शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
5
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
6
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
7
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
8
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
9
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
10
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
11
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
12
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
13
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
14
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
15
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
16
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
17
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
18
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
19
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती
20
'या' १६ देशांमध्ये चिकनगुनियाचा कहर, चीनमध्ये ७००० रुग्ण; अमेरिकेतही अलर्ट जारी

आरटीईची दुसरी सोडत १३ मेनंतर, पालक हवालदिल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2018 03:42 IST

राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

पुणे - राज्यातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये आरटीई प्रवेशाच्या दुसऱ्या फेरीला सुरुवात झाली आहे; मात्र पुणे जिल्ह्यातील दुसºया फेरीची लॉटरी पद्धतीने सोडत १३ मेनंतरच निघू शकेल. प्राथमिक शिक्षण संचालनालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दुसºया फेरीच्या प्रवेशाची वाट पाहत असलेल्या पालकांना आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे.पुणे जिल्ह्यातील आरटीई प्रवेश प्रक्रियेमध्ये अनेक विघ्न येत आहेत. काही इंग्रजी शाळांनी प्रवेश देण्यास दिलेला नकार, न्यायालयाची प्रवेशाला स्थगिती या गोंधळामध्ये आरटीईची पहिली फेरी अद्यापही पूर्ण होऊ शकलेली नाही. पुणे जिल्ह्यातील पहिल्या फेरीत प्रवेश मिळालेले ५६ शाळांमधील ६७४ विद्यार्थी अद्यापही प्रवेशापासून वंचित राहिले आहेत. न्यायालयाने प्रवेशावरील स्थगिती उठविल्याने या विद्यार्थ्यांना येत्या ११ मेच्या आत प्रवेश देण्याचे निर्देश प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून देण्यात आले आहेत.पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांच्या प्रवेशाची प्रक्रिया अद्याप पूर्ण न झाल्याने दुसºया फेरीची सोडत काढता येत नाही. दुसºया फेरीच्या सोडत काढण्याबाबत प्राथमिक शिक्षण संचलनालयाकडून शासनाकडे मार्गदर्शन मागण्यात आला होता. पहिल्या फेरीची प्रवेश प्रक्रिया येत्या ११ मेपर्यंत पूर्ण करून घ्यावी. त्यानंतर दुसºया फेरीची सोडत काढावी, अशा सूचना शासनाकडून देण्यात आल्या आहेत. या मुदतीत ज्या शाळा प्रवेश देणार नाहीत, त्यांच्यावर कारवाईला सुरुवात करावी, असे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.आरटीईच्या पहिल्या फेरीतील सोडतीसाठी शाळेपासून १ किलोमीटरच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांनाच विचार करण्यात आला होता. दुसºया फेरीत शाळेपासून दोन किलोमीटर अंतराच्या आत राहणाºया विद्यार्थ्यांमधून प्रवेशाची सोडत काढण्यात येणार आहे. त्यामुळे आरटीई प्रवेशासाठी अर्ज केलेल्या बहुसंख्य पालकांचे याकडे लक्ष लागले आहे.प्रवेशाची प्रक्रियापूर्ण करावी लागणारआरटीई प्रवेशासाठी सरकारकडून मिळणारी शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम मिळाली नसल्याचे कारण देत, इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन (इसा) संघटनेच्या माध्यमातून राज्यातील २६३ शाळांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. त्यानंतर शासनाकडून प्रतिपूर्ती शुल्काची रक्कम शाळांना अदा करण्यास सुरुवात केली. या पार्श्वभूमीवर पहिल्या फेरीतील विद्यार्थ्यांना प्रवेश न दिलेल्या शाळांना आता प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

टॅग्स :PuneपुणेEducation Sectorशिक्षण क्षेत्र