ७२ वाहने आहेत़ ती सर्व सुसज्ज ठेवण्यात आली आहेत़ रुग्णवाहिकाही तयारीत ठेवण्यात आल्या आहेत़ नवीन अग्निशामन केंद्रासाठी काही जागा ताब्यात आल्या आहेत़ काहीचे बांधकाम सुरु असून येत्या ३ वर्षात ते पूर्ण करणार आहेत़ नवीन गावांच्या समावेशाचा विचार केल्यास त्या ठिकाणी जागा मिळाल्यास नवीन केंद्र उभारण्याचा विचार होऊ शकेल़ 

रॉकेट, पॅराशुटमुळेच आगीच्या घटनादिवाळीत प्रामुख्याने आगी लागण्याच्या अनेक घटना घडतात़ अग्निशामक दलाने केलेल्या जनजागृतीमुळे गेल्या काही वर्षांमध्ये आगीच्या घटनांमध्ये घट झाली आहे़ गेल्या वर्षी दिवाळीत आगीच्या १७ घटना घडल्या होत्या़ दिवाळीत उडविले जाणारे फटाकेच प्रामुख्याने आगीला कारणीभूत ठरतात़ त्यातील अनेक आगी या रॉकेट आणि पॅराशुट या फटक्यांमुळे लागल्या होत्या़ रॉकेट व्यवस्थित आकाशात न जाता ते इकडे तिकडे जाण्यामुळे वाळलेले गवत, कचरा कुंडी, झाडे पेटून आगी लागल्याचा घटना प्रामुख्याने घडतात़ त्यामुळे असे फटाका उडविताना सर्वांनी काळजी घ्यावी़ 

फटाके उडविताना घ्यावयाची दक्षता* लहान मुलांना एकट्याने फटाके उडवू देऊ नका़ त्यांच्या सोबत मोठ्या व्यक्तींनी रहावे़* पेटते फुलबाजे शरीरापासून दूर धरावेत़ पेटते फुलबाजे वरुन खाली टाकू नयेत़ तसेच खालून वर फेकू नयेत़* फटाके उडविताना टेरिकॉट, टेरिलिन, नायलॉन इत्यादी कृत्रिम धाग्यांपासून बनविलेले कपडे वापरु नयेत़ तसेच फटाके कधीही खिशात ठेवू नयेत़* भुईनळे हातात धरुन उडवू नयेत़* भुईचक्र व जमिनीवर फिरणारे फटाके लाथाळू नयेत़* बाण उडविताना ते मोकळ्या जागेत, बाटलीत सरळ ठेवून उडवावेत़ हातात धरुन उडवू नयेत़* आकाशात उंचावर उडणारे फटाके टेरेसवर, बाल्कनीमध्ये पडून बºयाचदा आगी लागतात़ त्यामुळे दिवाळीत टेरेसवरील तसेच बाल्कनीमधील टाकाऊ तसेच अन्य वस्तू काढून टाकाव्यात़* फटाक्यावर डबा किंवा अन्य वस्तू झाकून उडवू नयेत़ त्यामुळे इजा होण्याची शक्यता असते़ * फटाके न फुटल्यास अशा फटाक्यांची दारू काढून ते पेटवू नयेत़ त्यामुळे डोळ्यांना गंभीर दुखापत होऊन अंधत्व येण्याची शक्यता असते़ * फटाके उडविताना, हाताशी पाणी राहील अशी व्यवस्था करावी़ चुकून भाजल्यास भाजलेला भाग पाण्याखाली धरावा़ फुलबाजे वापरुन झाल्यावर त्याची तार इतरत्र न टाकता त्वरीत पाण्यात टाकावी़ * खिडक्या, दरवाज्यांना असलेल्या पडद्याखाली पणत्या लावू नयेत़ * आपत्कालीन प्रसंगी अग्निशामक दलाशी १०१ वर संपर्क साधावा़

टॅग्स :fireआगPuneपुणेdiwaliदिवाळी