शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

ज्येष्ठ ‘हस्तलिखित’काराचे ‘कॅलिग्राफी’त ग्रंथ; दहा वर्षांपासून लेखनव्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:55 IST

सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरच्या जीवनात अनोख्या पद्धतीने विरंगुळा 

नम्रता फडणीस -  पुणे : ‘लेखन’ ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. लिखाणात सातत्य, संयम, सुलेखन, मेहनत अशा गोष्टींची नितांत आवश्यकता असते. त्यामुळेच बरेचसे लोक लेखनाच्या फारसे भानगडीत पडत नाहीत. सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या युगातही ७० वर्षीय व्यक्तीने जवळपास १७ आध्यात्मिक ग्रंथ तेही ‘कॅलिग्राफी’मध्ये लिहून पूर्ण केले आहेत, असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. या लेखनवेड्या ‘हस्तलिखित’काराचे नाव आहे, ‘सदाशिव यशवंत वाळिंबे’!वडगाव धायरी येथे वास्तव्यास असलेले वाळिंबे यांनी दहा वर्षांपासून हे लेखनव्रत अंगीकारले असून, या धार्मिक ग्रंथलेखनातून त्यांची अनोखी आध्यात्मिक सेवा घडत आहे. गुलबर्ग्याच्या कडगंची येथील देवस्थानामधील सायंदेव साखरे यांच्या मूळ  ‘गुरुचरित्र’ हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्याचा मानही त्यांना मिळाला असून, गाणगापूरच्या देवस्थानातर्फे त्यांच्यावर पुन्हा ‘गुरुचरित्र’लेखन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजपर्यंत वाळिंबे यांनी दोनदा गुरुचरित्राचे लेखन केले असून, सध्या तिसºयांदा ते गुरुचरित्र लिहीत आहेत. या  लेखनाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  या लेखनकार्याविषयी सदाशिव वाळिंबे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता  ‘या ग्रंथलेखनातून आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना’ त्यांनी व्यक्त केली. वाळिंबे म्हणाले, ‘‘निवृत्तीनंतर आमच्या काही मित्रमंडळींचे ‘श्रीमद्भागवत महापुराणा’चे पारायण करायचे ठरले. मात्र, त्यापूर्वी आम्ही आळंदी आणि देहूला जायचे ठरविले. देहूमध्ये संत तुकारामांची गाथा फरशीवर कोरल्याचे पाहिले आणि तिथूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’ यापासून लेखनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अनेक ग्रंथांची लेखनपूर्ती झाली आहे. 

............मी सुरुवातीला धार्मिक नव्हतो; पण लेखनामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. ‘कडगंची’साठी पुनर्लेखन करण्याची संधी मिळाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे.- सदाशिव यशवंत वाळिंबे, ‘हस्तलिखित’कार

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य