शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
2
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
3
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
4
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
5
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
6
सोन्या-चांदीचे दर गगनाला भिडले, आज सर्व जुने रेकॉर्ड मोडले! पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेटपर्यंतचे 'लेटेस्ट रेट'
7
मृत्यूच्या खोलीतलं 'ते' भयंकर 'सत्य'! अभिषेकने भिंतीवर का चिटकवले सोनमचे फोटो आणि चॅट्स?
8
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधूंबद्दलही बरंच बोलले
9
IND W vs SL W 2nd T20I Live Streaming : कॅप्टन हरमनप्रीतची नाराजी दूर करण्यासाठी मैदानात उतरणार टीम इंडिया!
10
इराणमध्ये नवीन संकट येणार! ७ लाख वर्षांपासून निष्क्रिय असलेला ज्वालामुखी उद्रेकाच्या तयारीत
11
“आमचा लढा भाजपाशी नाही, तर...”; जर्मनीत राहुल गांधींचे मोठे विधान, मतचोरीवरही स्पष्ट भाष्य
12
ना मंदिर, ना मूर्तिपूजा; संपूर्ण शरीरावर फक्त 'रामनाम', या आदिवासी समाजाची अनोखी परंपरा
13
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
14
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
15
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
16
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
17
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
18
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
19
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
20
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
Daily Top 2Weekly Top 5

मतांशी सहमत नसल्यास धर्मांधाचा शिक्का लागतो : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2020 12:21 IST

केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे.

ठळक मुद्देडेक्कन लिटरेचर फेस्टिव्हलचे उद्घाटन

पुणे : सभ्य किंवा सुसंस्कृत समाजामधील सर्व लोक हे उदारमतवादी आणि धोती-कुर्ता वेश परिधान केला तर आम्ही असभ्य आणि प्रतिगामी अशी मिश्कील टिप्पणी करीत, आपल्या मताशी समोरचा सहमत नसेल तर त्याच्यावर विशिष्ट विचारांचा शिक्का मारला जातो. आम्हीच तेवढे उदारमतवादी असे लोकांना वाटते. बाकीच्यांना जातीय, धर्मांध ठरवले जात असल्याची टीका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केली.दखनी अदाब फाउंडेशनतर्फे ‘डेक्कन लिटरेचर फेस्टिव्हल’चे उद्घाटन भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते झाले, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून खासदार सत्यपाल सिंह, प्रसिद्ध दिग्दर्शक विशाल भारद्वाज, साखर आयुक्त सौरभ राव आणि जिल्हाधिकारी नवल किशोर राम, मनोज ठाकूर उपस्थित होते. यावेळी उपजिल्हाधिकारी मोनिका सिंग यांच्या गझलसंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले.सभ्य समाजात उदारमतवादी म्हणवून घेणाऱ्या मंडळींना कोश्यारी यांनी चांगलेच लक्ष्य केले. केवळ आम्हीच उदारमतवादी बाकीचे प्रतिगामी असा शिक्का मारण्याची सध्या चढाओढ लागली आहे. लोक स्वत:च स्वत:ला उदारमतवादी म्हणून जाहीर करतात. समोरची व्यक्ती आपल्या विचारांशी मिळती-जुळती नाही, म्हणून ती प्रगतिशील वाटत नाही. त्या व्यक्तीची प्रगती कशी होईल, हा विचार करायचा सोडून तिच्यावर जातीय, धर्मांध, पुराणमतवादी असे शिक्के मारले जातात. किमान साहित्यिक आणि कलाकारांनी तरी हे उद्योग करू नयेत, असा सल्लाही कोश्यारी यांनी दिला.साहित्य हा समाजाचा आरसा असतो. मात्र, लेखणी आणि चित्रपटाचा परिणामदेखील समाजमनावर होत असतो. त्यामुळे या दोन्हींमध्ये खूप मोठी ताकद आहे. एखादा निर्माता आणि साहित्यिक या ताकदीचा उपयोग कसा करतात, हा प्रश्न आहे. देश एकसंध राहण्यासाठी आणि देशाबद्दल अभिमान जागृत ठेवण्यासाठी साहित्यिक आणि कलाकार नक्कीच योगदान देऊ शकतात. त्यांच्या प्रयत्नातून नवनीत समोर येऊ शकेल आणि समाजाला नवी दिशा मिळू शकेल, असा विश्वासही राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केला.............कलेला जातधर्म नसतो. त्यापलीकडे जाऊन साहित्य निर्माण व्हायला हवे. देशात स्वतंत्रता हवी असे आपण म्हणतो; पण इथे इतिहास विदेशी लोकांचा शिकवला जात आहे हे आपले दुर्दैव आहे.- सत्यपाल सिंह .............

प्रत्येक शहर, गल्लीत साहित्य महोत्सव भरवले जात आहेत, अशी टीका केली जाते. फॅशन म्हणून लोक येतात अस म्हटलं जातं; पण दोन लोकांची मने जरी बदलली तरी पुष्कळ आहे. ज्या देशाची कला समृद्ध असते तिथली अर्थव्यवस्था सुदृढ राहते.- विशाल भारद्वाज ............

टॅग्स :Puneपुणेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी