शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

स्कुल चले हम....! ऊसतोड मजुरांची ६०८ मुलं जाणार यंदा शाळेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:23 IST

२०१० साली शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही राज्यात लाखो मुले शाळेपासून वंचित आहेत. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देआशा प्रकल्प : एकट्या ‘सोमेश्वर’ कारखान्यावर  आढळली होती ८६१ मुले स्थलांतरित मुलांना ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्पपुणे व सातारा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आशा प्रकल्पाकडून बहुतांश मुलांना गावी परतताना शिक्षण हमीपत्र

सोमेश्वरनगर : ऊसतोडीसाठी त्यांची पायपीट राज्यभर सुरु असते. या मजुरांसोबत त्यांच्या मुलांच्याही आयुष्याची भिंगरी होत राहते. या भिंगरीत या मुलांची मात्र शिक्षणाची चक्रे अर्धवट अवस्थेतच अडकतात. परंतु, आशा प्रकल्पाच्या सर्वेक्षणानुसार सन २०१७-१८ या साखर हंगामात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांची ६ ते १४ वयोगटांतील ८६१ मुले आढळली. यापैकी ६०८ मुलांना नजीकच्या सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यात यश मिळाले. एकाच कारखान्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मुलांना ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, अशी माहिती टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक ज. म. परेश  यांनी दिली.२०१० साली शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही राज्यात लाखो मुले शाळेपासून वंचित आहेत. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या स्थलांतरित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्टस व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड’ (आशा) हा प्रकल्प चालविला जात आहे. बारामती, पुरंदर (जि. पुणे) व खंडाळा, फलटण (जि. सातारा) या चार तालुक्यांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र असून जिथे तळ पडतात अशा पस्तीस गावांत गाव कार्यकर्ते नेमण्यात आले होते. मराठवाडा-विदर्भातील पंधरा जिल्ह्यातून मजूर आले होते. कार्यकर्त्यांच्या सर्वेक्षणात हंगामाच्या अखेरीस १९९५ कुटुंबं आढळली. यामध्ये ० ते १८ वयोगटांची १८८९ मुले आढळली. त्यापैकी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू असणारी ६ ते १४ वयोगटांतील आढळलेल्या तब्बल ८६१ मुलांना नजीकच्या ८९ जिल्हा परिषद शाळा व विद्यालयांमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. यासाठी खेळ, गाणी, कला, बालोत्सव, पालक मेळावे, मजुरांच्या बैठका, शिक्षक व शाळा समितीच्या कार्यशाळा या गोष्टीही राबविण्यात आल्या. लोकसहभागातून गणवेश, वह्या, चपला उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे यावर्षी ६०८ मुले शाळेत जाऊ शकली.  त्यातही ३८० मुले नियमित तर उर्वरित मुले अनियमित जात होती. २५३ मुले एकही दिवस शाळेत जाऊ शकली नाहीत. दररोज या मुलांच्या शाळा उपस्थितीचा मागोवा घेऊन अभ्यास करण्यात आला. शाळेत न येण्याचे काय आहेत निष्कर्षशाळेत न येणाऱ्या मुलांपैकी ३५ टक्के मुले ऊसतोड तर ६ टक्के मुले घरकाम करतात, १९ टक्के मुले लहान भावंडांना सांभाळतात, १२ टक्के मुलांना शाळा व शिक्षक आवडत नाहीत, केवळ ५ टक्के मुलांचे पालक विरोध करतात अन्य पालक मजबुरी असल्याचे सांगतात. २३ टक्के मुले सततचे स्थलांतर, असुरक्षितता, अनारोग्य अशा कारणांनी शाळेत येत नाहीत.

राज्यव्यापी मोहीम राबवावी१ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रत्येक स्थलांतरित मूल शाळेत घालावे व त्यास शिक्षण हमीपत्र द्यावे, असा शासन निर्णय असताना ८६१ पैकी केवळ चार मुलांना मूळ शाळांकडून शिक्षण हमीपत्र मिळाले होते. पुणे व सातारा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आशा प्रकल्पाकडून बहुतांश मुलांना गावी परतताना शिक्षण हमीपत्र देण्यात आले. शासनाच्या शिक्षण, सहकार, महसूल, ग्रामविकास, कामगार कल्याण अशा सर्व विभागांनी एकत्र येऊन स्थलांतरित व शालाबाह्य मुलांसाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा परेश यांनी व्यक्त केली.      

 दीड लाख मुले शालाबाह्यएकाच कारखान्यावर मागील वर्षी ७९४ व यावर्षी ८६१ मुले आढळत असतील, तर राज्यात सुमारे २०० कारखाने आहेत. याचाच अर्थ एक लाखापेक्षा अधिक मुले दरवर्षी स्थलांतरित होतात. परंतु, याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. काही अपवाद वगळता ही मुले सहा महिन्यांच्या साखर हंगामात शालाबाह्य होतात. पुरोगामी महाराष्ट्राला हा आकडा अशोभनीय आहे. शासकीय यंत्रणाच हा प्रश्न सोडवू शकते, असे मत प्रकल्प संचालक नितीन नार्लावार, प्रकल्प मार्गदर्शक संतोष शेंडकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीSchoolशाळाStudentविद्यार्थीTataटाटा