शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे; १०८ एकर क्षेत्राच्या सुरक्षेसाठी अवघे १२ सुरक्षा रक्षक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2023 08:50 IST

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना...

- राजू हिंगे

पुणे : तब्बल १०८ एकर क्षेत्रात पसरलेल्या तळजाई टेकडीचा परिसर दारूच्या पार्ट्या करणाऱ्यांसाठी नंदनवन ठरत आहे. या टेकडीवर टवाळखोरांसह गुन्हेगारांचा वावर वाढला आहे. यासोबतच तळजाई टेकडीवर प्रेमी युगुल भेटण्यासाठी येतात आणि दिवसभर येथेच रमतात. अशा कारणांमुळे या टेकडीवर छेडछाड, बलात्कार, खून अशा गुन्ह्यांचे प्रकार वाढले आहेत. असे असतानाही महापालिकेने या टेकडीच्या सुरक्षेसाठी केवळ १२ सुरक्षारक्षक नेमले आहेत. त्यामुळे तळजाई टेकडीची सुरक्षा रामभरोसे असल्याचेच स्पष्ट होत आहे.

तळजाई टेकडीच्या मूळ नैसर्गिक सौंदर्याला पुणेकरांच्या प्रयत्नातून दहा हजार वृक्षांचे कोंदण लाभले आहे. विविध प्रकारचे देशी वृक्ष लावून तळजाई टेकडी हिरवीगार झाली आहे. या टेकडीवर मोठ्या संख्येने नागरिक सकाळ आणि सायंकाळी फिरण्यासाठी येतात. त्याचबरोबर या टेकडीवर प्रेमी युगुले एकांत आणि फिरण्यासाठी येतात. येथेच काहीजण आडोशाला बसून सिगारेट ओढतात. अनेक ठिकाणी दारू-बिअरच्या बाटल्या दिसून येतात. अनेकदा येथे प्रेमी युगुलांना लुटण्याच्या घटनाही घडल्या आहेत. मात्र येथे सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरेही बसविले नाहीत.

सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी तरतूद

तळजाई टेकडीवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याची मागणी माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी पालिका आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे केली होती. त्यानंतर सीसीटीव्ही कॅमेऱ्यासाठी पालिकेच्या २०२३-२४ च्या अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली आहे.

टेकडीवर दरवर्षी आगीच्या १५ ते २० घटना

तळजाई टेकडीवर दरवर्षी साधारणपणे १५ ते २० आगीच्या घटना घडत आहेत. ही आग अनेकदा सिगारेट ओढणाऱ्यांकडून कधी जाणीवपूर्वक तर कधी अनवधानाने लागते. दरवर्षी उन्हाळ्य़ात आगीच्या घटना घडतात. या आगीमुळे तळजाई टेकडीवरील वनसंपदेचे नुकसान होते.

सुरक्षा रक्षकांची संख्या कमी का केली ?

तळजाई टेकडीवरील डोंगर माथा, डोंगर उताराची जागा मिळविण्यासाठी पालिकेला सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढावे लागते. त्यानंतर ही जागा पालिकेला मिळाली आहे. या टेकडीवर २०१७ पर्यंत पालिकेचे ४० सुरक्षा रक्षक होते. पण आता अवघे १२ सुरक्षा रक्षक येथे तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे येथील सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहेत. पूर्वी जास्त सुरक्षा रक्षक होते मग आता ही संख्या कमी का केली? असा सवाल राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक सुभाष जगताप यांनी केला आहे.

असा दिला न्यायालयीन लढा

तळजाई टेकडीवर १९४२ निवासी प्लॉटचा लेआऊट मंजूर होता. १२० एकरमध्ये १८६ प्लॉट होते. त्यापैकी ११२ निवासी आणि उर्वरित प्लॉट सार्वजनिक सुविधांसाठी राखीव होते. पण या प्लॉटवर काही झाले नाही. त्यामुळे शहराच्या १९८७ च्या विकास आराखड्यात या तळजाई टेकडीवर हिलटॉप हिल स्लोप झोन पडला. त्यानंतर तळजाई टेकडीचा विकास करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष असताना सुभाष जगताप यांनी २००२-०३ साली आर्थिक तरतूद केली. त्यानंतर तळजाई टेकडीचे भूसंपादन पालिकेने सुरू केले. पण ही भूसंपादन प्रक्रिया कायद्यातील कलमानुसार झाली नाही. त्यामुळे ही भूसंपादन प्रक्रिया उच्च न्यायालयाने रद्द केली. त्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या दोन न्यायमूर्तींनी संमिश्र निकाल दिला. त्यावर महापालिकेने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली. त्यावेळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठापुढे सुनावणी होऊन या जागेचे भूसंपादन योग्य पद्धतीने झाल्याचा निर्णय देण्यात आला. त्यावर पुणे महापालिकेने १०८ एकर जमिनीसाठी २७ कोटी भरले.

तळजाई टेकडीवरील १०८ एकर क्षेत्राचे संरक्षण करण्यासाठी पालिकेचे दिवसा १० आणि रात्री दोन सुरक्षा रक्षक आहेत. या टेकडीवरील सुरक्षा रक्षकांच्या संख्येत आगामी काळात वाढ करण्यात येईल

- राकेश विटकर, प्रभारी सुरक्षा अधिकारी, पुणे महापालिका

टॅग्स :Taljai Tekdiतळजाई टेकडीPuneपुणे