शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

नवनियुक्त १३०० कर्मचाऱ्यांची सेवा खंडित; कोरोना काळात बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2020 01:13 IST

चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली.

पुणे : सरळसेवा भरती प्रक्रियेतून चालक व वाहक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या सुमारे १३०० कर्मचाऱ्यांची सेवा एसटी महामंडळाने तात्पुरती खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नियुक्तीनंतर सहा महिन्यांतच त्यांच्यावर बेरोजगारीची कुºहाड कोसळली आहे. तसेच ३२०० कर्मचाºयांचे प्रशिक्षणही थांबविण्यात आले आहे. त्यामुळे त्यांना नियुक्तीपुर्वीच घरी बसावे लागणार आहे.

चालक व वाहकांच्या रिक्त जागा भरण्यासाठी महामंडळाने मागील वर्षी सरळसेवा भरती प्रक्रिया राबविली. त्यातून ८०२२ पदे भरली जाणार होती. त्यानुसार ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवून परीक्षा घेण्यात आली. सुमारे ४५०० पात्र उमेदवारांपैकी १३०० उमेदवारांचे प्रशिक्षण पूर्ण करून डिसेंबरपासून चालक व वाहक पदावर नियुक्त्या देण्यात आल्या.

सध्या सुमारे ३,२०० चालक व वाहक तसेच २३२ अन्य पदावरील अधिकारी व कर्मचाºयांचे प्रशिक्षण सुरू होते. एसटीमध्ये नियुक्त होणारे कर्मचारी सुरूवातीला रोजंदारी गटात असतात. मागील चार महिन्यांपासून एसटीची सेवा बंद आहे. त्यामुळे महसुल थांबल्याने कर्मचाºयांच्या वेतनासाठीही पैसे नाहीत.सध्या सुरू असलेल्या बस तसेच इतर सेवांसाठी आवश्यक मनुष्यबळापेक्षा जास्त कर्मचारी आहेत. त्यामुळे प्रशासनाने रोजंदारीवर नियुक्त १३०० कर्मचाºयांची सेवा तात्पुरती खंडित केली आहे.

इंटकचा निर्णयास विरोध

महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) संघटनेने या निर्णयाला विरोध केला आहे. प्रशासनाने कर्मचाºयांवर उपासमारीची वेळ आणली आहे. लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित कामगारांच्या वेतनात कोणतीही कपात न करण्याचा शासनाचा आदेश तरीही महामंडळच शासन निर्णयाला केराची टोपली दाखवित आहे. त्यामुळे हा निर्णय मागे घेऊन कर्मचाºयांना न्याय द्यावा, अशी मागणी संघटनेचे सरचिटणीस मुकेश तिगोटे यांनी केली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसPuneपुणे