शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पीएमपीच्या प्रवाशांची सुरक्षितता अन् बसही खिळखिळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 18:10 IST

सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत.. 

ठळक मुद्देपुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवासजुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद देखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारणभाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित

पुणे : बस पेटणे, चाक निखळणे, स्वयंचलित दरवाजे तुटलेले, काचा नसलेल्या खिडक्या, आसने फाटलेली, उचकटलेले पत्रे... अशा एक ना अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडत आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांची सुरक्षितताही खिळखिळी झाली आहे. याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन बसकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत. काही दिवसांपुर्वी वारजे येथे बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्यावरून खड्डयात कोसळली. शिवाजीनगर येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरींगसमोरील उड्डाणपुलावर बस पेटल्याची घटना घडली. त्यानंतर एका बसच्या मागील चाक केवळ चार नट-बोल्टच्या आधारावर धावत असल्याचे दिसून आले. तर शुक्रवारी डेंगळे पुलाजवळ बसचे पुढील चाकच निखळले. या घटना अलीकडच्या काही दिवसांतील असून यापुर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वारजे येथील घटनेत काही प्रवाशांना दुखापती झाल्या. प्रत्येक घटनेनंतर देखभाल-दुरूस्तीचा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अशीच एखादी घटना घडते. मागील अनेक वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे. 

पीएमपी प्रशासनाकडून जुन्या बसकडे बोट दाखविले जाते. जोपर्यंत नवीन बस येणार नाहीत, तोपर्यंत जुन्या बस मार्गावर सोडाव्याच लागणार आहेत. अन्यथा बसचे वेळापत्रक कोलमडून जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. तसेच भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची ठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कारवाईही थांबविण्यात आली आहे. जुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा अभाव व निष्काळजीपणामुळे बस खिळखिळ््या होत चालल्या आहेत. त्यातून लाखो प्रवाशांना वेठीस धरले जात असून त्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे. --------------------‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक बसमधील आसने फाटलेली दिसून आली. काही ठिकाणी बसण्यासाठी आसनच नाही. काही बसमध्ये पत्रे उचकटले आहेत. खिडक्यांना काचा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागत आहे. काही बसमध्ये आसनांमधून खिळे बाहेर आले होते. त्यामुळे अनेकवेळा कपडे फाटल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. काही बसच्या सायलेंसरमधून धुराचे लोट निघत होते. त्याचा बसमधील प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील वाहनचालकांनीही त्रास होत होता. बहुतेक बसचे स्वयंचलित दरवाजे बंद होते. हे दरवाजे दोरीच्या सहाय्याने बांधुने ठेवले होते. काही बसमध्ये दरवाजांना सिमेंटचे ब्लॉक लावल्याचे दिसले.
...............पैशांची चणचणदेखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारण आहे. पीएमपीच्या उत्पन्न कमी झाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. बसच्या दुरूस्तीसाठी आवश्यक सुट्टे भाग घेण्यासाठी कंपन्यांची देणी वेळेवर देता येत नाहीत. त्यामुळे जुन्या साहित्यावरच काही वेळा काम करावे लागते. त्यातून ब्रेकडाऊन व अन्य घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.................ठेकेदारांवर नाही नियंत्रण पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना बसची देखभाल-दुरुस्तीबाबत काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्यानंतरही या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. शुक्रवारी चाक निखळलेली बसही भाडेतत्वावरील होती. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण त्यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. ठेकेदारांकडील बसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पीएमपीतील अधिकारील कबुल करत आहेत.बस च्या काचा फुटलेल्या असतात. दरवाजे खराब आहेत. सीट चांगल्या नसतात. चालक धूम्रपान करून बसमध्येच  थुंकतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. - सुभद्रा माने, प्रवासी--------------मी दररोज बसने प्रवास करत असल्याने खिळखिळ्या बसचा रोजच अनुभव घेतो. दुसरा पर्याय नसल्याने या बसमधून प्रवास करणे अपरिहार्य आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे.- प्रशांत चोपडे................

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल