शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
2
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
3
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
4
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
5
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
6
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
7
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
8
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
9
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
10
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
11
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
13
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
14
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
15
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
16
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
17
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
18
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
19
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
20
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना नाही अग्निशमनचे कवच, धोक्याच्या धड्याकडे दुर्लक्ष, शाळा प्रशासनाची अनास्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2017 04:28 IST

शहरातील बोटावर मोजण्याइतक्या शाळांनादेखील अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची एखादी घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी प्राथमिक सुविधांनीदेखील शाळा आस्थापना सज्ज नाहीत.

- विशाल शिर्के / राजानंद मोरेपुणे : शहरातील बोटावर मोजण्याइतक्या शाळांनादेखील अग्निशमन यंत्रणेचे कवच नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आगीची एखादी घटना घडल्यास त्याला तोंड देण्यासाठी प्राथमिक सुविधांनीदेखील शाळा आस्थापना सज्ज नाहीत. अग्निशमन यंत्रणांकडून शहरातील शेकडो शाळांपैकी अवघ्या २७ शाळांनीच अंतिम ना हरकत दाखला घेतला असल्याचे दिसून येत आहे.कोणतीही दुर्घटना कधी सांगून येत नाही. गेल्या काही वर्षांचा अनुभव पाहता दुर्घटना झाल्यानंतरच विशिष्ट गोष्टींची तपासणी करण्याची पद्धत प्रशासनामध्ये रुजली आहे. तळजाईमध्ये एखादी इमारत पडल्यावर बेकायदेशीर इमारतींचा प्रश्न ऐरणीवर येतो. त्यानुसार बांधकामे पाडण्याची मोहीम हाती घेतली जाते. बुक स्टॉलला आग लागल्यावर सर्व बुक स्टॉलची तपासणी, एखादा वाडा पडल्यावर पुन्हा जुन्या इमारती आणि वाड्यांची तपासणी असा खेळ पाहायला मिळतो. तशाच पद्धतीने शाळांमधील अग्निशमन यंत्रणेकडे पाहिले जात आहे.अग्निशमन यंत्रणेबाबत संबंधित शाळा व्यवस्थापनालाच आनास्था नाही. ती अनास्था अग्निशमन यंत्रणेकडे देखील आहे. शहरात महापालिकेच्याच २९७ शाळा आहेत. खासगी शाळांची संख्या कितीतरी अधिक आहे.मात्र, अग्निशमन विभागाकडे केवळ २०१० ते २०१७ या कालावधीतील अवघ्या १४६ शाळा, महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील इमारतींच्या ना हरकत प्रमाणपत्राची माहिती उपलब्ध आहे. त्यातही २७ शाळांच्या व्यवस्थापनाने अग्निशमन विभागाकडून अंतिम ना हरकत प्रमाणपत्र घेतलेले आहे. विशेष म्हणजे एकाही शाळा-महाविद्यालयांना त्याबाबत अग्निशमन विभागाने त्याबाबत नोटीस बजावली नाही. माहिती अधिकार कार्यकर्ते अजहर खान यांनी ही माहिती उघडकीस आणली आहे. एखाद्या प्रसंगी संबंधित इमारतीला टाळे ठोकण्याचे देखील अधिकार अग्निशमन अधिकाºयांना आहेत. असे असताना शालेय मुलांबाबत ही अनास्था दाखविण्यात येत आहे.ना हरकत प्रमाणपत्राकडे दुर्लक्षमहाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीव संरक्षण अधिनियम २००६ अन्वये प्रत्येक शाळा महाविद्यालयांना अग्निशमन विभागाकडून ना हरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. शाळांचा आराखडा तयार झाल्यानंतर संबंधित आर्किटेक्चर अग्निशमन यंत्रणेकडून तशी प्राथमिक परवानगी अग्निशमन यंत्रणेकडून घेतो.मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित यंत्रणचे अंतिम ना हरकत प्रमाणपत्रच घेत असल्याचे दिसून येत नाही. त्यामुळे आराखड्याप्रमाणे संबंधित इमारतीत अग्निशमन यंत्रणा बसवेलेली आहे की नाही, याचीदेखील माहिती अग्निशमन विभागाकडे उपलब्ध नाही.अशी असावी अग्निशमन यंत्रणा...कोणतीही इमारत १५ ते २४ मीटर उंचीदरम्यान असल्यास त्याला उच्चदाबाचे पंप, सायरन, स्प्रिंकलर, अंतर्गत आणि बाह्य पाण्याची पाइपलाइन उभारणे आवश्यक असते. या इमारतीवर डाऊनकमर पद्धतीने वरुन खाली पाणी येण्यासाठी खास १० हजार लिटरची पाण्याची टाकी राखीव असावी. ती टाकी वर्षभर भरलेली राहण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच २४ मीटर उंचीपेक्षा अधिक उंच इमारतींवर आणि भूमिगत देखील पाण्याची टाकी असावी. साधारण १५ मीटर उंचीच्या इमारतीत वाहनतळ आणि चार मजले येतात.काही आस्थापनाच्या रचनेनुसार मजल्यात वाढ अथवा घट होऊ शकते. तर पंधरा मीटरखालील इमारतीत फायर इस्टिंग्युशर बसविणे गरजेचे असते. तेदेखील आठ ते दहा मीटरवर एक याप्रमाणे असावे. शाळांसारख्या सार्वजनिक आणि धोकायदायक ठरू शकणाºया ठिकाणी अशी यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. शाळांमध्ये सामान्यत: ड्राय केमिकल पावडरचे फायर इस्टिंग्युशर वापरण्यात येते. त्याची परवानगी अग्निशमन विभागाकडून घ्यावी लागेल, असे अग्निशमन विभागातील अधिकाºयांनी सांगितले.पुरेसे कर्मचारीबळ नसल्याने अग्निशमन यंत्रणांची तपासणी करण्यात अडचणी येत आहेत. प्रत्येक शाळेनी खासगी एजन्सीमार्फत अग्निशमन यंत्रणांची तपासणी करून, त्याची प्रत विभागाला पाठविणे अपेक्षित आहे.- प्रशांत रणपिसे,मुख्य अग्निशमन अधिकारी

टॅग्स :Puneपुणे