शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्यांना १५ दिवस विलगीकरण ; उपमुख्यमंत्री अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2021 14:10 IST

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या लक्षात घेऊन निर्णय

नागरिक ज्या प्रमाणात बाहेर पडत आहेत ते लक्षात घेता जिल्ह्याबाहेर पडणाऱ्या लोकांना 15 दिवसांचे विलगिकरण बंधनकारक करण्याचा विचार सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितले. पुण्यामध्ये आज कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी अजित पवारांनी बैठक घेतली त्यानंतर त्यांनी ही माहिती दिली आहे.

संसर्गाचे प्रमाण कमी झाले असले तरी राज्यात रुग्ण संख्या कमी झाले नाहीये. त्यामुळे हा निर्णय घेण्याचा विचार सुरू असल्याचे पवार यांनी सांगितले.

"आजच्या बैठकीत नवीन विषय पुढे आले. शनिवार रविवार देखील चालू राहणार नाही पुढचा शनिवार रविवार परिस्थीती आटोक्यात आलं तर पुन्हा विचार. काही जिल्ह्यांमध्ये अजून प्रमाण आहे.खूप मोठ्या प्रमाणावर शनिवार रविवार प्रचंड गर्दी आणि रांगा लागत आहेत. नागरी का असं करतायेत कळत नाही. नागरिकांनी गांभीर्याने घेतले पाहिजे.जास्त लोक बाहेर जात राहिले तर जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या लोकांना 15 दिवस विलागिकरणात राहावे लागेल याचा विचार सुरू."

दरम्यान नागरिकांनी काळजी घ्यायला पाहिजे असे सांगताना पवार म्हणाले,"अनेक देशात लसीकरण होऊनही पुन्हा लाट आली आहे. पिंपरी चिंचवड मधल्या मृत्यूंचा अभ्यास केला तर 60% मृत्यू हे 60 पेक्षा कमी वयाचा लोकांचे आहेत. पुढच्या आठवड्यात पुण्याचा देखील अहवाल सादर करण्याचे आदेश. 43% लोक कोणताही आजार नसणारे आहेत.महिलांपेक्षा पुरुषांचे मृत्यूचे प्रमाण अधिक आहे."

कोव्हॅक्सिन बाबत परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी बाबत पवार म्हणाले ," लस घेतलेल्यांना दुसऱ्या लसींचा डोस घेता येणार नाही असा तज्ञांचे मत. त्यामुळे परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना दुसरी लस घेता येणार नाही.जी घेतली आहे त्याला परवानगी मिळण्याची वाट पाहावी लागेल."

दरम्यान पुढचा आठवड्यात होणाऱ्या ओबीसी आरक्षणाचा बैठकीबाबत मी संबंधितांशी याबाबत चर्चा करेन आणि नियम पाळावे यासाठी सूचना देईन असे पवार म्हणाले.दरम्यान पर्यटनासाठी शनिवार रविवार बाहेर पडायचे कारण नाही इतर दिवशी नियम पाळणे बंधनकारक असणार आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसtourismपर्यटन