शहरं
Join us  
Trending Stories
1
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
2
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
3
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
4
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
5
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
6
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
7
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
8
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
9
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
10
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
11
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
12
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
13
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
14
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
15
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
16
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
17
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
18
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
19
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
20
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर

तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे; १०८ एकर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अवघे १२ सुरक्षा रक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 08:50 IST

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना...

- राजू हिंगे

पुणे : तब्बल १०८ एकर क्षेत्रात पसरलेल्या तळजाई टेकडीचा परिसर दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांसाठी नंदनवन ठरत आहे. या टेकडीवर टवाळखोरांसह गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. यासोबतच तळजाई टेकडीवर प्रेमी युगुल भेटण्यासाठी येतात आणि दिवसभर येथेच रमतात. अशा कारणांमुळे या टेकडीवर छेडछाड, बलात्कार, खून अशा गुन्ह्यांचे प्रकार वाढले आहेत. असे असतानाही महापालिकेने या टेकडीच्या सुरक्षेसाठी केवळ १२ सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच स्पष्ट होत आहे.

तळजाई टेकडीच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला पुणेकरांच्या प्रयत्नातून दहा हजार वृक्षांचे कोंदण लाभले आहे. विविध प्रकारचे देशी वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार झाली आहे. या टेकडीवर मोठ्या संख्येने नागरिक सकाळ आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. त्याचबरोबर या टेकडीवर प्रेमी युगुले एकांत आणि फिरण्यासाठी येतात. येथेच काहीजण आडोशाला बसून सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात. अनेकदा येथे प्रेमी युगुलांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी तरतूद

तळजाई टेकडीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी पालिकेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना

तळजाई टेकडीवर दरवर्षी साधारणपणे १५ ते २० आगीच्या घटना घडत आहेत. ही आग अनेकदा सिगारेट ओढणाऱ्यांकडून कधी जाणीवपूर्वक तर कधी अनवधानाने लागते. दरवर्षी उन्हाळ्य़ात आगीच्या घटना घडतात. या आगीमुळे तळजाई टेकडीवरील वनसंपदेचे नुकसान होते.

सुरक्षा रक्षकांची संख्या कमी का केली ?

तळजाई टेकडीवरील डोंगर माथा, डोंगर उताराची जागा मिळविण्यासाठी पालिकेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागते. त्यानंतर ही जागा पालिकेला मिळाली आहे. या टेकडीवर २०१७ पर्यंत पालिकेचे ४० सुरक्षा रक्षक होते. पण आता अवघे १२ सुरक्षा रक्षक येथे तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. पूर्वी जास्त सुरक्षा रक्षक होते मग आता ही संख्या कमी का केली? असा सवाल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

असा दिला न्यायालयीन लढा

तळजाई टेकडीवर १९४२ निवासी प्लॉटचा लेआऊट मंजूर होता. १२० एकरमध्ये १८६ प्लॉट होते. त्यापैकी ११२ निवासी आणि उर्वरित प्लॉट सार्वजनिक सुविधांसाठी राखीव होते. पण या प्लॉटवर काही झाले नाही. त्यामुळे शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यात या तळजाई टेकडीवर हिलटॉप हिल स्लोप झोन पडला. त्यानंतर तळजाई टेकडीचा विकास करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना सुभाष जगताप यांनी २००२-०३ साली आर्थिक तरतूद केली. त्यानंतर तळजाई टेकडीचे भूसंपादन पालिकेने सुरू केले. पण ही भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील कलमानुसार झाली नाही. त्यामुळे ही भूसंपादन प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्द केली. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी संमिश्र निकाल दिला. त्यावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन या जागेचे भूसंपादन योग्य पद्धतीने झाल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावर पुणे महापालिकेने १०८ एकर जमिनीसाठी २७ कोटी भरले.

तळजाई टेकडीवरील १०८ एकर क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी पालिकेचे दिवसा १० आणि रात्री दोन सुरक्षा रक्षक आहेत. या टेकडीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत आगामी काळात वाढ करण्यात येईल

- राकेश विटकर, प्रभारी सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :Taljai Tekdiतळजाई टेकडीPuneपुणे