शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

शाळांना नाही अग्निशमनचे कवच, धोक्याच्या धड्याकडे दुर्लक्ष, शाळा प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:28 IST

शहरातील बोटावर मोजण्याइतक्या शाळांनादेखील अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची एखादी घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी प्राथमिक सुविधांनीदेखील शाळा आस्थापना सज्ज नाहीत.

- विशाल शिर्के / राजानंद मोरेपुणे : शहरातील बोटावर मोजण्याइतक्या शाळांनादेखील अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची एखादी घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी प्राथमिक सुविधांनीदेखील शाळा आस्थापना सज्ज नाहीत. अग्निशमन यंत्रणांकडून शहरातील शेकडो शाळांपैकी अवघ्या २७ शाळांनीच अंतिम ना हरकत दाखला घेतला असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही दुर्घटना कधी सांगून येत नाही. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता दुर्घटना झाल्यानंतरच विशिष्ट गोष्टींची तपासणी करण्याची पद्धत प्रशासनामध्ये रुजली आहे. तळजाईमध्ये एखादी इमारत पडल्यावर बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यानुसार बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेतली जाते. बुक स्टॉलला आग लागल्यावर सर्व बुक स्टॉलची तपासणी, एखादा वाडा पडल्यावर पुन्हा जुन्या इमारती आणि वाड्यांची तपासणी असा खेळ पाहायला मिळतो. तशाच पद्धतीने शाळांमधील अग्निशमन यंत्रणेकडे पाहिले जात आहे.अग्निशमन यंत्रणेबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनालाच आनास्था नाही. ती अनास्था अग्निशमन यंत्रणेकडे देखील आहे. शहरात महापालिकेच्याच २९७ शाळा आहेत. खासगी शाळांची संख्या कितीतरी अधिक आहे.मात्र, अग्निशमन विभागाकडे केवळ २०१० ते २०१७ या कालावधीतील अवघ्या १४६ शाळा, महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इमारतींच्या ना हरकत प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध आहे. त्यातही २७ शाळांच्या व्यवस्थापनाने अग्निशमन विभागाकडून अंतिम ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. विशेष म्हणजे एकाही शाळा-महाविद्यालयांना त्याबाबत अग्निशमन विभागाने त्याबाबत नोटीस बजावली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. एखाद्या प्रसंगी संबंधित इमारतीला टाळे ठोकण्याचे देखील अधिकार अग्निशमन अधिकाºयांना आहेत. असे असताना शालेय मुलांबाबत ही अनास्था दाखविण्यात येत आहे.ना हरकत प्रमाणपत्राकडे दुर्लक्षमहाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम २००६ अन्वये प्रत्येक शाळा महाविद्यालयांना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. शाळांचा आराखडा तयार झाल्यानंतर संबंधित आर्किटेक्चर अग्निशमन यंत्रणेकडून तशी प्राथमिक परवानगी अग्निशमन यंत्रणेकडून घेतो.मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणचे अंतिम ना हरकत प्रमाणपत्रच घेत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आराखड्याप्रमाणे संबंधित इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसवेलेली आहे की नाही, याचीदेखील माहिती अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाही.अशी असावी अग्निशमन यंत्रणा...कोणतीही इमारत १५ ते २४ मीटर उंचीदरम्यान असल्यास त्याला उच्चदाबाचे पंप, सायरन, स्प्रिंकलर, अंतर्गत आणि बाह्य पाण्याची पाइपलाइन उभारणे आवश्यक असते. या इमारतीवर डाऊनकमर पद्धतीने वरुन खाली पाणी येण्यासाठी खास १० हजार लिटरची पाण्याची टाकी राखीव असावी. ती टाकी वर्षभर भरलेली राहण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच २४ मीटर उंचीपेक्षा अधिक उंच इमारतींवर आणि भूमिगत देखील पाण्याची टाकी असावी. साधारण १५ मीटर उंचीच्या इमारतीत वाहनतळ आणि चार मजले येतात.काही आस्थापनाच्या रचनेनुसार मजल्यात वाढ अथवा घट होऊ शकते. तर पंधरा मीटरखालील इमारतीत फायर इस्टिंग्युशर बसविणे गरजेचे असते. तेदेखील आठ ते दहा मीटरवर एक याप्रमाणे असावे. शाळांसारख्या सार्वजनिक आणि धोकायदायक ठरू शकणाºया ठिकाणी अशी यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. शाळांमध्ये सामान्यत: ड्राय केमिकल पावडरचे फायर इस्टिंग्युशर वापरण्यात येते. त्याची परवानगी अग्निशमन विभागाकडून घ्यावी लागेल, असे अग्निशमन विभागातील अधिकाºयांनी सांगितले.पुरेसे कर्मचारीबळ नसल्याने अग्निशमन यंत्रणांची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक शाळेनी खासगी एजन्सीमार्फत अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून, त्याची प्रत विभागाला पाठविणे अपेक्षित आहे.- प्रशांत रणपिसे,मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :Puneपुणे