शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

ज्येष्ठ ‘हस्तलिखित’काराचे ‘कॅलिग्राफी’त ग्रंथ; दहा वर्षांपासून लेखनव्रत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2020 13:55 IST

सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीनंतरच्या जीवनात अनोख्या पद्धतीने विरंगुळा 

नम्रता फडणीस -  पुणे : ‘लेखन’ ही वाटते तितकी सोपी गोष्ट नाही. लिखाणात सातत्य, संयम, सुलेखन, मेहनत अशा गोष्टींची नितांत आवश्यकता असते. त्यामुळेच बरेचसे लोक लेखनाच्या फारसे भानगडीत पडत नाहीत. सध्याच्या ‘स्मार्ट फोन’च्या जमान्यात तरुण पिढीने तर लेखनाकडे काहीशी पाठच फिरविली आहे. मात्र, या तंत्रज्ञानाच्या युगातही ७० वर्षीय व्यक्तीने जवळपास १७ आध्यात्मिक ग्रंथ तेही ‘कॅलिग्राफी’मध्ये लिहून पूर्ण केले आहेत, असे सांगितले तर कदाचित विश्वास बसणार नाही. पण, हे खरे आहे. या लेखनवेड्या ‘हस्तलिखित’काराचे नाव आहे, ‘सदाशिव यशवंत वाळिंबे’!वडगाव धायरी येथे वास्तव्यास असलेले वाळिंबे यांनी दहा वर्षांपासून हे लेखनव्रत अंगीकारले असून, या धार्मिक ग्रंथलेखनातून त्यांची अनोखी आध्यात्मिक सेवा घडत आहे. गुलबर्ग्याच्या कडगंची येथील देवस्थानामधील सायंदेव साखरे यांच्या मूळ  ‘गुरुचरित्र’ हस्तलिखिताचे पुनर्लेखन करण्याचा मानही त्यांना मिळाला असून, गाणगापूरच्या देवस्थानातर्फे त्यांच्यावर पुन्हा ‘गुरुचरित्र’लेखन करण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आजपर्यंत वाळिंबे यांनी दोनदा गुरुचरित्राचे लेखन केले असून, सध्या तिसºयांदा ते गुरुचरित्र लिहीत आहेत. या  लेखनाचे ७५ टक्के काम पूर्ण झाले आहे.  या लेखनकार्याविषयी सदाशिव वाळिंबे यांच्याशी ‘लोकमत’ने संवाद साधला असता  ‘या ग्रंथलेखनातून आत्मिक समाधान मिळत असल्याची भावना’ त्यांनी व्यक्त केली. वाळिंबे म्हणाले, ‘‘निवृत्तीनंतर आमच्या काही मित्रमंडळींचे ‘श्रीमद्भागवत महापुराणा’चे पारायण करायचे ठरले. मात्र, त्यापूर्वी आम्ही आळंदी आणि देहूला जायचे ठरविले. देहूमध्ये संत तुकारामांची गाथा फरशीवर कोरल्याचे पाहिले आणि तिथूनच लेखनाची प्रेरणा मिळाली. ‘ज्ञानेश्वरी’, ‘तुकाराम गाथा’ यापासून लेखनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतर अनेक ग्रंथांची लेखनपूर्ती झाली आहे. 

............मी सुरुवातीला धार्मिक नव्हतो; पण लेखनामुळे मला अध्यात्माची गोडी लागली. ‘कडगंची’साठी पुनर्लेखन करण्याची संधी मिळाली, हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च क्षण आहे.- सदाशिव यशवंत वाळिंबे, ‘हस्तलिखित’कार

टॅग्स :Puneपुणेliteratureसाहित्य