शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:21 IST

केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : सभ्य किंवा सुसंस्कृत समाजामधील सर्व लोक हे उदारमतवादी आणि धोती-कुर्ता वेश परिधान केला तर आम्ही असभ्य आणि प्रतिगामी अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जात असल्याची टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.दखनी अदाब फाउंडेशनतर्फे ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सभ्य समाजात उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या मंडळींना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही, म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारले जातात. किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मात्र, लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात, हा प्रश्न आहे. देश एकसंध राहण्यासाठी आणि देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.............कलेला जातधर्म नसतो. त्यापलीकडे जाऊन साहित्य निर्माण व्हायला हवे. देशात स्वतंत्रता हवी असे आपण म्हणतो; पण इथे इतिहास विदेशी लोकांचा शिकवला जात आहे हे आपले दुर्दैव आहे.- सत्यपाल सिंह .............

प्रत्येक शहर, गल्लीत साहित्य महोत्सव भरवले जात आहेत, अशी टीका केली जाते. फॅशन म्हणून लोक येतात अस म्हटलं जातं; पण दोन लोकांची मने जरी बदलली तरी पुष्कळ आहे. ज्या देशाची कला समृद्ध असते तिथली अर्थव्यवस्था सुदृढ राहते.- विशाल भारद्वाज ............

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी