शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
3
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
4
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
5
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
6
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
7
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
8
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
9
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
10
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
11
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
12
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
13
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
14
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
15
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
16
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
17
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
18
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
19
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
20
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश

स्कुल चले हम....! ऊसतोड मजुरांची ६०८ मुलं जाणार यंदा शाळेत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2018 20:23 IST

२०१० साली शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही राज्यात लाखो मुले शाळेपासून वंचित आहेत. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे.

ठळक मुद्देआशा प्रकल्प : एकट्या ‘सोमेश्वर’ कारखान्यावर  आढळली होती ८६१ मुले स्थलांतरित मुलांना ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्पपुणे व सातारा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आशा प्रकल्पाकडून बहुतांश मुलांना गावी परतताना शिक्षण हमीपत्र

सोमेश्वरनगर : ऊसतोडीसाठी त्यांची पायपीट राज्यभर सुरु असते. या मजुरांसोबत त्यांच्या मुलांच्याही आयुष्याची भिंगरी होत राहते. या भिंगरीत या मुलांची मात्र शिक्षणाची चक्रे अर्धवट अवस्थेतच अडकतात. परंतु, आशा प्रकल्पाच्या सर्वेक्षणानुसार सन २०१७-१८ या साखर हंगामात सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी आलेल्या मजुरांची ६ ते १४ वयोगटांतील ८६१ मुले आढळली. यापैकी ६०८ मुलांना नजीकच्या सरकारी शाळांमध्ये दाखल करण्यात यश मिळाले. एकाच कारखान्यावर इतक्या मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मुलांना ‘आरटीई’नुसार शिक्षण हक्क मिळवून देणारा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे, अशी माहिती टाटा ट्रस्टचे कार्यक्रम व्यवस्थापक ज. म. परेश  यांनी दिली.२०१० साली शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी होऊनही राज्यात लाखो मुले शाळेपासून वंचित आहेत. यामध्ये ऊसतोड कामगारांच्या मुलांची संख्या सर्वाधिक आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात ऊसतोडीसाठी येणाऱ्या मजुरांच्या स्थलांतरित मुलांना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग, टाटा ट्रस्टस व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘डिजिटल एज्युकेशन गॅरंटी कार्ड’ (आशा) हा प्रकल्प चालविला जात आहे. बारामती, पुरंदर (जि. पुणे) व खंडाळा, फलटण (जि. सातारा) या चार तालुक्यांमध्ये कारखान्याचे कार्यक्षेत्र असून जिथे तळ पडतात अशा पस्तीस गावांत गाव कार्यकर्ते नेमण्यात आले होते. मराठवाडा-विदर्भातील पंधरा जिल्ह्यातून मजूर आले होते. कार्यकर्त्यांच्या सर्वेक्षणात हंगामाच्या अखेरीस १९९५ कुटुंबं आढळली. यामध्ये ० ते १८ वयोगटांची १८८९ मुले आढळली. त्यापैकी शिक्षण हक्क कायदा (आरटीई) लागू असणारी ६ ते १४ वयोगटांतील आढळलेल्या तब्बल ८६१ मुलांना नजीकच्या ८९ जिल्हा परिषद शाळा व विद्यालयांमध्ये घालण्याचा प्रयत्न केला. यासाठी खेळ, गाणी, कला, बालोत्सव, पालक मेळावे, मजुरांच्या बैठका, शिक्षक व शाळा समितीच्या कार्यशाळा या गोष्टीही राबविण्यात आल्या. लोकसहभागातून गणवेश, वह्या, चपला उपलब्ध करून देण्यात आल्या. यामुळे यावर्षी ६०८ मुले शाळेत जाऊ शकली.  त्यातही ३८० मुले नियमित तर उर्वरित मुले अनियमित जात होती. २५३ मुले एकही दिवस शाळेत जाऊ शकली नाहीत. दररोज या मुलांच्या शाळा उपस्थितीचा मागोवा घेऊन अभ्यास करण्यात आला. शाळेत न येण्याचे काय आहेत निष्कर्षशाळेत न येणाऱ्या मुलांपैकी ३५ टक्के मुले ऊसतोड तर ६ टक्के मुले घरकाम करतात, १९ टक्के मुले लहान भावंडांना सांभाळतात, १२ टक्के मुलांना शाळा व शिक्षक आवडत नाहीत, केवळ ५ टक्के मुलांचे पालक विरोध करतात अन्य पालक मजबुरी असल्याचे सांगतात. २३ टक्के मुले सततचे स्थलांतर, असुरक्षितता, अनारोग्य अशा कारणांनी शाळेत येत नाहीत.

राज्यव्यापी मोहीम राबवावी१ आॅक्टोबर २०१५ रोजी प्रत्येक स्थलांतरित मूल शाळेत घालावे व त्यास शिक्षण हमीपत्र द्यावे, असा शासन निर्णय असताना ८६१ पैकी केवळ चार मुलांना मूळ शाळांकडून शिक्षण हमीपत्र मिळाले होते. पुणे व सातारा जिल्हा परिषदेच्या सहकार्याने आशा प्रकल्पाकडून बहुतांश मुलांना गावी परतताना शिक्षण हमीपत्र देण्यात आले. शासनाच्या शिक्षण, सहकार, महसूल, ग्रामविकास, कामगार कल्याण अशा सर्व विभागांनी एकत्र येऊन स्थलांतरित व शालाबाह्य मुलांसाठी राज्यव्यापी मोहीम राबवावी, अशी अपेक्षा परेश यांनी व्यक्त केली.      

 दीड लाख मुले शालाबाह्यएकाच कारखान्यावर मागील वर्षी ७९४ व यावर्षी ८६१ मुले आढळत असतील, तर राज्यात सुमारे २०० कारखाने आहेत. याचाच अर्थ एक लाखापेक्षा अधिक मुले दरवर्षी स्थलांतरित होतात. परंतु, याची कुठलीही आकडेवारी उपलब्ध नाही. काही अपवाद वगळता ही मुले सहा महिन्यांच्या साखर हंगामात शालाबाह्य होतात. पुरोगामी महाराष्ट्राला हा आकडा अशोभनीय आहे. शासकीय यंत्रणाच हा प्रश्न सोडवू शकते, असे मत प्रकल्प संचालक नितीन नार्लावार, प्रकल्प मार्गदर्शक संतोष शेंडकर यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :BaramatiबारामतीSchoolशाळाStudentविद्यार्थीTataटाटा