शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

वनस्पतींची संवेदना जाणून घेणारा शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:09 IST

वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे एक शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस. त्यांनी हा शोध लावला. हे उपकरण त्यांनी रोपट्याला जोडले. त्याच्या सूक्ष्म ...

वनस्पतीशास्त्राचा अभ्यास करणारे एक शास्त्रज्ञ डॉ. जगदीशचंद्र बोस. त्यांनी हा शोध लावला. हे उपकरण त्यांनी रोपट्याला जोडले. त्याच्या सूक्ष्म स्पंदनांना वर्धित स्वरूपात पडद्यावर दाखवणे हा प्रयोग त्यांनी केला आणि वनस्पतींना संवेदना असते हे जगाला दाखवून दिले.

सर जगदीशचंद्र बोस ३० नोव्हेंबर १८५८ रोजी पूर्व बांगलामधील ढाक्का जिल्ह्यातील राणीखल येथे जन्मले. बालपणी त्यांच्यावर रामायण आणि महाभारत या श्रेष्ठ महाकाव्यांचे संस्कार झाले. मित्रांनो, सातत्याने कठोर परिश्रम केल्यास अपयशाचे परिवर्तन यशामध्ये होऊ शकते यावर त्यांची श्रद्धा होती. इ. स.१८९५ मध्ये प्रा. बोस यांनी रेडिओतरंग पक्क्या भिंतीतून परिवर्तित कार्य येऊ शकतात हे प्रयोगाद्वारे दाखवले.

वनस्पतीशरीर क्रियाशास्त्र या विषयावर त्यांनी संशोधन केले. वनस्पती उत्तेजित झाल्यास त्यांच्यात सूक्ष्म हालचाली होतात. मनाप्रमाणे सुखदुःखाच्या प्रतिक्रिया आवाजाच्या माध्यमातून जरी त्या व्यक्त करू शकल्या नाहीत तरी फुलून किंवा कोमेजून किंवा वाळून त्या आपल्या भावना व्यक्त करतात. अन्य सजीवांप्रमाणे वनस्पतीही श्वासोच्छ्वास करतात हे पाहून जगभरातील शास्त्रज्ञांनी आश्चर्य व्यक्त केले.

‘मृत्यूनंतर माझी उरलीसुरली संपत्ती विकून त्यातून मिळणारे धन सामाजिक कार्यासाठी वापरावेच’ असे विधान त्यांनी मृत्यूच्या एक दिवस आधी केले होते. कविश्रेष्ठ रवींद्रनाथ टागोर, भारतीय थोर वैज्ञानिक सी. व्ही. रमण यांचे समकालीन वैज्ञानिक सर जगदीशचंद्र बोस यांचे निधन २३ नोव्हेंबर १९३७ रोजी झाले.

- प्राजक्ता प्रशांत मुरमट्टी