शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

पीएमपीच्या प्रवाशांची सुरक्षितता अन् बसही खिळखिळी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2018 18:10 IST

सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत.. 

ठळक मुद्देपुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवासजुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद देखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारणभाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित

पुणे : बस पेटणे, चाक निखळणे, स्वयंचलित दरवाजे तुटलेले, काचा नसलेल्या खिडक्या, आसने फाटलेली, उचकटलेले पत्रे... अशा एक ना अनेक तक्रारींचा दररोज पाऊस पडत आहे. या खिळखिळ्या झालेल्या बसमुळे प्रवाशांची सुरक्षितताही खिळखिळी झाली आहे. याकडे पुणे महानगर परिवहन महामंडळा (पीएमपी)सह दोन्ही महापालिकांचे दुर्लक्ष होत आहे. पुढील काही महिन्यांत ताफ्यात दाखल होणाऱ्या नवीन बसकडे बोट दाखवून जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला जात आहे. सर्वसामान्य प्रवासी मात्र कोणताही पर्याय नसल्याने खिळखिळ्या पीएमपीवर भरवसा ठेवत दैनंदिन प्रवास करत आहेत. काही दिवसांपुर्वी वारजे येथे बसच्या स्टेअरिंगचा रॉड तुटल्याने बस रस्त्यावरून खड्डयात कोसळली. शिवाजीनगर येथील कॉलेज आॅफ इंजिनिअरींगसमोरील उड्डाणपुलावर बस पेटल्याची घटना घडली. त्यानंतर एका बसच्या मागील चाक केवळ चार नट-बोल्टच्या आधारावर धावत असल्याचे दिसून आले. तर शुक्रवारी डेंगळे पुलाजवळ बसचे पुढील चाकच निखळले. या घटना अलीकडच्या काही दिवसांतील असून यापुर्वीही असे प्रकार अनेकदा घडले आहेत. या घटनांमध्ये सुदैवाने जीवितहानी झाली नाही. मात्र, वारजे येथील घटनेत काही प्रवाशांना दुखापती झाल्या. प्रत्येक घटनेनंतर देखभाल-दुरूस्तीचा मुद्दा चर्चेला येतो. मात्र, त्यानंतर काही दिवसांतच पुन्हा अशीच एखादी घटना घडते. मागील अनेक वर्षांपासून हे सातत्याने सुरू आहे. 

पीएमपी प्रशासनाकडून जुन्या बसकडे बोट दाखविले जाते. जोपर्यंत नवीन बस येणार नाहीत, तोपर्यंत जुन्या बस मार्गावर सोडाव्याच लागणार आहेत. अन्यथा बसचे वेळापत्रक कोलमडून जाईल, असा दावा प्रशासनाकडून केला जातो. तसेच भाडेतत्वावरील बसच्या देखभाल-दुरूस्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. मात्र, त्यांच्यावर आतापर्यंत कोणत्याही प्रकारची ठोर कारवाई करण्यात आलेली नाही. तत्कालीन अध्यक्ष तुकाराम मुंढे यांनी सुरू केलेली कारवाईही थांबविण्यात आली आहे. जुन्या बसप्रमाणेच काही महिन्यांपुर्वी दाखल झालेल्या अनेक नवीन बसच्या स्वयंचलित यंत्रणा बंद आहेत. त्यामुळे देखभाल-दुरूस्तीचा अभाव व निष्काळजीपणामुळे बस खिळखिळ््या होत चालल्या आहेत. त्यातून लाखो प्रवाशांना वेठीस धरले जात असून त्यांची सुरक्षितता रामभरोसे आहे. --------------------‘लोकमत’ने केलेल्या पाहणीमध्ये अनेक बसमधील आसने फाटलेली दिसून आली. काही ठिकाणी बसण्यासाठी आसनच नाही. काही बसमध्ये पत्रे उचकटले आहेत. खिडक्यांना काचा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना धोकादायक पध्दतीने प्रवास करावा लागत आहे. काही बसमध्ये आसनांमधून खिळे बाहेर आले होते. त्यामुळे अनेकवेळा कपडे फाटल्याच्या तक्रारी प्रवाशांनी केल्या. काही बसच्या सायलेंसरमधून धुराचे लोट निघत होते. त्याचा बसमधील प्रवाशांबरोबरच रस्त्यावरील वाहनचालकांनीही त्रास होत होता. बहुतेक बसचे स्वयंचलित दरवाजे बंद होते. हे दरवाजे दोरीच्या सहाय्याने बांधुने ठेवले होते. काही बसमध्ये दरवाजांना सिमेंटचे ब्लॉक लावल्याचे दिसले.
...............पैशांची चणचणदेखभाल-दुरूस्तीच्या अभावामागे पैशांची चणचण हेही कारण आहे. पीएमपीच्या उत्पन्न कमी झाल्याने दैनंदिन खर्च भागविणे कठीण जाऊ लागले आहे. त्यामुळे अनेकदा कर्मचाऱ्यांचे वेतनही वेळेवर होत नाही. बसच्या दुरूस्तीसाठी आवश्यक सुट्टे भाग घेण्यासाठी कंपन्यांची देणी वेळेवर देता येत नाहीत. त्यामुळे जुन्या साहित्यावरच काही वेळा काम करावे लागते. त्यातून ब्रेकडाऊन व अन्य घटना घडत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.................ठेकेदारांवर नाही नियंत्रण पीएमपी प्रशासनाने ठेकेदारांना बसची देखभाल-दुरुस्तीबाबत काळजी घेण्याची सक्त ताकीद दिली आहे. मात्र, त्यानंतरही या बसच्या ब्रेकडाऊनचे प्रमाण कमी झालेले नाही. शुक्रवारी चाक निखळलेली बसही भाडेतत्वावरील होती. बसचा वेग कमी असल्याने प्रवाशांना दुखापत झाली नाही. पण त्यामुळे या घटनेचे गांभीर्य कमी होत नाही. ठेकेदारांकडील बसच्या देखभाल-दुरूस्तीवर पीएमपीचे नियंत्रण नसल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे पीएमपीतील अधिकारील कबुल करत आहेत.बस च्या काचा फुटलेल्या असतात. दरवाजे खराब आहेत. सीट चांगल्या नसतात. चालक धूम्रपान करून बसमध्येच  थुंकतात. त्याचा प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागतो. - सुभद्रा माने, प्रवासी--------------मी दररोज बसने प्रवास करत असल्याने खिळखिळ्या बसचा रोजच अनुभव घेतो. दुसरा पर्याय नसल्याने या बसमधून प्रवास करणे अपरिहार्य आहे. प्रशासनाने प्रवाशांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे.- प्रशांत चोपडे................

टॅग्स :PuneपुणेPMPMLपीएमपीएमएल