शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

ज्येष्ठ समीक्षक, साहित्यिक शंकर सारडा यांचे वृध्दापकाळाने पुण्यात निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 18:10 IST

सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.

पुणे : अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ समीक्षक शंकर सारडा यांचे बुधवारी, दि. २९ जानेवारी रोजी वृध्दापकाळाने निधन झाले. गेल्या काही  वर्षांपासून ते पार्किन्सनने आजारी होते. ते ८३ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी निर्मला सारडा, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. सावंतवाडी येथे १९९४ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते.शंकर सारडा यांचा जन्म ४ सप्टेंबर १९३७ रोजी महाबळेश्वर येथे झाला. त्यांचे शालेय शिक्षण  न्यू इंग्लिश स्कूल, रमणबाग येथे झाले. त्यानंतर त्यांनी एस.पी. कॉलेजमधून मराठी विषयातील पदवीचे शिक्षण घेतले. मुंबई विद्यापीठातून एमए केल्यानंतर अमेरिकेतील हार्वर्ड युनिव्हर्सिटीतून त्यांनी पदव्युत्तर शिक्षण घेतले. त्यांनी मास कम्यनिकेशनचे शिक्षणही पूर्ण केले.किशोरवयापासूनच शंकर सारडा यांचे लेखन आनंद, बालमित्र, साधना, मुलांचे मासिक यांसारख्या अंकांमधून प्रसिद्ध व्हायला सुरुवात झाली होती. त्यांनी ६० हून अधिक पुस्तके लिहिली असून, दोन हजांराहून जास्त पुस्तकांची समीक्षा केली आहे. टॉल्स्टॉय, गिबन यांसारख्या प्रख्यात लेखकांच्या कादंब-यांचा त्यांनी अनुवाद केला आहे. सारडा यांचे १९५० पासून बालसाहित्यात मोठे योगदान आहे.  झिप-या आणि रत्नी, नंदनवनाची फेरी, दूरदेशचे प्रतिभावंत, जेव्हा चुंबनाला बंदी होते, मांत्रिकाची जिरली मस्ती, स्त्रीवादी कादंबरी, विश्वसाहित्यातील फेरफटका, बेस्टसेलर बुक्स, ग्रंथ संवत्सर, ग्रंथ वैभव, ग्रंथ विशेष अशी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. अमरेंद्र गाडगीळ मराठी बालकुमार साहित्य संस्थेतर्फे दिला जाणारा जीवन गौरव पुरस्कार शंकर सारडा यांना देण्यात आला होता. याशिवाय, पहिल्या ह.मो.मराठे स्मृती गौरव पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले.शंकर सारडा यांनी १९६८ साली ह.मो.मराठे यांची ‘नि:ष्पर्ण वृक्षावर भर दुपारी’ ही कादंबरी साधनाच्या दिवाळी अंकात अतिथी संपादक या नात्याने प्रकाशित करण्याचे धैर्य दाखवले. सातारा येथे १९९३ साली झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते कार्याध्यक्ष होते.--------------शंकर सारडा यांनी भुषवलेली पदे :अध्यक्ष : अ.भा.बालकुमार साहित्य संमेलन, सावंतवाडी (१९९४)कार्याध्यक्ष : महाबळेश्वर येथील विभागीय साहित्य संमेलन (१९७०)स्वागताध्यक्ष : मराठी प्र्रकाशक परिषद (१९७८)कार्याध्यक्ष : अ.भा.मराठी साहित्य संमेलन, सातारा (१९९३)कार्याध्यक्ष : पहिले अभिजात साहित्य संमेलन, सातारा (१९९४)-----------बालसाहित्य: चतुर चंपा, मधुमुरली, राणीपरीची कृपा, झिप-या आणि रत्नी, गुराख्याचे पोर, चंद्रपरी आणि सोनसखा, राक्षसाने उचलली टेकडी, नंदनवनाची फेरी, मला मोठं व्हायचंय, देवदुताचं दु:ख, सोन्याच्या टेकडीचा शोध, जादूमंतर छू, शर्थ पराक्रमाची, मर्कटराजाच्या लीला, मांत्रिकाची जिरली मस्ती.......समीक्षा व इतर : काही पुस्तके काही लेखक, गुलमोहोर, पुस्तकांचं जग, दूरदेशचे प्रतिभावंत, ग्रंथविशेष, ग्रंथविशेष, ग्रंथचैतन्य, ग्रंथ संवत्सर, स्त्रीवादी कादंब-या, दशकातील पुस्तके, ग्रंथवैभव, विश्वसाहित्यातील फेरफटका, प्रिय चौकसराव, अक्षरभेट, बेस्टसेलर्स, लवंगी मिरच्या (हास्यकथा), जय भोलेनाथ (नाटिका), बोलके कमळ, केनेडी (चरित्र)---------------‘लोकमत’शी विशेष स्नेह :शंकर सारडा हे २००१-२००३ यादरम्यान ते ‘लोकमत’ रविवार पुरवणीचे संपादक होते. ‘अक्षरभेट’ या पुस्तकामध्ये त्यांनी ‘लोकमत’शी असलेल्या ॠणानुबंधाचा विशेष उल्लेख केला आहे. ते म्हणतात, ‘लोकमतमुळे महाराष्ट्राच्या सर्व भागातील वाचकवर्गाचा भरघोस प्रतिसाद परीक्षणांना मिळाला. पुस्तकांना मागणीही चांगली आल्याचे प्रकाशकांकडून समजले. लोकमतचे सर्वेसर्वा विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. निर्मल दर्डा यांनी अक्षररंग पुरवणी स्वत:हून काढण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळे हे लेखन झाले.’

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्यDeathमृत्यूmarathiमराठी